Abhijeet Dipke : अमेरिका सोडून भारतात का आले अभिजीत दिपके, त्यांच्यावर कोणत्या बड्या व्यक्ती प्रभाव? स्वतःच केला मोठा खुलासा?
Abhijeet Dipke : अमेरिकेत शिक्षण घेवून भारतात आलेले अभिजीत दिपके यांनी 'कॉकरोच जनता पार्टी' (Cockroach Janta Party) ची स्थापना केली. पण ते भारतात का आले आणि त्यांच्यावर कोणात्या बड्या व्यक्ती प्रभाव? याचा खुलासा स्वतः दिपके यांनी केला आहे.

Abhijeet Dipke : सध्या सर्वत्र फक्त ‘कॉकरोच जनता पार्टी’ (Cockroach Janta Party) आणि पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांची चर्चा सुरु आहे. पार्टी सुरु झाल्यापासून जोरदार चर्चेत आहे. अभिजीत दिपके यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी अमेरिकेत शिक्षण घेतलं आणि भारतात परतले… अशात अनेकांना असा देखील प्रश्न पडला की, अमेरिका सोडून अभिजीत दिपके भारतात का आले आणि त्यांच्यावर कोणाचा प्रभाव आहे? याचा खुलासा खुद्द अभिजीत दिपके यांनीच केला आहे.
सोशल मीडियावर अभिजीत दिपके यांनी एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की, त्यांच्यावर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान स्टारर ‘स्वदेस’ सिनेमाचा मोठा प्रभाव असल्याचं सांगितलं. पोस्टमध्ये अभिजीत दिपके म्हणतात, ‘स्वदेस’ सिनेमात फातिमा बीनं कावेरी अम्माला सांगितलेल्या काही ओळी आठवल्या, “बता देना उस लड़के को अपने ही पानी में पिघल जाना बर्फ का मुकद्दर होता है…”, दिपके यांनी सांगितल्यानुसार, ते ‘स्वदेस’ सिनेमा पाहातच मोठे झाले. सिनेमा त्यांच्या मनाला खूप भावला, त्यांनी हा सिनेमा 100 पेक्षा अधिक वेळा पाहिला.
As Fatima bi said to Kaveri Amma: “Bata dena uss ladke ko apne hi paani mein pighal jaana barf ka muqaddar hota hai…”
Grew up watching Swades and fell so deeply in love with the film that I must have watched it over 100 times by now.
There’s one part that has always stayed… pic.twitter.com/d6MSD1BMAS
— Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) August 15, 2026
अभिजीत दिपके म्हणाले, ‘मी ‘स्वदेस’ मधील शाहरुख खानच्या सिनेमाचा खूप प्रभाव आहे.’ स्वातंत्र्य दिनी हिंगोली जिल्ह्यातील आपल्या मूळ गावातून अभिजीत दिपके यानं स्कूल ठिक करो अभियान सुरू केलं. त्यावेळी दिपके यांनी ही आठवण सांगितली.
पोस्टमध्ये अभिजीत दिपके म्हणाले, ‘मोहन जेव्हा हरिदासला भेटायला जातो, तेव्हा त्याला दिसतं की, हरिदास आपल्या कुटुंबाला दिवसातून दोन वेळचं जेवणही देऊ शकत नाही. परतताना ट्रेनमध्ये बसलेला असताना, त्याला स्टेशनवर शाळेत जाण्याऐवजी पाणी विकणारं एक लहान मूल दिसतं… त्या मुलांना पाहिल्यानंतर मोहनच्या डोळ्यातून अश्रू वाहतात. माझ्यासोबत देखील असं झालं. तेव्हापासूनच, मोहननं ज्याप्रमाणे चरणपूरसाठी काहीतरी केलं, तसं आपल्या गावासाठीही काहीतरी करण्याची तीव्र इच्छा माझ्या मनात होती. त्या काळातही मला या परिस्थितीची जाणीव होती. माझ्या मनात एकच होतं, मी अमेरिकेतून भारतात येईल आणि माझ्या गावासाठी काहीतरी करण्याची संधी मला मिळेल…’, असं देखील अभिजीत दिपके पोस्टमध्ये म्हणाले.
