विठ्ठल शिंदेंना साक्षात बाबासाहेब आंबेडकरांची शाबासकी, काय म्हणाले बाबासाहेब?; वाचा, किस्सा!

गायक, संगीतकार विठ्ठल शिंदे यांची कारकिर्द भली मोठी आहे. या कारकिर्दीत त्यांना अनेक मान-सन्मान मिळाले. अनेकांनी कौतुक केलं. (dr. babasaheb ambedkar felicitated folk singer vitthal shinde, read story)

विठ्ठल शिंदेंना साक्षात बाबासाहेब आंबेडकरांची शाबासकी, काय म्हणाले बाबासाहेब?; वाचा, किस्सा!
Vitthal Shinde
Follow us
| Updated on: Mar 17, 2021 | 4:27 PM

मुंबई: गायक, संगीतकार विठ्ठल शिंदे यांची कारकिर्द भली मोठी आहे. या कारकिर्दीत त्यांना अनेक मान-सन्मान मिळाले. अनेकांनी कौतुक केलं. पण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं कौतुक हा त्यांच्यासाठी सर्वोच्च पुरस्कार होता. विठ्ठल शिंदे बाबासाहेबांना नेमके कुठे भेटले? बाबासाहेबांनी त्यांचं कौतुक कुठे केलं? नेमका काय होता हा किस्सा? वाचा, 2007 साली विठ्ठल शिंदे यांनी सांगितलेला हा किस्सा… (dr. babasaheb ambedkar felicitated folk singer vitthal shinde, read story)

दीड हजार गीते गायली

विठ्ठल शिंदे यांनी सर्व प्रकारची मिळून तब्बल पाचशेच्यावर गाणी लिहिली आहेत. सुमारे दीड हजार गाणी गायली आहेत आणि दोन हजारांच्यावर गीते संगीतबद्ध केली आहेत. बाबासाहेब आंबेडकरांवरील अनेक गीतेही त्यांनी संगीतबद्ध केली आहेत. त्यांची बाबासाहेबांवरील अनेक गीते गाजली असून आजही आंबेडकर जयंतीत ही गीते वाजली जातात.

बाबासाहेब कलावंतांबाबत काय म्हणायचे?

बाबासाहेब आंबेडकर यांना कलावंतांबद्दल नेहमीच आदर राहिला आहे. माझी दहा भाषणं तर कलावंताचं एक गाणं बरोबरीचं आहे, असं बाबासाहेब नेहमी म्हणायचे. विठ्ठल शिंदे यांना 1951मध्ये त्याचा प्रत्यक्ष अनुभव आला होता.

टाळ्यांचा कडकडाट अन् बाबासाहेब जिंदाबाद

1951मधला हा किस्सा आहे. तेव्हा वरळीत बाबासाहेब आंबेडकरांची सभा होती. सभेपूर्वी गायनाचा कार्यक्रम होता. कार्यकर्त्यांनी शिंदेंना तासभर गाणं गायला सांगितलं. सभेला प्रचंड गर्दी उसळली होती. शिंदेंनी गायनास सुरुवात केली. पाच गाणी झाली असतील. तेवढ्यात बाबासाहेबांची गाडी सभास्थळी आली आणि कार्यकर्त्यांची एकच लगबग सुरू झाली. बाबासाहेब येताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. बाबासाहेब जिंदाबादच्या घोषणांनी आसमंत दुमदुमुन गेला. अचानक टाळ्या आणि घोषणांची आतषबाजी सुरू झाल्याने शिंदे यांनीही लोक आता भाषण ऐकण्याच्या मूडमध्ये आहेत हे हेरून आवराआवर सुरू केली.

बाबासाहेब म्हणाले, तुम्ही गात होता? आगे बढो!

बाबासाहेब स्टेजवर आले. स्टेजवर सर्व कार्यकर्ते उभे होते. त्यावेळी बाबासाहेबांनी कार्यकर्त्यांना विचारलं, स्टेजवर गाणं कोण गात होतं? कुणी तरी सांगितलं विठ्ठल शिंदे. त्यानंतर बाबासाहेबांनी मला जवळ बोलावलं. तुम्ही गात होता? तुमचा आवाज खूप चांगला आहे. आगे बढो, असं म्हणत बाबासाहेबांनी माझ्या पाठिवर कौतुकाची थाप मारली. त्यानंतर बाबासाहेबांनी मला आणखी एक गाणं गायला सांगितलं. त्यामुळे मी भारावून गेलो आणि मला हुरूप आला. मी आणखी एक गाणं तन्मतेयनं गायलो, असं शिंदे सांगतात.

माझी जिंदगी बदलली

बाबासाहेबांनी पाठीवर मारलेली कौतुकाची थाप मी कधीच विसरू शकत नाही. या कौतुकाच्या थापेमुळेच मी मोठा झालो. माझी जिंदगी बदलली, असं शिंदे म्हणाले. (साभार, आंबेडकरी कलावंत) (dr. babasaheb ambedkar felicitated folk singer vitthal shinde, read story)

संबंधित बातम्या:

लतादीदींनी गाणं थांबवलं, धीर दिला अन्…; वाचा, गायक विठ्ठल शिंदेंनी सांगितलेला किस्सा!

वाचता येत नव्हतं, तरीही ‘येऊ कशी कशी मी नांदायला’ गायल्या; रोशन सातारकरांचा हा किस्सा माहीत आहे का?

दहा हजारांच्या नोटांवर झोपवून बारसं, पत्नीसाठी जोडवेही सोन्याचे; आनंद शिंदेंचे हे किस्से माहीत आहेत काय?

आडनाव टाकलं अन् मुंबई गाठली; ‘पोपट फेम’ आनंद शिंदेंचं खरं आडनाव माहिती आहे का?

(dr. babasaheb ambedkar felicitated folk singer vitthal shinde, read story)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.