AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवघ्या 8 महिन्यांत लोकप्रिय मालिका गुंडाळतेय गाशा’; मुख्य अभिनेत्री भावूक

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका वर्षभराच्या आतच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. याआधी दोन वेळा या मालिकेची वेळ बदलण्यात आली होती. त्यानंतर आता ती थेट बंद होणार असल्याचं कळतंय. या मालिकेतल्या मुख्य अभिनेत्रीची भावूक पोस्ट व्हायरल होत आहे.

अवघ्या 8 महिन्यांत लोकप्रिय मालिका गुंडाळतेय गाशा'; मुख्य अभिनेत्री भावूक
लोकप्रिय मालिका गुंडाळतेय गाशाImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 01, 2026 | 11:32 AM
Share

छोट्या पडद्यावरील अनेक मालिका सुरू होतात आणि प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादानुसार, टीआरपीनुसार त्या किती काळ चालणार हे ठरवलं जातं. काही मालिका वर्षानुवर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरतात. तर काही मालिकांना अवघ्या काही महिन्यांतच गाशा गुंडालावा लागतो. स्टार प्रवाह वाहिनीवरील एका मालिकेसोबत असंच काहीसं घडलं आहे. वर्ष पूर्ण होण्याआधीच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर या नवीन वर्षात ती नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यासोबतच एक लोकप्रिय मालिक प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही मालिका येत्या 5 जानेवारीपासून संध्याकाळी 7.30 वाजता प्रसारित होणार आहे. त्यामुळे रेश्मा शिंदेच्या मालिकेची वेळ बदलण्यात आली आहे. रेश्मा शिंदेची मालिका आता रात्री 10.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परंतु रात्री 10.30 वाजता गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव यांची ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ ही मालिका प्रसारित केली जात होती. त्यामुळे या वेळी रेश्मा शिंदेची ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिका दाखवण्यात येणार असल्याने ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ ही बंद होणार असल्याचं समजतंय. याविषयी आता गिरीजा प्रभूची पोस्टसुद्धा चर्चेत आली आहे.

गिरीजा प्रभूची पोस्ट-

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या गाजलेल्या मालिकेतील गाजलेली जोडी म्हणजेच गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव हे ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ या नव्या मालिकेतून पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर एकत्र आले होते. ही मालिका 28 एप्रिल 2025 रोजी सुरू झाली होती. यामध्ये त्यांनी यश आणि कावेरीची भूमिका साकारली होती.

ही मालिका जेव्हा सुरू झाली, तेव्हा रात्री 8 वाजता प्राइम टाइमला ती प्रसारित करण्यात येत होती. परंतु नंतर तिची वेळ बदलून रात्री 11 वाजता करण्यात आली. काही दिवसांनंतर पुन्हा मालिकेची वेळ बदलण्यात आली. 11 वरून ही वेळ रात्री 10.30 वाजता करण्यात आली होती. अखेर या मालिकेनं आता प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. नुकताच सेटवर कलाकारांनी शेवटचा दिवस साजरा केला. गिरीजा प्रभूने ‘माझ्याकडे शब्द नाहीत..’ असं म्हणत सोशल मीडियावर रडण्याचे इमोजी पोस्ट केले आहेत. या मालिकेत गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव यांच्यासोबतच सुकन्या मोने, साक्षी महाजन, भाग्यश्री पवार, वैभव मांगले, नंदिनी वैद्य यांच्याही भूमिका होत्या.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...