AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जया बच्चन यांनी लग्नाआधी ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चन यांना दिली होती चेतावणी

Aishwarya Rai Bachchan: ऐश्वर्या राय - अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा..., पण लग्नाआधी दोघांना जया बच्चन यांनी दिली होती अशी चेतावणी, अनेक वर्षांनंतर सत्य समोर

जया बच्चन यांनी लग्नाआधी ऐश्वर्या राय - अभिषेक बच्चन यांना दिली होती चेतावणी
| Updated on: Nov 10, 2024 | 3:22 PM
Share

Aishwarya Rai Bachchan: आतापर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी जोडीदारासोबत घटस्फोट घेत नातं संपवलं. सेलिब्रिटी जोडप्यांच्या घटस्फोटामुळे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. पण आता अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना, दोघे खरंच विभक्त होत आहेत का? असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण होत आहे. लग्नाच्या 17 वर्षांनंतर ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे.

काही मीडियारिपोर्टनुसार, ऐश्वर्या आता सासरच्या मंडळींसोबत ‘जलसा’ बंगल्यात राहत नाही. दोघांच्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, 2007 मध्ये दोघांनी लग्न केलं. पण लग्न करण्याआधी अभिनेत्री जया बच्चन यांनी दोघांना देखील चेतावणी दिली होती.

जया बच्चन यांनी ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये मोठा खुलासा केला होता. जया बच्चन आणि श्वेता बच्चन यांनी बच्चन कुटुंबातील होणाऱ्या सूनेबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. करणने विचारलं होतं, ‘ऐश्वर्या – अभिषेक यांना लग्नासाठी कोणता सल्ला द्याल…’

यावर जया बच्चन म्हणाल्या, ‘एवढाच सल्ला देईल की गैरवर्तन आणि एकमेकांना वाईट वागणूक दिली की गोष्टी बिघडतील…’ एवढंच नाही तर, श्वेता हिने देखील ऐश्वर्या हिचं कौतुक केलं होतं. ‘ऐश्वर्या हिला कोणत्याच सल्ल्याची गरज नाही… ‘

‘ऐश्वर्या मध्ये प्रचंड धौर्य आहे आणि हिच गोष्ट तिला आयुष्यात फार पुढे घेऊन जाईल…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली होती. शिवाय ऐश्वर्या हिला मी माझी सून नाही तर, मुलगी मानते असं देखील जया बच्चन म्हणाल्या होत्या.

जया बच्चन म्हणाल्या होत्या, ‘अमिताब बच्चन देखील ऐश्वर्या हिला सून मानत नाहीत. श्वेता घरी आल्यानंतर अमिताभ यांना जेवढा आनंद होतो. तेवढाच आनंद ऐश्वर्या आल्यानंतर देखील होतो…’ असं देखील जया बच्चन पूर्वी म्हणाल्या होत्या.

ऐश्वर्या – अभिषेक यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिषेक – ऐश्वर्या यांनी एकमेकांना अनेक वर्ष डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2007 मध्ये ऐश्वर्या – अभिषेक यांचं लग्न झालं. लग्नानंतर 2011 मध्ये ऐश्वर्या हिने लेक आराध्या हिला जन्म दिला. पण गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे.

Follow Us
शिंदे यांची धावपळ आणि... शिवसेना पक्षाची सुनावणी सुरु होण्याआधीच बड्या
शिंदे यांची धावपळ आणि... शिवसेना पक्षाची सुनावणी सुरु होण्याआधीच बड्या नेत्याचं मोठं विधान
सुनेत्रा पवारांचे अध्यक्षपद खरंच अवैध? सचिदानंद सिंह यांची पुन्हा रिमा
सुनेत्रा पवारांचे अध्यक्षपद खरंच अवैध? सचिदानंद सिंह यांची पुन्हा रिमाईंडर नोटीस, आता...
मूळ शिवसेना कुणाची? 7 दिवसांच्या सुनावणीनंतर निकाल कोणत्या वळणावर?
मूळ शिवसेना कुणाची? 7 दिवसांच्या सुनावणीनंतर निकाल कोणत्या वळणावर? आज ठाकरेंचे वकील...
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं घडणार? शरद पवार आणि पार्थ पवार भेटीनंतर
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं घडणार? शरद पवार आणि पार्थ पवार भेटीनंतर भलत्याच चर्चांना उधाण, 3 तासांच्या बैठकीत...
धाकधुक वाढली! शिवसेनेचं चिन्ह गोठणार की... वकील अनंत कळसेंचं विधान
धाकधुक वाढली! शिवसेनेचं चिन्ह गोठणार की... वकील अनंत कळसेंचं सुचक वक्तव्य, अखेर मोठी अपडेट समोर
मोठी बातमी! लाडकी बहिण योजनेबाबत मुख्यमंत्री फडणीसांचं मोठ विधान
मोठी बातमी! लाडकी बहिण योजनेतील अपात्रतेबाबत मुख्यमंत्री फडणीसांचं मोठं विधान; काय म्हणाले?
जुन्नरच्या अत्याचार प्रकरणावरून राऊतांचा फडणवीस, शिंदेंवर हल्लाबोल,
जुन्नरच्या अत्याचार प्रकरणावरून राऊतांचा फडणवीस, शिंदेंवर हल्लाबोल, अमृता फडणवीसांनाही म्हणाले...
उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार? अमित ठाकरे...
Pocket Money Scheme : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार? अमित ठाकरे म्हणाले..
श्रीमद्भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू टळतो; अजित पवारांचा उल्लेख करत...
श्रीमद्भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू टळतो; अजित पवारांचा उल्लेख करत डॉ. सूरदास यांनी काय काय सांगितलं?
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'