AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आई फिरायला गेली, परत येईल.. जान्हवी कपूरला आजही श्रीदेवींची प्रतीक्षा

अभिनेत्री श्रीदेवी यांचं 2018 मध्ये निधन झालं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत श्रीदेवी यांची मुलगा जान्हवी कपूर मोकळेपणे व्यक्त झाली. आईच्या निधनानंतर मी अधिक धार्मिक झाले, असं तिने म्हटलंय. त्याचसोबत दरवर्षी तिरुपतीला जाण्यामागचंही कारण सांगितलं आहे.

आई फिरायला गेली, परत येईल.. जान्हवी कपूरला आजही श्रीदेवींची प्रतीक्षा
जान्हवी कपूर, श्रीदेवीImage Credit source: Instagram
| Updated on: May 27, 2024 | 1:40 PM
Share

अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या आगामी ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करतेय. जान्हवी आणि राजकुमार राव यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट येत्या 31 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत जान्हवी तिची आई आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. आईच्या निधनानंतर प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन बदलला आहे आणि मी पहिल्यापेक्षा अधिक धार्मिक, काही प्रमाणात अंधविश्वासू झाली आहे, असं जान्हवीने सांगितलं. आईच्या निधनाच्या सहा वर्षांनंतर आजसुद्धा ती अचानक माझ्या आयुष्यात परत येईल असं वाटत असल्याची भावनाही जान्हवीने व्यक्त केली.

‘द लल्लनटॉप’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत जान्हवी म्हणाली, “आधी माझा काही गोष्टींवर विश्वास नव्हता. शुक्रवारी केस धुवायचे नाहीत, रविवारी काळे कपडे घालायचे नाहीत, अशा गोष्टींवर माझा विश्वास नव्हता. मात्र आईच्या निधनानंतर मी प्रत्येक गोष्ट मानू लागले. ती गेल्यानंतर माझा दृष्टीकोन खूपच बदलला. देवाची पूजा-अर्चना यात आता माझं मन अधिक रमतं. हिंदुत्वाविषयी मी अधिक जागरूक झाली. मी पहिल्यापेक्षा जास्त धार्मिक झाली आहे. यामागे आईच कारणीभूत आहे. मला आजही वाटतं की ती कुठेतरी फिरायला गेली आहे. काही दिवसांनंतर पुन्हा घरी येईल. ती या जगात नाही, या गोष्टीवर माझा अजूनही विश्वास नाही.”

“तिरुपती बालाजी यांच्याशी माझ्या आईचं एक वेगळंच कनेक्शन होतं. तिच्या निधनानंतर मी ठरवलं की तिच्या प्रत्येक वाढदिवशी मी बालाजींच्या दर्शनाला जाईन. आजही मी तिथे जाते, तेव्हा भावूक होते. माझ्या आयुष्यातील कोणतीही मोठी गोष्ट असली तरी त्यापूर्वी मी पायऱ्या चढून बालाजींचं दर्शन घेईन, असा निर्धार केला. एखादी गोष्ट मला सहजरित्या मिळाली, तर त्या लायक मी आहे, असं मला वाटत नाही. मला स्वत:ला सिद्ध करायचं आहे. मी हे मान्य करते की इंडस्ट्रीत मला सहज संधी मिळाली, पण मला इतकी मेहनत करायची आहे की त्या संधीला मी न्याय देऊ शकेन. त्याचसोबत मला स्वत:लाही याची जाणीव करून द्यायची आहे की मी कोणा दुसऱ्याची जागा घेतली नाही. मला जे काही मिळालंय, ते माझ्या मेहनतीमुळे मिळालं आहे.”

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.