AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ghum Hai Kisikey Pyaar Meiin | मालिकेत एकमेकींच्या सवत; खऱ्या आयुष्यातही केलं अनफॉलो, अभिनेत्रींचा वाद चव्हाट्यावर

आयेशा आणि ऐश्वर्या यांच्यामधील भांडणाचं खरं कारण अद्याप समोर आलं नाही. या दोघींनीही त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र नेटकऱ्यांनी त्यावरून विविध अंदाज वर्तवण्यास सुरुवात केली आहे. 'आयेशा आणि ऐश्वर्याने एकमेकींना अनफॉलो केलंय. विचार करा सेटवर कसा माहौल असेल.

Ghum Hai Kisikey Pyaar Meiin | मालिकेत एकमेकींच्या सवत; खऱ्या आयुष्यातही केलं अनफॉलो, अभिनेत्रींचा वाद चव्हाट्यावर
Ayesha Singh and Aishwarya Sharma Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 01, 2023 | 8:43 AM
Share

मुंबई : स्टार प्लस वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘गुम है किसी के प्यार में’ नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. या मालिकेत पत्रलेखा ऊर्फ पाखीची भूमिका साकारणारी अभिनेत्री ऐश्वर्या शर्माने मालिका सोडल्यानंतर कथेत नवा ट्विस्ट आला. मात्र त्याचसोबत यामध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या दोन अभिनेत्रींमधील शीतयुद्ध आता चर्चेचा विषय ठरला आहे. या मालिकेत सईची भूमिका साकारणारी आयेशा सिंह आणि ऐश्वर्या शर्मा यांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं आहे. या दोघींमधील भांडणाने आता नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. विशेष म्हणजे मालिकेतही या दोघींच्या भूमिका एकमेकांच्या विरोधातील होत्या.

मालिकेच्या सुरुवातीपासूनच ऐश्वर्या आणि आयेशा यांच्यात कधी खास मैत्री झाली नव्हती. ऐश्वर्या आणि आयेशाने मालिकेत एकमेकांच्या सवतीची भूमिका साकारली आहे. या दोघांच्या पतीच्या भूमिकेत असलेला अभिनेता नील भट्ट हा ऐश्वर्याचा खऱ्या आयुष्यातील पती आहे. ‘गुम है किसी के..’ मालिकेत काम करताना सेटवर हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि लॉकडाउनदरम्यान त्यांनी लग्न केलं. नील आणि ऐश्वर्याची लव्ह-स्टोरी सुरू झाल्यानंतर आयेशाने त्यांच्यापासून लांब राहणंच पसंत केलं, असं म्हटलं जातं. यानंतर दोघींमध्ये शीतयुद्ध सुरू झालं.

आता ऐश्वर्या आणि आयेशाने एकमेकांना सोशल मीडियावरदेखील अनफॉलो केलं आहे. या मालिकेत काही वर्षांचा लीप दाखवण्यात येणार आहे. त्यानंतर नील भट्टसुद्धा मालिका सोडणार असल्याचं कळतंय. तेव्हा नीलसुद्धा आयेशाला अनफॉलो करेल, असाही अंदाज काहींनी वर्तवला आहे.

आयेशा आणि ऐश्वर्या यांच्यामधील भांडणाचं खरं कारण अद्याप समोर आलं नाही. या दोघींनीही त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र नेटकऱ्यांनी त्यावरून विविध अंदाज वर्तवण्यास सुरुवात केली आहे. ‘आयेशा आणि ऐश्वर्याने एकमेकींना अनफॉलो केलंय. विचार करा सेटवर कसा माहौल असेल. आयेशाला किती त्रास सहन करावा लागत असेल’, असं एकाने लिहिलं. तर ‘कोणत्या गोष्टीचा त्रास? ऐश्वर्याने आयेशाच्या हक्काचे पैसे स्वत: घेतले होते का? किंवा निर्मात्यांशी बोलून तिने आयेशाची फी कमी केली होती का’, असा उपरोधिक सवाल दुसऱ्या युजरने केला.

Follow Us
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच...
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच मोठी खळबळ; महापालिकेत काय घडलं?
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड संताप; नाव न घेता राऊतांना थेट इशारा?
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा इशारा, काय म्हणाले?
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ, खासदर फुट
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने  खळबळ, खासदर फुटीनंतर आणखी मोठा धक्का!
अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ
मोठी बातमी! अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ; सोलापुरात नेमकं काय घडतंय?
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं;
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं; थेट इशाराच दिला!
मुंबईत पोलीस तैनात! दिना पाटील यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त!
Operation Tiger | दिल्लीत बंड, मुंबईत पोलीस तैनात! संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर अचानक वाढवला पोलिस बंदोबस्त!
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या...
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या... नेमकं कारण काय?
ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
Sushma Andhare | ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
6 खासदार कुठे गेले?; सामंतांच्या एका वक्तव्याने राजकारणत खळबळ!
Uday Samant | 6 खासदार कुठे गेले?; उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ!