AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ranbir Alia Wedding: आलियासोबतच्या लग्नाबाबत रणबीर म्हणतोय, “मला पिसाळलेल्या कुत्र्याने नाही चावलंय..”

अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हे सध्या बॉलिवूडमधील सर्वांधिक चर्चेत असलेल्या जोडींपैकी एक आहे. गेल्या काही वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांनी जाहीरपणे एकमेकांवरील प्रेम माध्यमांसमोर व्यक्त केलं. तर आलिया सोशल मीडियावरही रणबीरसोबतचे फोटो पोस्ट करते.

Ranbir Alia Wedding: आलियासोबतच्या लग्नाबाबत रणबीर म्हणतोय, मला पिसाळलेल्या कुत्र्याने नाही चावलंय..
Ranbir Kapoor and Alia BhattImage Credit source: Facebook
| Updated on: Mar 31, 2022 | 9:19 AM
Share

अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हे सध्या बॉलिवूडमधील सर्वांधिक चर्चेत असलेल्या जोडींपैकी एक आहे. गेल्या काही वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांनी जाहीरपणे एकमेकांवरील प्रेम माध्यमांसमोर व्यक्त केलं. तर आलिया सोशल मीडियावरही रणबीरसोबतचे फोटो पोस्ट करते. गेल्या वर्षभरापासून आलिया-रणबीरच्या लग्नाच्या (Wedding) चर्चा आहेत. नुकताच या दोघांचा डिझायनर बीना कन्ननसोबतचा फोटो व्हायरल झाला आणि पुन्हा एकदा त्यांच्या लग्नाविषयी चर्चा होऊ लागल्या आहेत. आता यावर रणबीरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत उत्तर दिलं आहे. आलियासोबत लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचंही त्याने यावेळी सांगितलं.

अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नात जेव्हा या दोघांनी एकत्र हजेरी लावली, तेव्हापासून त्यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा होऊ लागल्या. 2018 मध्ये ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी ही जोडी एकत्र आली होती. या शूटिंगदरम्यान दोघांच्या मैत्रीचं रुपांतर हळूहळू प्रेमात झालं. तब्बल पाच वर्षांपासून सुरू असलेलं शूटिंग त्यांनी नुकतंच वाराणसीमध्ये संपूर्ण केलं. या चित्रपटाच्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर आलिया-रणबीरची जोडी पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहे. ‘ब्रह्मास्त्र’ची शूटिंग संपल्याने आता आलिया-रणबीर लग्नाची तयारी करतील, अशीही चर्चा आहे. सप्टेंबरमध्ये हा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी ही जोडी लग्नबंधनात अडकेल, असं म्हटलं जातंय.

आलियाची पोस्ट-

‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत रणबीर याविषयी म्हणाला, “मला पिसाळलेल्या कुत्र्याने नाही चावलंय की मी माझ्या लग्नाची तारीख मीडियासमोर जाहीर करेन. पण मी आणि आलिया लवकरच लग्न करणार आहोत.” आलियासुद्धा एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत लग्नाविषयी व्यक्त झाली होती. “माझ्या मनात मी कधीच रणबीरशी लग्न केलंय”, असं ती म्हणाली होती.

हेही वाचा:

जॅकी श्रॉफ यांच्या मनाची श्रीमंती; निधनाचं वृत्त समजताच घरगड्याच्या घरी सांत्वनाला पोहोचले

Video: “त्यांना अद्दल घडवणं खूप महत्त्वाचं”; ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील अभिनेत्रीची फसवणुकीबाबतची पोस्ट चर्चेत

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली