AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘रामभक्त कधी खोटं बोलत नाही’, कोरोना रिपोर्ट विचारणाऱ्यांना कंगनाचे बेधडक उत्तर!

बॉलिवूड अभिनेता कंगना रनौत (Kangana Ranaut) तिच्या चाहत्यांमधील बेधडक शैलीसाठी ओळखली जाते. कंगना तिचे वक्तव्य कधीच मागे घेत नाही. यामुळेच आजकाल ती सोशल मीडियावर ट्रोल होत असते.

‘रामभक्त कधी खोटं बोलत नाही’, कोरोना रिपोर्ट विचारणाऱ्यांना कंगनाचे बेधडक उत्तर!
कंगना रनौत
| Updated on: May 19, 2021 | 4:05 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता कंगना रनौत (Kangana Ranaut) तिच्या चाहत्यांमधील बेधडक शैलीसाठी ओळखली जाते. कंगना तिचे वक्तव्य कधीच मागे घेत नाही. यामुळेच आजकाल ती सोशल मीडियावर ट्रोल होत असते. पण अभिनेत्रीला ट्रोल होण्याची अजिबात भीती वाटत नाही. अलीकडेच अभिनेत्रीने चाहत्यांना पोस्ट करत सांगितले होते की, तिचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. पण आता कंगनाने पुन्हा एकदा एक निवेदन जारी केले असून, ते चर्चेत खूप आले आहे (Kangana Ranaut gives an epic reply to trollers who asking for corona report).

कंगनाने 18 मे रोजी कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती दिली होती आणि त्यासंबंधित व्हिडीओ इन्स्टाग्रामवरही शेअर केला होता. त्यानंतर बर्‍याच लोकांनी अभिनेत्रीला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता आणि काहींनी तर तिच्याकडे थेट कोरोना रिपोर्ट देखील मागितला. ते म्हणाले की, कंगना खोटे बोलत आहे. यावर कंगनाने आता सर्वांची बोलती बंद केली आहे.

कंगनाचे कडक उत्तर

वापरकर्ते कंगनाला जोरदार ट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहेत. कंगनाने काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, तिला कोरोनाची लागण झाली आहे आणि त्यानंतर मंगळवारी अभिनेत्रीने सांगितले की, ती आता कोरोना मुक्त झाली आहे. त्यानंतर नेटकऱ्यांनी तिला परत घेरण्याचा प्रयत्न केला, ज्याला अभिनेत्रीने एक सडेतोड प्रतिसाद दिला आहे (Kangana Ranaut gives an epic reply to trollers who asking for corona report).

सर्वांना प्रतिसाद देत आता कंगनाने तिच्या कोरोना रिपोर्टचा फोटो क्लिक करुन इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. कंगनाने तिच्या स्टोरीवर रिपोर्ट शेअर केला आहे आणि त्यावर लिहिले आहे की, जे सर्व राक्षक माझा रिपोर्ट विचारत होते, कारण ते जसे आहेत, जगही त्यांना तसेच दिसते…’राम भक्त कधीच खोटे बोलत नाहीत’ श्रीराम.’

पाहा पोस्ट

कंगनाचे ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कंगनाने पुन्हा एकदा वाद निर्माण केला आहे आणि सांगितले की, ती कोणालाही घाबरत नाही.

कंगनाने व्हिडीओ केला पोस्ट

8 मे रोजी कंगनाने चाहत्यांना माहिती दिली की, तीला कोरोना झाला आहे. यानंतर, अगदी 10 दिवसानंतर म्हणजेच 18 मे रोजी कंगनाने तिचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे म्हटले आहे. ही माहिती देताना अभिनेत्री म्हणाली की, ‘सर्वांना नमस्कार, माझा कोरोना रिपोर्ट नकारात्मक झाला आहे. मी या विषाणूचा कसा पराभव केला हे मला तुमच्यासोबत शेअर करायचे आहे. पण मला या विषाणूच्या फॅन क्लबला दुखावू नका, असे सांगितले गेले आहे. होय, हे खरं आहे की कोरोनाबद्दल काही सांगितले तर बरेच लोक रागावतात. सर्व चाहते आणि हितचिंतकांचे आभार आणि प्रेम.’

(Kangana Ranaut gives an epic reply to trollers who asking for corona report)

हेही वाचा :

‘जलसे’ जिवंत राहण्याची तळमळ, शाहिरीत नवे प्रयोग; वाचा, शाहीर इंगळे आणि त्यांची जडणघडण

अवघ्या 50 रुपयांत विकत होता सलमानचा ‘राधे’, लक्षात येताच दाखल झाला FIR

Follow Us
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.