AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kareena Kapoor- Aishwarya Rai : ऐश्वर्या रायचा हा सुपरहिट चित्रपट नाकारला, करीना आजही ढाळते अश्रू; कोट्यावधी..

Kareena Kapoor Khan Rejected Film : करीना कपूर ही नामवंत, प्रतिभावान अभिनेत्री आहे यात काहीच शंका नाही. तिने एकाहून एक सरस चित्रपट दिलेत, मात्र तेवढेच खास, सुपरहिट चित्रपट तिने नाकारलेही आहेत, ज्यामुळे तिला आजही पश्चाताप होत असेल.

Kareena Kapoor- Aishwarya Rai : ऐश्वर्या रायचा हा सुपरहिट चित्रपट नाकारला, करीना आजही ढाळते अश्रू; कोट्यावधी..
करीना कपूर खान- ऐश्वर्या राय बच्चनImage Credit source: social media
| Updated on: Nov 04, 2025 | 12:01 PM
Share

‘दाने दाने पर लिखा है खाने वाले का नाम’ अशी एक म्हण आहे. ज्याच्या नशिबात जे आहे ते त्यालाच मिळतं, आणि एखादी गोष्ट तुमच्या नशिबात लिहीली नसेल तर तुम्ही कितीही हात-पाय मारले तरी ते तुम्हाला मिळतच नाही. हिंदी चित्रपटसृष्टीत एकाहून एक सरस, उत्तम, तगडी कमाई करणारे चित्रपट बनलेत, त्यामुळे कलाकारांचंही नशीब उजळतं, प्रसिद्धी मिळते. उत्तम कमाईही होतेच. पण काही चित्रपट मिळणं हे तुमच्या नशीबात असावं लागतं, तर काही चांगले चित्रपट मिळत असून सुद्धा काही कलाकार ते थेट नाकारतात आणि मग ते दुसऱ्या कोणाला मिलतात, इतिहास घडवतात, हिट ठरतात. तेव्हा तो चित्रटपट नाकारणाऱ्या स्टार्सना हात चोळत बसण्याशिवाय आणि पश्चाताप करण्याशिवाय काही पर्याय उरत नाही.

बॉलिवूडमध्ये अनेक दशकं गाजवणारी, सौंदर्य आणि तितक्याच उत्तम अभिनयाने मोठा पडदा गाजवणारी अभिनेत्री म्हणजे करीना कपूर खान. 25 वर्षांनंतरही करीनाची जादू आजही कायम असून तिचे लाखो चाहते तिच्या कामाची, चित्रपटाची वाट पहात असतात. तिने एकाहून एक सरस चित्रपटच दिलेत, अभिनयाने लोकांचं मनही जिंकून घेतलं. मात्र असं असलं तरी याच करीना उर्फ ‘बेबो’ने काही चुकीचे निर्णय घेत अनेक उत्तम चित्रपट नाकारलेही आहेत. जे नंतर इतर अभिनेत्रींना मिळाले आणि त्यांनी बॉक्सऑफीसवर धमाल करत तगडी कमाई केली, त्यामुळे अभिनेत्रींचं करिअर नव्या, उच्च शिखरावरही गेलं, त्या निर्णयांचा करीनाला आजही पश्चाताप होत असेल.

नाकारला सुपरहिट चित्रपट

असाचा एक चित्रपट करीनाने नाकारला आणि तो ऐश्वर्या रायला मिळाल, ज्यात तिने उत्तम कामगिरी केली. त्या चित्रपटात एक नव्हे तब्बल 3 सुपरस्टार्स होते, बॉक्स ऑफीसवरही तो प्रचंड हिट ठरला,ऐश्वर्याला त्यामुळे नवी ओळख मिळाली, आजही चाहत्यांच्या मनात त्या चित्रपटाचे स्थान अबाधित आहे.

तीन-तीन सुपरस्टार्स 

करीनाने नाकारलेला हा चित्रपट 1999 सालचा होता, तिच्यांतर तो ऐश्वर्याकडे गेला आणि त्यातून पहिल्यांदाच सलमान-ऐश्वर्याची जोडी मोठ्या पडद्यावर झळकली. या चित्रपटात अजय देवगणचीही प्रमुख भूमिका होती. करीनाने या चित्रपटाला नकार दिला नसता तर तिचा डेब्यू याच हिट चित्रपटातून झाला असता.

सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची भूमिका असलेला आणि करीनाने नाकारलेल्या चित्रपटाचे नाव ‘हम दिल दे चुके सनम’ आहे. हा चित्रपट 1999 साली प्रदर्शित झाला. त्यात सलमान खानने समीरची भूमिका तर ऐश्वर्या राय बच्चनने नंदिनीची भूमिका केली होती. अजय देवगण हा वनराजच्या भूमिकेत झळकला. मात्र ऐश्वर्याची भूमिका सुरुवातीला करीना कपूर खानला ऑफर करण्यात आली होती. पण तिने हा चित्रपट करण्यास नकार दिला. त्याचा तिला आजहीव पश्चाताप होत असेल.

2000 साली केलं डेब्यू

एवढंच नव्हे तर करीना कपूर खानला हृतिक रोशनच्या ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटाची ऑफरही मिळाली होती. तिने काही दिवस चित्रपटाचे चित्रीकरणही केले, पण नंतर काही कारणास्तव तिने हा चित्रपट सोडला. शेवटी, 2000 साली आलेल्या “रेफ्यूजी” चित्रपटातून तिने पदार्पण केले, त्यामध्ये अभिषेक बच्चन याचीही प्रमुख भूमिका होती. पण हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर अपयशी ठरला.

25 वर्षांच्या कारकिर्दीत करीना कपूरने ‘कभी खुशी कभी गम’, ‘गुड न्यूज’, ‘3 इडियट्स’, ‘बजरंगी भाईजान’, ‘वीरे दी वेडिंग’, ‘तलाश’, ‘सिंघम रिटर्न्स’, ‘जब वी मेट’, ’36 चायना टाउन’, ‘बॉडीगार्ड’ यांसारखे अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत.

Follow Us
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा.

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा

बंदुका, ग्रेनेड्स की उघड युद्ध? मुलांविरोधात काय येणार? पवन खेडा यांचा सवाल; तर पोलिसांचा दावा काय?.

बंदुका, ग्रेनेड्स की उघड युद्ध? मुलांविरोधात काय येणार? पवन खेडा यांचा सवाल; तर पोलिसांचा दावा काय?

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !.

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट.

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट