AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“ही लढाई मी जिंकू शकलो नाही..”; पोटच्या मुलाच्या आत्महत्येविषयी बोलताना कबीर बेदी भावूक

कबीर बेदी आणि त्यांची पहिली पत्नी प्रोतिमा यांचा मुलगा सिद्धार्थने 1997 मध्ये टोकाचं पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवलं होतं. याविषयी कबीर बेदी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाले.

ही लढाई मी जिंकू शकलो नाही..; पोटच्या मुलाच्या आत्महत्येविषयी बोलताना कबीर बेदी भावूक
कबीर बेदी आणि त्यांचा मुलगा सिद्धार्थImage Credit source: Instagram
| Updated on: Dec 18, 2024 | 10:35 AM
Share

पोटच्या मुलाच्या गंभीर मानसिक आरोग्य स्थितीचा सामना करणं हे पालकांसमोरील सर्वांत मोठं आव्हान असतं. अभिनेते कबीर बेदी यांनी त्यांच्या आयुष्यात अशाच एका मोठ्या आव्हानाचा सामना केला. मात्र या आव्हानाचा सामना करताना त्यांना मुलाला गमावण्याचं दु:ख पचवावं लागलं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते त्यांच्या मुलाविषयी मोकळेपणे व्यक्त झाले. कबीर बेदी यांचा मुलगा सिद्धार्थला स्किझोफ्रेनियाचं निदान झालं होतं. सिद्धार्थने आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं होतं. सिद्धार्थ हा कबीर बेदी आणि त्यांची पहिली पत्नी प्रोतिमा यांचा मुलगा होता. 1990 मध्ये त्याने कार्नेगी मेलॉन विद्यापीठात शिक्षण घेतलं आणि नंतर त्याला स्किझोफ्रेनिया असल्याचं निदान झालं होतं. वयाच्या 26 व्या वर्षी त्याने आत्महत्या केली होती.

‘डिजिटल कॉमेंट्री’ला दिलेल्या मुलाखतीत कबीर बेदी म्हणाले, “माझा मुलगा सिद्धार्थची शोकांतिका अशी होती की तो खूप हुशार होता. अमेरिकेच्या सर्वांत प्रतिष्ठित इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये तो दाखल झाला होता. त्यानंतर त्याला स्किझोफ्रेनियाचं निदान झालं होतं. मी माझ्या आत्मचरित्रात आयुष्यातील या टप्प्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झालोय. सिद्धार्थच्या अखेरच्या महिन्यांमध्ये एक पिता त्याच्या मुलाला कशा पद्धतीने आत्महत्येपासून वाचवण्याचा प्रयत्न करतो, हे त्याच लिहिलंय. माझ्यावर काय परिस्थिती ओढावली होती, याची कल्पना तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. अखेर मी ही लढाई जिंकू शकलो नाही आणि माझ्या आयुष्यातील ही कदाचित सर्वांत मोठी शोकांतिक आहे.”

View this post on Instagram

A post shared by Kabir Bedi (@ikabirbedi)

‘स्टोरीज आय मस्ट टेल’ या आत्मचरित्रात कबीर बेदी यांनी मुलाविषयी लिहिलंय. 1997 मध्ये सिद्धार्थने आत्महत्या केली होती. “मी आत्मचरित्रात जे काही लिहिलंय, ते मनापासून लिहिलंय. आयुष्यात मी ज्या समस्यांचा सामना केला, त्याविषयी त्यात मी लिहिलंय. चुकीच्या गुंतवणुकीमुळे माझं खूप मोठं नुकसान झालं होतं. माझा मुलगा ज्यावेळी स्किझोफ्रेनियाचा सामना करत होता, तेव्हाच हे सगळं घडलं होतं. मी माझ्या मुलाला आत्महत्या करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला पण मला त्यात यश मिळालं नाही. माझ्या मनात आजही अपराधीपणाची भावना आहे. त्याचवेळी माझ्यासमोर मोठं आर्थिक संकट होतं. ऑडिशन्सला गेल्यावर तिथे काय करायचं हेच मला कळत नव्हतं. त्यामुळे मी बरेच ऑफर्स गमावले होते. मी भावनिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालो होतो”, असं त्यांनी त्यात लिहिलंय.

Follow Us
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर
Breaking! मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर, प्रशासन अॅक्शन मोडमध्ये
'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं
Sunetra Pawar | 'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं भावनिक विधान
कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
Heavy Rain | कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! अचानक मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
NDAमध्ये शरद पवारांची एन्ट्री? जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्...
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्... भुस्खलनाचा थरारक व्हिडीओ समोर
मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
Amit Satam | मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही पूरस्थितीचा फटका
खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा
Navi Mumbai | खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता...
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता या शहरावर ओढावलं ढगफुटीचं संकट
संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा...
Ashadhi Wari 2026 | संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा, विठ्ठल... विठ्ठलच्या गजरात दुमदुमलं पैठण