AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर कुमार विश्वास यांची पोस्ट चर्चेत

केजरीवाल यांची दिलासा देण्याची मागणी दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळताच ईडीच्या 12 जणांच्या पथकाने गुरुवारी संध्याकाळी त्यांच्या निवासस्थानी धडक दिली. उत्तर दिल्लीतल्या केजरीवाल यांच्या घराची झडती घेतल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर कुमार विश्वास यांची पोस्ट चर्चेत
कुमार विश्वास, अरविंद केजरीवालImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 22, 2024 | 10:57 AM
Share

दिल्लीतील मद्य गैरव्यवहारप्रकरणी गुरुवारी रात्री आम आदमी पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्रिपदावर असताना अटक करण्यात आलेले केजरीवाल हे पहिलेच नेते आहेत. अटकेपासून संरक्षण देण्याची केजरीवाल यांची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली होती. त्यानंतर गुरुवारी ईडीच्या पथकाने केजरीवाल यांच्या निवासस्थानाची झडती घेतली आणि रात्री त्यांना अटक केली. लोकसभा निवडणुकीच्या ऐन धामधुमीत केजरीवाल यांना झालेली अटक हा ‘आप’ला बसलेला मोठा हादरा मानला जात आहे. केजरीवाल यांच्या अटकेनंतर त्यांचे जुने सहकारी आणि प्रसिद्ध लेखक कुमार विश्वास यांची पोस्ट चर्चेत आली आहे.

केजरीवाल यांच्या अटकेचं वृत्त समोर येताच कुमार विश्वास यांनी एक्सवर (ट्विटर) स्वत:चा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये ते डोकं टेकून नमस्कार करताना दिसून येत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये कुमार विश्वास यांनी लिहिलं, ‘कर्मप्रधान विश्व रचि राखा | जो जस करहि सो तस फल चाखा|’ म्हणजेच या विश्वास कर्म हे सर्वांच्या वर आहे. जो जसा कर्म करतो, त्याला तसंच फळ मिळतं असा या ओळींचा अर्थ आहे. कुमार विश्वास यांच्याशिवाय भाजप खासदार मनोज तिवारी यांनीसुद्धा केजरीवाल यांच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे.

ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत मनोज तिवारी यांनी म्हटलंय, “अरविंद केजरीवाल यांच्याप्रकरणी अखेर तेच घडलं जे अपराध आणि भ्रष्टाचारप्रकरणी घडतं. भ्रष्टाचारी व्यक्तीने कितीही चलाखी केली तरी तो कायद्याच्या जाळ्यात अडकतोच. भ्रमाचं जाळं पसरवून सत्ता हातात घेतली आणि सत्ता मिळाल्यानंतर दिल्लीला लुटलं. त्या अरविंद केजरीवाल यांना दिल्लीतल्या लोकांची हाय लागली आहे.”

केजरीवाल यांच्या अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली आहे. तसंच तुरुंगात असतानाही केजरीवाल हेच मुख्यमंत्री राहतील, असं ‘आप’च्या नेत्या आतिशी यांनी स्पष्ट केलं. दिल्लीतील मद्य गैरव्यवहारप्रकरणी चौकशीसाठी ईडीने आतापर्यंत अनेकदा केजरीवाल यांना बोलावलं होतं. मात्र त्यांनी हजर राहण्यास नकार दिला होता. मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांना मुख्य आरोपी ठरवण्यात आलं असून हे दोघंही अबकारी शुल्क धोरण ठरवताना केजरीवाल यांच्या संपर्कात होते, असा ईडाचा दावा आहे.

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.