AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बदनामीच्या भीतीने गायकाने स्वतःच्या गाण्याला दिलं नाही नाव, पण रिलीज होताच ठरलं सुपरहिट, आजही गाणं प्रचंड हिट

बॉलिवूड इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध गायकाने गाणं फ्लॉप होईल म्हणून गाण्याला दिलं नाही त्याचं नाव. पण जेव्हा गाणं प्रदर्शित झालं तेव्हा ते ठरलं सुपरहिट. आजही लाखो चाहत्यांचं आवडतं.

बदनामीच्या भीतीने गायकाने स्वतःच्या गाण्याला दिलं नाही नाव, पण रिलीज होताच ठरलं सुपरहिट, आजही गाणं प्रचंड हिट
Image Credit source: Social media
| Updated on: Apr 09, 2026 | 12:04 PM
Share

भारतीय चित्रपटसृष्टीत काही कलाकार असे आहेत जे आपल्या वेगळ्या शैलीमुळे खास ओळख निर्माण करतात. अशाच नावांपैकी एक म्हणजे अमित त्रिवेदी. त्यांच्या संगीतामध्ये नेहमीच काहीतरी नवीन, प्रयोगशील आणि मनाला भिडणारा सूर असतो. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक गाजलेली गाणी दिली असून आजही ते प्रेक्षकांच्या ओठांवर आहेत. मात्र, त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला तो ‘देव डी’ या चित्रपटामुळे.

8 एप्रिल 1979 रोजी मुंबईत एका गुजराती कुटुंबात अमित त्रिवेदी यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ गाव गुजरातमधील अहमदाबाद आहे. लहानपणापासूनच त्यांच्या घरात भक्तीगीतं आणि लोकसंगीत यांचा माहोल होता. याच वातावरणाचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला. शालेय जीवनातच त्यांना विविध वाद्यांबद्दल आवड निर्माण झाली आणि पुढे जाऊन त्यांनी संगीत क्षेत्रातच करिअर करायचे ठरवले.

संघर्षातून उभारलेली कारकीर्द

कॉलेजमध्ये असताना त्यांनी मित्रांसोबत ‘ओम’ नावाचा बँड स्थापन केला. या बँडच्या माध्यमातून त्यांनी छोटे-मोठे कार्यक्रम आणि लाईव्ह परफॉर्मन्स केले. सुरुवातीला त्यांना फारशी ओळख मिळाली नाही पण त्यांनी हार मानली नाही. सातत्याने प्रयत्न करत त्यांनी संगीत क्षेत्रात स्वतःची जागा निर्माण करण्यासाठी मेहनत घेतली.

चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी त्यांनी थिएटर, टीव्ही शो आणि जाहिरातींसाठी संगीत दिले. अनेक कंपन्यांसाठी जिंगल्स तयार करत त्यांनी अनुभव मिळवला. हा काळ त्यांच्या शिकण्याचा होता, ज्यामध्ये त्यांनी संगीताच्या सूक्ष्म गोष्टी आत्मसात केल्या.

‘देव डी’मुळे मिळाली मोठी ओळख

2008 साली ‘आमिर’ या चित्रपटातून त्यांनी संगीतकार म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील संगीताचे कौतुक झाले. त्यानंतर त्यांची भेट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्याशी झाली आणि त्यांनी अमित त्रिवेदी यांना देव डी मध्ये संधी दिली.

‘इमोशनल अत्याचार’ हे गाणे स्वतः अमित त्रिवेदी आणि अमिताभ भट्टाचार्य यांनी गायले होते, मात्र सुरुवातीला त्यांनी आपले नाव क्रेडिटमध्ये दिले नव्हते. गाणे फ्लॉप झाले तर करिअरवर परिणाम होईल, या भीतीने त्यांनी हे पाऊल उचलले होते. पण गाणे सुपरहिट ठरले आणि जवळपास 9 वर्षांनी हा खुलासा करण्यात आला.

‘देव डी’नंतर अमित त्रिवेदी यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. त्यांनी उडान, क्वीन, लुटेरा, इश्कजादे आणि उड़ता पंजाब यांसारख्या अनेक चित्रपटांना संगीत दिले. प्रत्येक चित्रपटात काहीतरी वेगळे करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येतो.

Follow Us
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा...
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा....
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार.
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह..
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह...
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात..
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात...
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर..
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर...
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये..
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये...
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!.
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,.
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;.
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले....
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले.....