AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवघ्या 8 महिन्यांत लोकप्रिय मालिका गुंडाळतेय गाशा’; मुख्य अभिनेत्री भावूक

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका वर्षभराच्या आतच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. याआधी दोन वेळा या मालिकेची वेळ बदलण्यात आली होती. त्यानंतर आता ती थेट बंद होणार असल्याचं कळतंय. या मालिकेतल्या मुख्य अभिनेत्रीची भावूक पोस्ट व्हायरल होत आहे.

अवघ्या 8 महिन्यांत लोकप्रिय मालिका गुंडाळतेय गाशा'; मुख्य अभिनेत्री भावूक
लोकप्रिय मालिका गुंडाळतेय गाशाImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 01, 2026 | 11:32 AM
Share

छोट्या पडद्यावरील अनेक मालिका सुरू होतात आणि प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादानुसार, टीआरपीनुसार त्या किती काळ चालणार हे ठरवलं जातं. काही मालिका वर्षानुवर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरतात. तर काही मालिकांना अवघ्या काही महिन्यांतच गाशा गुंडालावा लागतो. स्टार प्रवाह वाहिनीवरील एका मालिकेसोबत असंच काहीसं घडलं आहे. वर्ष पूर्ण होण्याआधीच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर या नवीन वर्षात ती नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यासोबतच एक लोकप्रिय मालिक प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही मालिका येत्या 5 जानेवारीपासून संध्याकाळी 7.30 वाजता प्रसारित होणार आहे. त्यामुळे रेश्मा शिंदेच्या मालिकेची वेळ बदलण्यात आली आहे. रेश्मा शिंदेची मालिका आता रात्री 10.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परंतु रात्री 10.30 वाजता गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव यांची ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ ही मालिका प्रसारित केली जात होती. त्यामुळे या वेळी रेश्मा शिंदेची ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिका दाखवण्यात येणार असल्याने ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ ही बंद होणार असल्याचं समजतंय. याविषयी आता गिरीजा प्रभूची पोस्टसुद्धा चर्चेत आली आहे.

गिरीजा प्रभूची पोस्ट-

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या गाजलेल्या मालिकेतील गाजलेली जोडी म्हणजेच गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव हे ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ या नव्या मालिकेतून पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर एकत्र आले होते. ही मालिका 28 एप्रिल 2025 रोजी सुरू झाली होती. यामध्ये त्यांनी यश आणि कावेरीची भूमिका साकारली होती.

ही मालिका जेव्हा सुरू झाली, तेव्हा रात्री 8 वाजता प्राइम टाइमला ती प्रसारित करण्यात येत होती. परंतु नंतर तिची वेळ बदलून रात्री 11 वाजता करण्यात आली. काही दिवसांनंतर पुन्हा मालिकेची वेळ बदलण्यात आली. 11 वरून ही वेळ रात्री 10.30 वाजता करण्यात आली होती. अखेर या मालिकेनं आता प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. नुकताच सेटवर कलाकारांनी शेवटचा दिवस साजरा केला. गिरीजा प्रभूने ‘माझ्याकडे शब्द नाहीत..’ असं म्हणत सोशल मीडियावर रडण्याचे इमोजी पोस्ट केले आहेत. या मालिकेत गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव यांच्यासोबतच सुकन्या मोने, साक्षी महाजन, भाग्यश्री पवार, वैभव मांगले, नंदिनी वैद्य यांच्याही भूमिका होत्या.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी.

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ