AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ghum Hai Kisikey Pyaar Meiin | मालिकेत एकमेकींच्या सवत; खऱ्या आयुष्यातही केलं अनफॉलो, अभिनेत्रींचा वाद चव्हाट्यावर

आयेशा आणि ऐश्वर्या यांच्यामधील भांडणाचं खरं कारण अद्याप समोर आलं नाही. या दोघींनीही त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र नेटकऱ्यांनी त्यावरून विविध अंदाज वर्तवण्यास सुरुवात केली आहे. 'आयेशा आणि ऐश्वर्याने एकमेकींना अनफॉलो केलंय. विचार करा सेटवर कसा माहौल असेल.

Ghum Hai Kisikey Pyaar Meiin | मालिकेत एकमेकींच्या सवत; खऱ्या आयुष्यातही केलं अनफॉलो, अभिनेत्रींचा वाद चव्हाट्यावर
Ayesha Singh and Aishwarya Sharma Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 01, 2023 | 8:43 AM
Share

मुंबई : स्टार प्लस वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘गुम है किसी के प्यार में’ नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. या मालिकेत पत्रलेखा ऊर्फ पाखीची भूमिका साकारणारी अभिनेत्री ऐश्वर्या शर्माने मालिका सोडल्यानंतर कथेत नवा ट्विस्ट आला. मात्र त्याचसोबत यामध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या दोन अभिनेत्रींमधील शीतयुद्ध आता चर्चेचा विषय ठरला आहे. या मालिकेत सईची भूमिका साकारणारी आयेशा सिंह आणि ऐश्वर्या शर्मा यांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं आहे. या दोघींमधील भांडणाने आता नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. विशेष म्हणजे मालिकेतही या दोघींच्या भूमिका एकमेकांच्या विरोधातील होत्या.

मालिकेच्या सुरुवातीपासूनच ऐश्वर्या आणि आयेशा यांच्यात कधी खास मैत्री झाली नव्हती. ऐश्वर्या आणि आयेशाने मालिकेत एकमेकांच्या सवतीची भूमिका साकारली आहे. या दोघांच्या पतीच्या भूमिकेत असलेला अभिनेता नील भट्ट हा ऐश्वर्याचा खऱ्या आयुष्यातील पती आहे. ‘गुम है किसी के..’ मालिकेत काम करताना सेटवर हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि लॉकडाउनदरम्यान त्यांनी लग्न केलं. नील आणि ऐश्वर्याची लव्ह-स्टोरी सुरू झाल्यानंतर आयेशाने त्यांच्यापासून लांब राहणंच पसंत केलं, असं म्हटलं जातं. यानंतर दोघींमध्ये शीतयुद्ध सुरू झालं.

आता ऐश्वर्या आणि आयेशाने एकमेकांना सोशल मीडियावरदेखील अनफॉलो केलं आहे. या मालिकेत काही वर्षांचा लीप दाखवण्यात येणार आहे. त्यानंतर नील भट्टसुद्धा मालिका सोडणार असल्याचं कळतंय. तेव्हा नीलसुद्धा आयेशाला अनफॉलो करेल, असाही अंदाज काहींनी वर्तवला आहे.

आयेशा आणि ऐश्वर्या यांच्यामधील भांडणाचं खरं कारण अद्याप समोर आलं नाही. या दोघींनीही त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र नेटकऱ्यांनी त्यावरून विविध अंदाज वर्तवण्यास सुरुवात केली आहे. ‘आयेशा आणि ऐश्वर्याने एकमेकींना अनफॉलो केलंय. विचार करा सेटवर कसा माहौल असेल. आयेशाला किती त्रास सहन करावा लागत असेल’, असं एकाने लिहिलं. तर ‘कोणत्या गोष्टीचा त्रास? ऐश्वर्याने आयेशाच्या हक्काचे पैसे स्वत: घेतले होते का? किंवा निर्मात्यांशी बोलून तिने आयेशाची फी कमी केली होती का’, असा उपरोधिक सवाल दुसऱ्या युजरने केला.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.