AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘छावा’ बघून हंबरडा फोडणाऱ्या नटाच्या दैवतानं शंभूराजांच्या चारित्र्याचे वाभाडे..; किरण मानेंजी जोरदार टीका

'छावा' हा चित्रपट पाहिल्यानंतर अभिनेते शरद पोंक्षे यांनी तोंडभरून कौतुक केलं होतं. त्यावरून आता किरण मानेंनी पोस्ट लिहित पोंक्षेंवर निशाणा साधला आहे. 'छावा'सारख्या सुंदर सिनेमाचा भक्तपिलावळीनं प्रोपोगंडा म्हणून वापर करण्याचा हैदोस घातला आहे, असं त्यांनी म्हटलंय.

'छावा' बघून हंबरडा फोडणाऱ्या नटाच्या दैवतानं शंभूराजांच्या चारित्र्याचे वाभाडे..; किरण मानेंजी जोरदार टीका
Kiran Mane, Vicky Kaushal and Sharad PonksheImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 26, 2025 | 1:30 PM
Share

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेते शरद पोंक्षे यांनीसुद्धा हा चित्रपट पाहिल्यानंतर त्याचं आणि दिग्दर्शकांचं भरभरून कौतुक केलं होतं. चित्रपट पाहाताना रक्त खवळतं आणि डोळ्यातील अश्रू थांबत नाहीत, असं ते म्हणाले होते. यावरून आता अभिनेते किरण माने यांनी त्यांच्यावर सणसणीत टीका केली आहे. ‘छावा’ बघून हंबरडा फोडणाऱ्या मराठी नटाच्या दैवतानं शंभूराजांच्या चारित्र्याचे वाभाडे काढलेले आहेत, असं त्यांनी लिहिलंय. याबद्दल किरण मानेंनी सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सावरकरांच्या पुस्तकाचा संदर्भ दिला आहे.

किरण माने यांची पोस्ट-

‘तुकोबाराया म्हणतात : हिरा ठेवितां ऐरणीं । वांचे मारितां जो घणीं ।। तोचि मोल पावे खरा । करणीचा होय चुरा ।। ऐरणीवर ठेऊन, त्यावर घणाचा घाव घातला तरी जो भंग पावत नाही – फुटत नाही तोच खरा ‘हिरा’ ! घाव सोसूनही टिकणारा तोच मौल्यवान ठरतो. हिर्‍यासारख्या दिसणार्‍या काचेचा मात्र जागेवर चुरा होतो.

हा अभंग आठवायचं कारण म्हणजे आज छत्रपती संभाजी महाराजांसारखा शूरवीर, बदनामीच्या घणाचे घाव खाऊनसुद्धा अनमोल हिर्‍यासारखा तेजाने लखलखतउभा आहे, त्यांचं सत्त्व भंगलं नाही. याउलट त्यांना बदनाम करू पाहणार्‍यांच्या एका दणक्यात फुटून ठिकर्‍या उडाल्या आहेत. ‘छावा’सारख्या सुंदर सिनेमाचा भक्तपिलावळीनं प्रोपोगंडा म्हणून वापर करण्याचा हैदोस घातला आहे. पण त्याचवेळी काही अशा गोष्टी उघडकीला आल्या की भक्तांचा पर्दाफाश झाला.

एका मराठी नटानं हंबरडा फोडलावता, “औरंग्यानं शंभूराजांचा किती छळ केलाय ते पहाण्यासाठी हा सिनेमा बघा रे.” औरंग्या तर नीच होताच, पण याच नटाच्या दैवतानं मात्र छत्रपती संभाजी महाराजांच्या चारित्र्याचे वाभाडे काढलेले आहेत, हे समोर आलं. थोर साहित्यिक आणि कवी सावरकरांनी ‘हिंदूपदपादशाही’ या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची शिवरायांचा ‘शूर पण नाकर्ता पुत्र’ अशा शब्दांत बदनामी केलीय. याच पुस्तकात महाराजांबद्दल ते पुढे म्हणतात, “नेतृत्व चालविण्याच्या अयोग्यतेच्या जोडीला छत्रपती संभाजी महाराजांमध्ये रागीट स्वभाव नि मदिरा आणि मदिराक्षी यांच्याविषयी अत्यंत आसक्ती या दुर्गुणांची भर पडली होती.” आता यावर त्या नथूरामी नटाचं काय म्हणणं आहे?

आणि एक.. ’छावा’ पाहून ‘धर्मवीर धर्मवीर’ करत छाती बडवणाऱ्या भक्त पिलावळीचे एक ‘गुरुजी’ होते ते सरसंघचालक गोळवलकर. तर हे गोळवलकरजी आपल्या ‘Bunch of thoughts’ या पुस्तकात लिहितात – “Sambhaji was addicted to women and wine’. पुढे अजूनही बराच बदनामीकारक मजकूर आहे. नाटककार राम गणेश गडकरीने तर ‘राजसंन्यास’ नाटकात छत्रपती संभाजी महाजारांची अशीच भरपूर बदनामी केलेली आहे. म्हणूनच छत्रपती संभाजी उद्यानातनं त्याचा पुतळा उखडून टाकला होता. अशा काही औरंग्याच्या अवलादी होत्या ज्यांनी शंभूराजांवर क्रूर घाव घातलेत.

आता मला सांगा, हे जे ‘छावा’ बघून रागाने डोळे लाल करत आहेत, रडून ओरडून धिंगाणा घालत आहेत.. ते या बदनामीवर गिळून का गप्प आहेत? असो. पण या तिघांनाही देव मानणार्‍यांना आज बळेबळे का होईना छत्रपती संभाजी महाराजांवर प्रेम दाखवावं लागतंय. भक्तुल्ल्यांच्या दैवतांनी पुस्तकांत लिहिलेल्या शंभूराजांच्या बदनामीच्या सुरळ्या करून त्यांच्या दैवतांच्या तोंडात घुसवाव्या लागत आहेत, हे ही नसे थोडके!’ असं त्यांनी लिहिलंय. किरण माने यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Follow Us
पेट्रोल-डिझेलनंतर आता सीएनजी महाग; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले
पेट्रोल-डिझेलनंतर आता सीएनजी महाग; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले.
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग.....
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग......
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री.
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?.
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?.
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?.
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी.
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा..
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा...
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट....
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट.....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय.....