AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्हाला बाप बोलायलाही लाज वाटते…; ‘महाभारत’मधील कृष्णाच्या मुली असं का म्हणाल्या?

‘महाभारत’मधील कृष्णा म्हणजे अभिनेते नितीश भारद्वाज गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी नितीश भारद्वाज यांनी पत्नीवर आणि पत्नीने त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. पण आता त्यांच्या मुली देखील नितीश भारद्वाज यांचा विरोध करत आहेत.

तुम्हाला बाप बोलायलाही लाज वाटते...; ‘महाभारत’मधील कृष्णाच्या मुली असं का म्हणाल्या?
| Updated on: Mar 09, 2024 | 12:22 PM
Share

मुंबई | 9 मार्च 2024 : 1988 साली प्रसारित झालेल्या ‘महाभारत’ मालिका सर्वांना माहिती आहे. मालिकेची चर्चा आजही चाहत्यांमध्ये कायम रंगलेली असते. मालिकेत अभिनेते नितीश भारद्वाज यांनी श्री कृष्ण यांची भूमिका साकराली होती. पण आता नितीश भारद्वाज वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत नितीश भारद्वाज त्यांच्या मनातील खंत व्यक्त केली आहे. नितीश भारद्वाज यांनी काही दिवसांपूर्वी पत्नीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पत्नीने मानसिक छळ केला, एवढंच नाहीतर मुलींना देखील माझ्यापासून लांब केलं… आसा आरोप नितीश भारद्वाज यांनी केला.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत नितीश भारद्वाज यांनी मुलींबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. मुलाखतीत नितीश भारद्वाज यांना पुन्हा लग्न करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर नितीश भारद्वाज म्हणाले, ‘वैवाहिक आयुष्यात मी अनेक संकटांचा सामना केला आहे. पत्नीपासून विभक्त झाल्यामुळे माझ्या मुली देखील माझ्यापासून दूर झाल्या आहेत.

‘माझ्या 11 वर्षांच्या मुलींनी माझ्यासाठी जे शब्द वापरले आहेत, ते मी तुम्हाला याठिकाणी सांगतो… त्या मला म्हणाल्या, बाबा आम्हाला तुम्हाला बाप बोलायलाही लाज वाटते. एवढं सगळ केल्यानंतर देखील मुली असं बोलत आहेत? आई – वडील विभक्त झाल्याचा त्यांच्या मनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे मुली असं बोलत आहेत…’

पुढे नितीश भारद्वाज म्हणाले, ‘मला असं वाटतं माझी फसवणूक करण्यात आली आहे. ही माझ्या मुलींची लढाई आहे. जी मी आता लढत आहे. त्यामुळे मला नाही माहिती मी अन्य कोणत्या महिलेसोबत न्याय करु शकतो की नाही… मझ्यासाठी लग्न फार महत्त्वाची गोष्ट आहे. मी नात्यांवर विश्वास ठेवतो. मी माझ्या आई-वडिलांसोबत अनेक लग्न यशस्वी होताना पाहिले आहेत…’

नितीश भारद्वाज आणि स्मिता गटे यांनी 2009 मध्ये लग्न केलं. नितीश भारद्वाज आणि स्मिता गटे यांनी जुळ्या मुली आहेत. स्मिता गटे यांच्यासोबत नितीश भारद्वाज यांचं दुसरं लग्न आहे नितीश भारद्वाज यांचे पहिलं लग्न मोनिका पाटील यांच्यासोबत झालं होतं. पण दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. नितीश भारद्वाज आणि मोनिका यांचा घटस्फोट 2005 मध्ये झाला. नितीश भारद्वाज सध्या दुसऱ्या घटस्फोटामुळे चर्चेत आले आहेत.

Follow Us
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर.
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,.
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार.
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी.
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी.
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?.
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह.
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?.
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर...
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा.....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा......