AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kareena Kapoor | ‘तैमुर’ नावावरून झालेल्या ट्रोलिंगवर अखेर करीनाने सोडलं मौन; म्हणाली “तो धक्का पचवणं..”

सैफ अली खान आणि करीना कपूरने जेव्हा त्यांच्या पहिल्या मुलाचं नाव तैमुर असं ठेवलं, तेव्हा सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंग झाली. या ट्रोलिंगवर करीनाने अखेर मौन सोडलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.

Kareena Kapoor | 'तैमुर' नावावरून झालेल्या ट्रोलिंगवर अखेर करीनाने सोडलं मौन; म्हणाली तो धक्का पचवणं..
सैफ अली खान, करीना कपूर, तैमुर अली खानImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 12, 2023 | 8:34 AM
Share

मुंबई | 12 सप्टेंबर 2023 : अभिनेत्री करीना कपूर 2016 मध्ये पहिल्यांदा आई झाली. सैफ अली खान आणि करीनाने त्यांच्या पहिल्या मुलाचं नाव तैमुर असं ठेवलं. मात्र या नावावरून सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंग सुरू झाली. तैमुर आता सहा वर्षांचा झाला आहे. मात्र जन्मापासूनच त्याला आणि त्याच्या आईवडिलांना तैमुर या नावावरून टीकेचा सामना करावा लागला. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत करीनाने तेव्हाचा कटू अनुभव सांगितला. कोणत्याच आई किंवा मुलाला अशा अनुभवाचा सामना करावा लागू नये, असं करीनाने म्हटलं.

“कोणालाच अशा अनुभवाचा सामना करावा लागू नये”

‘एक्स्प्रेस अड्डा’ला दिलेल्या मुलाखतीत करीना म्हणाली, “मला वाटतं की कोणत्याही आई किंवा मुलाला अशा अनुभवाचा सामना करावा लागू नये. मला आजही त्या ट्रोलिंगमागचं कारण कळत नाही. कारण कोणालाच इतरांचा अपमान करायचा नसतो किंवा दुखवायचं नसतं. आपल्याला भाषणस्वातंत्र्य आहे, आपल्या मनासारखं वागण्याचं स्वातंत्र्य आहे. किमान मला आणि सैफला तरी असंच वाटतं.” यावेळी करीनाने तैमुर या नावाचा अर्थ ‘लोह पुरुष’ असा सांगितला. त्याचप्रमाणे हे नाव कसं सुचलं त्याविषयीचा किस्सा तिने पुढे सांगितला.

तैमुर हे नाव कसं सुचलं?

“सैफ त्याच्या शेजारच्या मित्रासोबत लहानाचा मोठा झाला आणि त्याला त्या मित्राचं नाव खूप आवडायचं. त्याचं नाव तैमुर असं होतं. त्यामुळे सैफने म्हटलं होतं की जर मला मुलगा झाला, तर तो माझा पहिला मित्र असेल. मला त्याचं नाव तैमुर असं ठेवायला आवडले. अशा पद्धतीने तैमुर हे नाव सुचलं, कारण सैफच्या पहिल्या मित्राचं नाव तैमुर होतं”, असं करीना म्हणाली. जेव्हा सैफ आणि करीनाने त्या नावाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याचा अर्थ ‘लोह’ असल्याचं समजलं. मला माझा मुलगा लोहासारखा शक्तीशाली हवा, म्हणून ते नाव खूप आवडलं.

ट्रोलिंगवर करीनाची प्रतिक्रिया

तैमुर हे नाव इतिहासातील कोणत्याच व्यक्तिमत्त्वावरून घेण्यात आलं नाही असंही तिने यावेळी स्पष्ट केलं. “त्या नावाचा इतिहासातील कोणत्याही व्यक्तीशी काहीच संबंध नाही. जेव्हा लोकांनी त्या नावावरून ट्रोल करण्यास सुरुवात केली, तेव्हा मला धक्काच बसला. पण सैफ आणि मी त्यावर व्यक्त न होण्याचं ठरवलं होतं. त्या संपूर्ण काळात आम्ही शांत राहिलो म्हणूनच तो वाद हळूहळू शमला. आम्ही आमच्या मुलाचं नाव अत्यंत सुंदर ठेवलंय आणि आम्हाला ते नाव आवडतं, म्हणून आम्ही ते सर्व प्रकरण शांतपणे हाताळलं होतं”, असंही करीना पुढे म्हणाली.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.