AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ब्रह्मास्त्र’च्या कलेक्शनचे आकडे Fake? करण जोहरने दिली पहिली प्रतिक्रिया

Brahmastra चित्रपटाच्या कलेक्शनवरून मतमतांतरे; नेमकं काय सत्य?

'ब्रह्मास्त्र'च्या कलेक्शनचे आकडे Fake? करण जोहरने दिली पहिली प्रतिक्रिया
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Sep 29, 2022 | 5:21 PM
Share

अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र: पार्ट वन शिवा’ (Brahamstra) या चित्रपटाला प्रदर्शित होऊन तीन आठवडे पूर्ण झाले. या चित्रपटाने भारतात 260 कोटी रुपयांची कमाई केली. तर जगभरात 410 कोटी रुपयांचा गल्ला (Box Office Collection) जमवला. मात्र ब्रह्मास्त्रच्या कलेक्शनच्या आकड्यांवरून सुरुवातीपासूनच मतमतांतरे पहायला मिळत आहेत. हे आकडे बनावट आहेत, असाही आरोप केला जात आहे. आता निर्माता करण जोहरने (Karan Johar) या सर्व चर्चांवर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात करण जोहर आणि दिग्दर्शक अयान मुखर्जीने हजेरी लावली होती. या कार्यक्रमात करणला ब्रह्मास्त्रच्या कमाईच्या आकड्यांवरून प्रश्न विचारण्यात आला. यावेळी करण म्हणाला, “आजच्या डिजिटल विश्वात आकड्यांची हेराफेरी करणं कठीणच नाही तर अशक्य आहे. सध्याच्या काळात प्रत्येक डाटा ट्रॅक केला जातो. जर कोणाला या आकड्यांना चुकीचं सिद्ध करायचं असेल तर त्याने डिजिटल पद्धतीने ट्रॅक करून त्यांचं गणित करू शकतो.”

ब्रह्मास्त्रचा दिग्दर्शक अयान यावेळी म्हणाला, “हा संपूर्ण प्रवास अत्यंत आव्हानात्मक होता. प्रत्येक दिवशी आम्ही नव्या समस्येचा सामना केला आणि आता दुसरा, तिसरा भाग बनवणंही सोपं नाही.”

अयानचं कौतुक करताना करण पुढे म्हणाला, “ये जवानी है दिवानी या चित्रपटानंतर अयान दुसरा कमर्शिअल चित्रपट बनवू शकला असता. खूप पैसा कमवू शकला असता. पण त्याने असं केलं नाही. आर्थिकदृष्टया पाहिलं तर सात वर्षांपूर्वी तो जिथे होता, आतासुद्धा तिथेच आहे. मात्र त्याची महत्त्वाकांक्षा आणि जिद्द खूप मोठी आहे.”

ब्रह्मास्त्रच्या नकारात्मक रिव्ह्यूबद्दल अयानला प्रश्न विचारला असता त्याने सांगितलं, “कोणत्याही चित्रपटाला मिळालेल्या रिव्ह्यूचं स्वत:चं एक महत्त्व असतंच. पण अखेरीस बॉक्स ऑफिसचे आकडेत सर्वकाही सांगतात. सध्या चित्रपट अजूनही थिएटरमध्ये आहे. त्यामुळे त्यासंदर्भात येणाऱ्या प्रतिक्रिया आणि टिप्पण्यांवर विश्लेषण करण्यासाठी मला थोडा वेळ लागेल.”

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.