AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रणवीरच्या ‘धुरंधर’बद्दल करीना कपूर जे म्हणाली ते ऐकून नेटकऱ्यांचा संताप अनावर

'धुरंधर : द रिव्हेंज' या चित्रपटाच्या तुफान यशादरम्यान आता अभिनेत्री करीना कपूरची प्रतिक्रिया समोर आली आहे. करीनाने या चित्रपटाबद्दल जे वक्तव्य केलं, त्यावरून नेटकरी तिला प्रचंड ट्रोल करत आहेत. ती नेमकं काय म्हणाली, ते जाणून घ्या..

रणवीरच्या 'धुरंधर'बद्दल करीना कपूर जे म्हणाली ते ऐकून नेटकऱ्यांचा संताप अनावर
Ranveer Singh and Kareena KapoorImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 09, 2026 | 8:38 AM
Share

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: त्सुनामी आणली आहे. या चित्रपटाच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांकडून जबरदस्त मिळाला आहे. बॉलिवूडपासून टॉलिवू़डपर्यंत.. अनेक कलाकार त्याचं तोंडभरून कौतुक करत आहेत. अशातच अभिनेत्री करीना कपूरच्या प्रतिक्रियेची सध्या जोरदार चर्चा आहे. करीनाने ‘धुरंधर’च्या यशाबद्दल जी प्रतिक्रिया दिली आहे, त्यावरून नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. ‘फायनान्शिअल टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत करीना म्हणाली की, “‘धुरंधर’ हा चित्रपट फक्त मुख्य अभिनेता रणवीर सिंहचा नाही, तर हा पूर्णपणे एका दिग्दर्शकाचा चित्रपट आहे. आजसुद्धा जेव्हा या चित्रपटाचा उल्लेख होतो, तेव्हा त्याला आदित्य धरचा ‘धुरंधर’ असं म्हटलं जातं.”

करीना कपूरच्या या वक्तव्यावर आता नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी तिच्या मताशी सहमती दर्शवली आणि या चित्रपटाच्या मागे दिग्दर्शकाची अधिक मेहनत होती, असं म्हटलं. तर काहींनी करीनावर पक्षपातीचा आरोप केला. ‘हिलासुद्धा धुरंधरचं यश पचलं नाही वाटतं. तिने रणवीर सिंहच्या मेहनतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे’, असं नेटकऱ्यांनी लिहिलं आहे. काहींनी करीनाला टोला लगावत म्हटलंय, ‘मग तर जब वी मेटसुद्धा इम्तियाज अलीचा चित्रपट आहे, करीनाचा नाही. या हिशोबाने रामायणसुद्धा फक्त नितेश तिवारी यांचा चित्रपट आहे, रणबीर कपूरचा नाही.’ अनेकांनी बॉलिवूडमध्ये असलेल्या रणवीर-रणबीर यांच्यातील तुलनेकडे लक्ष वेधलंय. “रणवीरला रणबीरच्या तुलनेत सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हटलं जातं, म्हणून ईर्षेतून तिने हे वक्तव्य केलंय”, असं नेटकऱ्यांनी म्हटलंय.

नेटकऱ्यांचे कमेंट्स-

‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली आहे. यामध्ये रणवीर सिंहने हमजा अली मजारी या गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. त्याच्यासोबत चित्रपटात आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, राकेश बेदी आणि सारा अर्जुन यांच्याही भूमिका आहेत. जसकीरत सिंह रंगी हा भारताचा गुप्तहेर बनून पाकिस्तानमधील ल्यारीमध्ये जातो आणि तिथे हमजा बनून राहू लागतो. 19 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर 2’ या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 1600 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे.

Follow Us
ई केवायसीच्या नावाखाली महिलेकडून शरीर सुखाची मागणी, जळगावातील घटनेने ख
ई केवायसीच्या नावाखाली महिलेकडून शरीर सुखाची मागणी, जळगावातील घटनेने ख.
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! पुढील 18 तास काही भागातील पाणी पुरवठा बंद
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! पुढील 18 तास काही भागातील पाणी पुरवठा बंद.
आढावा बैठकीत शेजारी बसूनही शिरसाट, सत्तारांचा अबोला, भर मंचावर...
आढावा बैठकीत शेजारी बसूनही शिरसाट, सत्तारांचा अबोला, भर मंचावर....
एका युगाचा अंत! अजरामर गीतांना स्वर देणाऱ्या आशाताईंचा अल्पपरिचय
एका युगाचा अंत! अजरामर गीतांना स्वर देणाऱ्या आशाताईंचा अल्पपरिचय.
आशा भोसले यांना अशोक सराफ यांनी वाहिली आदरांजली, म्हणाले त्यांचा आवाज
आशा भोसले यांना अशोक सराफ यांनी वाहिली आदरांजली, म्हणाले त्यांचा आवाज.
सुरांचा अमर आवाज हरपला... आशा भोसलेंच्या निधनावर देवेंद्र फडणवीसांचं भ
सुरांचा अमर आवाज हरपला... आशा भोसलेंच्या निधनावर देवेंद्र फडणवीसांचं भ.
संगीत क्षेत्रातला जादूई स्वर हरपला! ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निध
संगीत क्षेत्रातला जादूई स्वर हरपला! ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निध.
संजय राऊतांनी केले पाकिस्तानचे कौतुक, नेमकं काय म्हणाले? पाहा
संजय राऊतांनी केले पाकिस्तानचे कौतुक, नेमकं काय म्हणाले? पाहा.
मुंबईसह उपनगरात CNG च्या किमती वधारल्या, किती रुपयांवर पोहोचले दर?
मुंबईसह उपनगरात CNG च्या किमती वधारल्या, किती रुपयांवर पोहोचले दर?.
नाशिकमध्ये महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या संशयितांचे मोबाईल जप्त, सापडलेल्
नाशिकमध्ये महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या संशयितांचे मोबाईल जप्त, सापडलेल्.