AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कंगना रणौत केंद्रीय मंत्र्यासोबत थाटणार संसार! सर्वत्र लिंकअपच्या चर्चा, मोठी अपडेट समोर

कंद्रीय मंत्र्यासोबत कंगना राणौत वयाच्या 40 व्या वर्षी थाटणार संसार! सध्या सर्वत्र त्यांच्या लिंकअपच्या चर्चा... अभिनेत्रीच्या खासगी आयु्ष्याबद्दल मोठी अपडेट समोर...

कंगना रणौत केंद्रीय मंत्र्यासोबत थाटणार संसार! सर्वत्र लिंकअपच्या चर्चा, मोठी अपडेट समोर
Kangana Ranaut
| Updated on: Jun 14, 2026 | 9:17 AM
Share

अभिनेत्री आणि भाजपच्या महिला खासदार कंगना राणौत यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत कंगना यांनी चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण त्यांनी स्वतःला फक्त बॉलिवूडपर्यंत मर्यादित ठेवलं नाही, राजकारणात देखील त्यांनी प्रवेश केला आणि हिमाचल प्रदेश येथील मंडी या मतदार संघातून त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि खासदार म्हणून निवडून आल्या. बॉलिवूड गाजल्यानंतर, राजकारणात प्रवेश केल्याने कंगना यांच्या खासगी आयुष्याच्या चर्चांनी देखील जोर धरला. आता कंगना यांना कायम विचारला जाणार प्रश्न म्हणजे, ‘लग्न कधी करणार?’ एवढंच नाही तर, केंद्रीय मंत्र्यासोबत देखील कंगना यांच्या लिंकअपच्या चर्चांनी जोर धरला आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत कंगना यांनी लिंकअपच्या चर्चांवर आणि लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं. कंगना यांच्या लिंकअपच्या केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्यासोबत रंगल्या आहेत. चिराग यांना देखील कंगना यांच्याबद्दल अनेक प्रश्न देखील विचारण्यात आले. चिराग यांच्यासोबत असलेल्या नात्यावर कंगना म्हणाल्या, ‘असं काहीही होत नाही… तुम्ही सिंगल आहात म्हणून, कोणासोबत जरी संवाद साधला तरी, नावाची चर्चा होते.’

पुढे कंगना म्हणाल्या, ‘मी माझं आयुष्य लपवून कधीच ठेवलं नाही. मी माझं आयुष्य मोकळेपणाने जगली आहे… अशात कधी लग्न करण्याची वेळ येईल, तेव्हा सर्वांना कळेल… लग्नाची वेळ आली तरी ठिक आहे आणि नाही आली तरी ठिक आहे… रिलेशनशिप्सचा मी कधी अनुभव घेतला नाही असं नाही… अशी कोणतीच गोष्ट नाही जी माझ्याकडून राहिली आहे.’

एवढंच नाही तर, ‘लग्नासाठी आई – वडिलांचा दबाव नव्हता का?’ असा प्रश्न देखील कंगना यांना विचारण्यात आला. ‘आता माझ्या 40 व्या वर्षी आई – वडील काय बोलणार आहेत. त्यांनी बोलणं केव्हाच सोडून दिलं आहे. 10 वर्षांपूर्वी ते बोलायचे लग्न कर म्हणून… पण तेव्हा मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. आता तर काय फरत पडतो…’ असं देखील कंगना म्हणाल्या. सांगायचं झालं तर, कंगना सध्या ‘भारत भाग्य विधाता’ सिनेमामुळे चर्चेत आहेत.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा