AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘छावा’मधून डिलिट केलेला लेझीम डान्स व्हायरल; नेटकरी म्हणाले “आमचं दुर्दैव..”

'छावा' या चित्रपटातून विकी कौशलचा लेझीम डान्सचा सीन काढून टाकण्यात आला होता. आता हाच व्हिडीओ कोरिओग्राफरने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यावर नेटकऱ्यांकडून भरभरून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.

'छावा'मधून डिलिट केलेला लेझीम डान्स व्हायरल; नेटकरी म्हणाले आमचं दुर्दैव..
विकी कौशलImage Credit source: Youtube
| Updated on: Mar 04, 2025 | 9:40 AM
Share

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. ऐतिहासिक कथानक असलेला चित्रपट म्हटल्यास त्यावरून वाद होणं हे जणू समीकरणच बनलं आहे. याला विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला ‘छावा’सुद्धा अपवाद ठरला नाही. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील एका सीनवरून वाद निर्माण झाला होता. छत्रपती संभाजी महाराजांचा लेझीम नृत्याचा हा सीन होता. अखेर वादानंतर आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सल्ल्यानंतर दिग्दर्शकांनी तो सीन चित्रपटातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. लेझीमचा हा सीन चित्रपटात तसाच ठेवावा, अशीही भावना असंख्य नेटकऱ्यांची होती. अखेर चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या तीन आठवड्यांनंतर कोरिओग्राफरने लेझीम डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यावर विकी कौशलसह नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

कोरिओग्राफर विजय गांगुलीने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. लेझीम डान्सच्या रिहर्सलचा हा व्हिडीओ आहे. ‘प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी आणि त्यांच्याशी जोडण्यासाठी आम्ही सर्वजण अथक परिश्रम करतो. आमचे काही प्रयत्न अंतिम टप्प्यात पोहोचत नसले तरी आम्ही नेहमीच चित्रपटासाठी जे सर्वोत्तम आहे ते करतो. जगाला ते पाहता आलं नाही, तरी ते नेहमीच असंच राहील, ज्याचा मला अभिमान आहे. अशाच एका रिहर्सलचा हा व्हिडीओ आहे,’ असं त्याने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय. या व्हिडीओवर विकीनेही प्रतिक्रिया दिली आहे. ‘लेझीम ऑन’ असं त्याने लिहिलंय. तर ‘विकी कौशलसह हा व्हिडीओ अपलोड करा’, अशी विनंती नेटकऱ्यांनी केली आहे. ‘हा सीन चित्रपटात पाहू शकलो नाही, हे आमचं दुर्दैव’, अशाही प्रतिक्रिया काहींनी दिल्या आहेत.

चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी विकी छत्रपती संभाजीनगरमध्ये गेला होता. तिथे माध्यमांशी बोलताना त्याला चित्रपटातील लेझीमच्या सीनवरून वाद निर्माण झाला, त्याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तो म्हणाला, “शिवगर्जनेशिवाय आम्ही शूटिंगची सुरुवात केली असेल, असा एकही दिवस नव्हता. चित्रपटात महाराजांच्या लेझीमचा प्रसंग फक्त वीस ते तीस सेकंदांचा होता. तो कथेचा भाग नव्हता. पण महाराष्ट्राची संस्कृती जगभरात पोहोचावी म्हणून तो सीन त्यात समाविष्ट करण्यात आला होता. छत्रपती संभाजी महाराज हे रयतेचे राजे होते. त्यामुळे जर एखाद्याने त्यांना त्यांच्यासोबत लेझीम खेळण्याची विनंती केली असेल तर राजेंनी ते नक्कीच ऐकलं असेल. पण जर शिवप्रेमींना त्या सीनबद्दल आक्षेप असेल तर आम्ही तो सीन वगळणार असल्याचं जाहीर केलंय. तो सीन चित्रपटातील महत्त्वपूर्ण भाग नाहीये.”

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.