AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रणवीरच्या ‘धुरंधर’बद्दल करीना कपूर जे म्हणाली ते ऐकून नेटकऱ्यांचा संताप अनावर

'धुरंधर : द रिव्हेंज' या चित्रपटाच्या तुफान यशादरम्यान आता अभिनेत्री करीना कपूरची प्रतिक्रिया समोर आली आहे. करीनाने या चित्रपटाबद्दल जे वक्तव्य केलं, त्यावरून नेटकरी तिला प्रचंड ट्रोल करत आहेत. ती नेमकं काय म्हणाली, ते जाणून घ्या..

रणवीरच्या 'धुरंधर'बद्दल करीना कपूर जे म्हणाली ते ऐकून नेटकऱ्यांचा संताप अनावर
Ranveer Singh and Kareena KapoorImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 09, 2026 | 8:38 AM
Share

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: त्सुनामी आणली आहे. या चित्रपटाच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांकडून जबरदस्त मिळाला आहे. बॉलिवूडपासून टॉलिवू़डपर्यंत.. अनेक कलाकार त्याचं तोंडभरून कौतुक करत आहेत. अशातच अभिनेत्री करीना कपूरच्या प्रतिक्रियेची सध्या जोरदार चर्चा आहे. करीनाने ‘धुरंधर’च्या यशाबद्दल जी प्रतिक्रिया दिली आहे, त्यावरून नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. ‘फायनान्शिअल टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत करीना म्हणाली की, “‘धुरंधर’ हा चित्रपट फक्त मुख्य अभिनेता रणवीर सिंहचा नाही, तर हा पूर्णपणे एका दिग्दर्शकाचा चित्रपट आहे. आजसुद्धा जेव्हा या चित्रपटाचा उल्लेख होतो, तेव्हा त्याला आदित्य धरचा ‘धुरंधर’ असं म्हटलं जातं.”

करीना कपूरच्या या वक्तव्यावर आता नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी तिच्या मताशी सहमती दर्शवली आणि या चित्रपटाच्या मागे दिग्दर्शकाची अधिक मेहनत होती, असं म्हटलं. तर काहींनी करीनावर पक्षपातीचा आरोप केला. ‘हिलासुद्धा धुरंधरचं यश पचलं नाही वाटतं. तिने रणवीर सिंहच्या मेहनतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे’, असं नेटकऱ्यांनी लिहिलं आहे. काहींनी करीनाला टोला लगावत म्हटलंय, ‘मग तर जब वी मेटसुद्धा इम्तियाज अलीचा चित्रपट आहे, करीनाचा नाही. या हिशोबाने रामायणसुद्धा फक्त नितेश तिवारी यांचा चित्रपट आहे, रणबीर कपूरचा नाही.’ अनेकांनी बॉलिवूडमध्ये असलेल्या रणवीर-रणबीर यांच्यातील तुलनेकडे लक्ष वेधलंय. “रणवीरला रणबीरच्या तुलनेत सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हटलं जातं, म्हणून ईर्षेतून तिने हे वक्तव्य केलंय”, असं नेटकऱ्यांनी म्हटलंय.

नेटकऱ्यांचे कमेंट्स-

‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली आहे. यामध्ये रणवीर सिंहने हमजा अली मजारी या गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. त्याच्यासोबत चित्रपटात आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, राकेश बेदी आणि सारा अर्जुन यांच्याही भूमिका आहेत. जसकीरत सिंह रंगी हा भारताचा गुप्तहेर बनून पाकिस्तानमधील ल्यारीमध्ये जातो आणि तिथे हमजा बनून राहू लागतो. 19 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर 2’ या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 1600 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे.

Follow Us
युद्धविरामानंतर इराणच्या तेल रिफायनरीमध्ये मोठा स्फोट! परिसरात खळबळ
युद्धविरामानंतर इराणच्या तेल रिफायनरीमध्ये मोठा स्फोट! परिसरात खळबळ.
काम करा नाहीतर पद...व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये एकनाथ शिंदेंचा थेट इशारा
काम करा नाहीतर पद...व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये एकनाथ शिंदेंचा थेट इशारा.
राऊतांच्या त्या वक्तव्यावर नवनाथ बन भडकले; म्हणाले, तुम्ही पाकिस्तान..
राऊतांच्या त्या वक्तव्यावर नवनाथ बन भडकले; म्हणाले, तुम्ही पाकिस्तान...
LPG वाटपाबाबत केंद्राचा मोठा निर्णय, पेट्रोलियम मंत्रालयाकडून...
LPG वाटपाबाबत केंद्राचा मोठा निर्णय, पेट्रोलियम मंत्रालयाकडून....
अवकाळीच्या 'अवकृपे'ने शेतकरी हवालदिल, वाशिमच्या 729 हेक्टवरील पिकांचं
अवकाळीच्या 'अवकृपे'ने शेतकरी हवालदिल, वाशिमच्या 729 हेक्टवरील पिकांचं.
राष्ट्रवादीत पुन्हा ठिणगी! पटेलांच्या सभेत अजित पवारांचा फोटो नाहीच
राष्ट्रवादीत पुन्हा ठिणगी! पटेलांच्या सभेत अजित पवारांचा फोटो नाहीच.
भोंदू खरातचा पाय आणखी खोलात! आता शिर्डी पोलीस खरातचा ताबा मागणार, कारण
भोंदू खरातचा पाय आणखी खोलात! आता शिर्डी पोलीस खरातचा ताबा मागणार, कारण.
युद्धविरामाचा भारतावर काय परिणाम होणार? निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन
युद्धविरामाचा भारतावर काय परिणाम होणार? निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन.
युद्धविराम फसला? इराण-इस्त्रायलचे हल्ले सुरूच, होर्मूझ समुद्रधुनीबाबत
युद्धविराम फसला? इराण-इस्त्रायलचे हल्ले सुरूच, होर्मूझ समुद्रधुनीबाबत.
युद्धविरामाच्या घोषणेनंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण, सामान्या
युद्धविरामाच्या घोषणेनंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण, सामान्या.