AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ व्यक्तीच्या आठवणीत व्याकूळ होऊन जगजीत सिंह यांनी गायले होते गाणे, वाचा ‘चिट्ठी ना कोई संदेश’ गाण्याचा किस्सा

जगात गझल सम्राट म्हणून प्रसिद्ध जगजीत सिंह यांना जाऊन नुकतीच 10 वर्षे झाली आहेत. जगजीत सिंह यांनी 10 ऑक्टोबर 2011 रोजी या जगाचा निरोप घेतला. पण, आजही त्यांचा आवाज आणि त्यांच्या गझल लोकांच्या मनात जिवंत आहेत. जगजीत सिंग यांच्या जीवनाशी संबंधित अनेक कथा आहेत.

‘या’ व्यक्तीच्या आठवणीत व्याकूळ होऊन जगजीत सिंह यांनी गायले होते गाणे, वाचा ‘चिट्ठी ना कोई संदेश’ गाण्याचा किस्सा
Jagjit Singh
| Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Oct 12, 2021 | 8:18 AM
Share

मुंबई : जगात गझल सम्राट म्हणून प्रसिद्ध जगजीत सिंह यांना जाऊन नुकतीच 10 वर्षे झाली आहेत. जगजीत सिंह यांनी 10 ऑक्टोबर 2011 रोजी या जगाचा निरोप घेतला. पण, आजही त्यांचा आवाज आणि त्यांच्या गझल लोकांच्या मनात जिवंत आहेत. जगजीत सिंग यांच्या जीवनाशी संबंधित अनेक कथा आहेत. या कथा त्यांच्या प्रेम, त्यांचे करिअर आणि चित्रपट प्रवासाशी संबंधित आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की, ‘चिट्ठी ना कोई संदेश’ हे गाणे त्यांनी एका व्यक्तीच्या आठवणी गायले आहे.

जगजीत सिंग यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक हिट गाणी आणि गझल दिली आहेत. यामध्ये ‘होठों से छू लो तुम’, ‘तुमको देखा तो ख्याल आया’, ‘कागज की कश्ती’, ‘कोई फरियाद’ अशा एकापेक्षा एक गाण्यांचा समावेश आहे.

जगजीत सिंह आणि त्यांचे कुटुंब राजस्थानचे आहे. त्यांचा जन्म श्रीगंगानगर शहरात झाला. त्यांचे वडील सरकारी कर्मचारी होते. घरात अनेक भावंडे होती आणि वडिलांच्या सांगण्यावरून त्यांचे नाव जगमोहन ठेवले गेले. पण तेव्हा कुणालाही माहीत नव्हते की, आपल्या घरात जन्मलेला हा सूर आपल्या आवाजाने संपूर्ण जगाला मोहित करेल.

मुलाच्या दुःखात गायले ‘चिट्ठी ना कोई संदेश’ गाणे

जगजीत सिंह यांनी ‘दुश्मन’ चित्रपटासाठी ‘चिट्ठी ना कोई संदेश’ हे प्रसिद्ध गाणे गायले आहे. लोकांना हे गाणे खूप आवडले. पण असे म्हटले जाते की, जगजीत सिंह यांनी हे गाणे एखाद्या खास व्यक्तीसाठी गायले आहे. वास्तविक जगजीत सिंह आणि त्यांची पत्नी आणि गायिका चित्रा यांना एक मुलगा होता, ज्याचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. या अपघातामुळे जगजीत आणि चित्रा दोघेही हादरले होते. या अपघातात दोघेही इतके तुटले होते की, त्यांनी स्वतःला संगीतापासून दूर केले होते.

पण सर्व दु:ख दूर करत त्यांनी स्वतःला सावरलं. स्वतःची काळजी घेतली आणि ते पुन्हा परत आले. त्यांनी ‘चिट्ठी ना कोई संदेश’ या गाण्यात आपली संपूर्ण वेदना व्यक्त केली. त्यांनी आपल्या मुलाच्या स्मरणार्थ हे गाणे गायले आहे. हे गाणे खूप लोकप्रिय झाले, आजही ते यूट्यूबवर लाखो वेळा ऐकले गेले आहे.

जगजीत सिंह यांचा आवाज सदैव राहील अमर!

जगजीत सिंह यांना अनेक मोठ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांना 1998 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. 2003मध्ये जगजीत सिंह यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. एवढेच नव्हे तर, 2014 मध्ये सरकारने त्यांच्या सन्मानार्थ एक टपाल तिकीटही जारी केले. आज ते आपल्यात नाही, पण त्याचा आवाज आजही अजरामर आहे.

हेही वाचा :

पान मसाला ब्रँडपासून अमिताभ बच्चन यांची फारकत, मानधनाचे पैसे परत करत रद्द केला जाहिरात करार!

Ankita Lokhande | अंकिता लोखंडे म्हणाली- ‘भाड़ में गया प्यार-व्यार’, VIDEO पाहून बॉयफ्रेंड विक्की जैनचे टेन्शन वाढले !

Follow Us
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं कृत्य, थेट स्टेटस  ठेवला अन्... पुढे काय घडलं?
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी...
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी अरेरावी, थेट अर्वाच्च भाषेत... व्हिडीओ व्हायरल
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे..
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच..
Bhandara | क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच जण....
पेपर लीक रोखण्यासाठी NTAचं मोठं पाऊल, परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्स...
पेपर लीक रोखण्यासाठी NTAचं मोठं पाऊल, परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्स...
छगन भुजबळ दिल्लीत गेले असते तर...; सुळेंच्या विधानाची जोरदार चर्चा
Supriya Sule | छगन भुजबळ दिल्लीत गेले असते तर...; सुप्रिया सुळेंच्या विधानाची जोरदार चर्चा
मला राज्यसभेवर जायचंय पण आता... छगन भुजबळ अखेर बोललेच, राष्ट्रवादीत...
मला राज्यसभेवर जायचंय पण आता... छगन भुजबळ अखेर बोललेच, राष्ट्रवादीत मोठी खलबत
INDIA आघाडीच्या बैठकीआधी दिल्लीत बॅनरबाजी! राहुल गांधींसह विरोधी नेते.
INDIA आघाडीच्या बैठकीआधी दिल्लीत बॅनरबाजी! राहुल गांधींसह विरोधी नेते टार्गेट, राजकारण तापलं
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस दिल्लीत; राजकीय घडामोडींना वेग
DCM Eknath Shinde | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस दिल्लीत; राजकीय घडामोडींना वेग, चर्चांना उधाण!