AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘छावा’मधून डिलिट केलेला लेझीम डान्स व्हायरल; नेटकरी म्हणाले “आमचं दुर्दैव..”

'छावा' या चित्रपटातून विकी कौशलचा लेझीम डान्सचा सीन काढून टाकण्यात आला होता. आता हाच व्हिडीओ कोरिओग्राफरने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यावर नेटकऱ्यांकडून भरभरून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.

'छावा'मधून डिलिट केलेला लेझीम डान्स व्हायरल; नेटकरी म्हणाले आमचं दुर्दैव..
विकी कौशलImage Credit source: Youtube
| Updated on: Mar 04, 2025 | 9:40 AM
Share

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. ऐतिहासिक कथानक असलेला चित्रपट म्हटल्यास त्यावरून वाद होणं हे जणू समीकरणच बनलं आहे. याला विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला ‘छावा’सुद्धा अपवाद ठरला नाही. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील एका सीनवरून वाद निर्माण झाला होता. छत्रपती संभाजी महाराजांचा लेझीम नृत्याचा हा सीन होता. अखेर वादानंतर आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सल्ल्यानंतर दिग्दर्शकांनी तो सीन चित्रपटातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. लेझीमचा हा सीन चित्रपटात तसाच ठेवावा, अशीही भावना असंख्य नेटकऱ्यांची होती. अखेर चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या तीन आठवड्यांनंतर कोरिओग्राफरने लेझीम डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यावर विकी कौशलसह नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

कोरिओग्राफर विजय गांगुलीने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. लेझीम डान्सच्या रिहर्सलचा हा व्हिडीओ आहे. ‘प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी आणि त्यांच्याशी जोडण्यासाठी आम्ही सर्वजण अथक परिश्रम करतो. आमचे काही प्रयत्न अंतिम टप्प्यात पोहोचत नसले तरी आम्ही नेहमीच चित्रपटासाठी जे सर्वोत्तम आहे ते करतो. जगाला ते पाहता आलं नाही, तरी ते नेहमीच असंच राहील, ज्याचा मला अभिमान आहे. अशाच एका रिहर्सलचा हा व्हिडीओ आहे,’ असं त्याने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय. या व्हिडीओवर विकीनेही प्रतिक्रिया दिली आहे. ‘लेझीम ऑन’ असं त्याने लिहिलंय. तर ‘विकी कौशलसह हा व्हिडीओ अपलोड करा’, अशी विनंती नेटकऱ्यांनी केली आहे. ‘हा सीन चित्रपटात पाहू शकलो नाही, हे आमचं दुर्दैव’, अशाही प्रतिक्रिया काहींनी दिल्या आहेत.

चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी विकी छत्रपती संभाजीनगरमध्ये गेला होता. तिथे माध्यमांशी बोलताना त्याला चित्रपटातील लेझीमच्या सीनवरून वाद निर्माण झाला, त्याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तो म्हणाला, “शिवगर्जनेशिवाय आम्ही शूटिंगची सुरुवात केली असेल, असा एकही दिवस नव्हता. चित्रपटात महाराजांच्या लेझीमचा प्रसंग फक्त वीस ते तीस सेकंदांचा होता. तो कथेचा भाग नव्हता. पण महाराष्ट्राची संस्कृती जगभरात पोहोचावी म्हणून तो सीन त्यात समाविष्ट करण्यात आला होता. छत्रपती संभाजी महाराज हे रयतेचे राजे होते. त्यामुळे जर एखाद्याने त्यांना त्यांच्यासोबत लेझीम खेळण्याची विनंती केली असेल तर राजेंनी ते नक्कीच ऐकलं असेल. पण जर शिवप्रेमींना त्या सीनबद्दल आक्षेप असेल तर आम्ही तो सीन वगळणार असल्याचं जाहीर केलंय. तो सीन चित्रपटातील महत्त्वपूर्ण भाग नाहीये.”

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.