AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जया बच्चन यांनी लग्नाआधी ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चन यांना दिली होती चेतावणी

Aishwarya Rai Bachchan: ऐश्वर्या राय - अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा..., पण लग्नाआधी दोघांना जया बच्चन यांनी दिली होती अशी चेतावणी, अनेक वर्षांनंतर सत्य समोर

जया बच्चन यांनी लग्नाआधी ऐश्वर्या राय - अभिषेक बच्चन यांना दिली होती चेतावणी
| Updated on: Nov 10, 2024 | 3:22 PM
Share

Aishwarya Rai Bachchan: आतापर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी जोडीदारासोबत घटस्फोट घेत नातं संपवलं. सेलिब्रिटी जोडप्यांच्या घटस्फोटामुळे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. पण आता अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना, दोघे खरंच विभक्त होत आहेत का? असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण होत आहे. लग्नाच्या 17 वर्षांनंतर ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे.

काही मीडियारिपोर्टनुसार, ऐश्वर्या आता सासरच्या मंडळींसोबत ‘जलसा’ बंगल्यात राहत नाही. दोघांच्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, 2007 मध्ये दोघांनी लग्न केलं. पण लग्न करण्याआधी अभिनेत्री जया बच्चन यांनी दोघांना देखील चेतावणी दिली होती.

जया बच्चन यांनी ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये मोठा खुलासा केला होता. जया बच्चन आणि श्वेता बच्चन यांनी बच्चन कुटुंबातील होणाऱ्या सूनेबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. करणने विचारलं होतं, ‘ऐश्वर्या – अभिषेक यांना लग्नासाठी कोणता सल्ला द्याल…’

यावर जया बच्चन म्हणाल्या, ‘एवढाच सल्ला देईल की गैरवर्तन आणि एकमेकांना वाईट वागणूक दिली की गोष्टी बिघडतील…’ एवढंच नाही तर, श्वेता हिने देखील ऐश्वर्या हिचं कौतुक केलं होतं. ‘ऐश्वर्या हिला कोणत्याच सल्ल्याची गरज नाही… ‘

‘ऐश्वर्या मध्ये प्रचंड धौर्य आहे आणि हिच गोष्ट तिला आयुष्यात फार पुढे घेऊन जाईल…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली होती. शिवाय ऐश्वर्या हिला मी माझी सून नाही तर, मुलगी मानते असं देखील जया बच्चन म्हणाल्या होत्या.

जया बच्चन म्हणाल्या होत्या, ‘अमिताब बच्चन देखील ऐश्वर्या हिला सून मानत नाहीत. श्वेता घरी आल्यानंतर अमिताभ यांना जेवढा आनंद होतो. तेवढाच आनंद ऐश्वर्या आल्यानंतर देखील होतो…’ असं देखील जया बच्चन पूर्वी म्हणाल्या होत्या.

ऐश्वर्या – अभिषेक यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिषेक – ऐश्वर्या यांनी एकमेकांना अनेक वर्ष डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2007 मध्ये ऐश्वर्या – अभिषेक यांचं लग्न झालं. लग्नानंतर 2011 मध्ये ऐश्वर्या हिने लेक आराध्या हिला जन्म दिला. पण गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे.

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.