AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मनाचे श्लोक’चं नाव का बदललं? समोरच्यांना आणखी..; वादावर महेश मांजरेकर स्पष्टच म्हणाले

मृण्मयी देशपांडेच्या 'मनाचे श्लोक' या चित्रपटाच्या नावावरून वाद झाल्यानंतर तिने थेट नाव बदलण्याचा निर्णय घेतला. यावर आता महेश मांजरेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनेक कलाकारांनी पाठिंबा दिल्यानंतर मृण्मयीने थांबायला हवं होतं, असं ते म्हणाले.

'मनाचे श्लोक'चं नाव का बदललं? समोरच्यांना आणखी..; वादावर महेश मांजरेकर स्पष्टच म्हणाले
Mahesh Manjrekar on Manache ShlokImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 19, 2025 | 9:59 AM
Share

मृण्मयी देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित ‘मनाचे श्लोक’ या चित्रपटाच्या नावावरून मोठा वाद झाला. चित्रपटाच्या या नावामुळे भावना दुखावल्याची तक्रार काही हिंदुत्ववादी संघटनांनी केली. त्यानंतर पुणे, छत्रपती संभाजीनगर इथल्या थिएटरमधील या चित्रपटाचे शोज थांबवण्यात आले. मराठी सिनेसृष्टीतल्या अनेक कलाकारांनी मृण्मयीची साथ देत या वादाला विरोध केला होता. परंतु मृण्मयीने लगेच माघार घेत अखेर चित्रपटाचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ‘मनाचे श्लोक’ हा चित्रपट आता ‘तू बोल ना’ या नवीन नावाने थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या वादावर आता दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चित्रपटाचं नाव बदलायचं नव्हतं, असं मत त्यांनी मांडलंय.

काय म्हणाले महेश मांजरेकर?

“त्या चित्रपटाला पाठिंबा देण्यासाठी बरेच कलाकार पुढे आले. पण त्यांनी अवघ्या तासाभरात चित्रपटाचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला. ते का नाही थांबले? मी ‘शिक्षणाच्या आयचा घो’ चित्रपटाच्या वेळी शेवटपर्यंत थांबलो होतो. मी अजिबात नाव बदलणार नाही, असं स्पष्ट केलं होतं. कारण यामुळे समोरच्यांना आणखी प्रोत्साहन मिळतं की आपण यांच्यावर परत हल्ला केला की हे परत नाव बदलतील. ‘शिक्षणाच्या आयचा घो’ ही काही शिवी नव्हती. आयचा घो म्हणजे कोकणात ‘आईचा नवरा’. ही शिवी आहे असं काहींना वाटलं होतं. परंतु त्याने कुणाच्या भावना वगैरे दुखावल्या नव्हत्या आणि भावना दुखावणारं नाव मी ठेवतही नाही. तसंच ‘मनाचे श्लोक’ ही एक मनवा आणि श्लोक यांची गोष्ट होती. त्यांनी त्यावर ठाम राहायला पाहिजे होतं. जर सेन्सॉर बोर्डाने पास केलंय, तर कोणीही त्यावर आक्षेप घेऊ नये, असं माझं ठाम मत आहे. पण तुम्हीसुद्धा त्यावर ठाम राहा”, असं स्पष्ट मत महेश मांजरेकरांनी ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलं.

‘मनाचे श्लोक’ चित्रपटाचा वाद

सेन्सॉर बोर्ड आणि न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी दिल्यानंतरही काही संघटनांच्या वतीने चित्रपटाचं प्रदर्शन थांबवण्याचा प्रयत्न केला गेला. या सगळ्या गोंधळानंतर निर्मात्यांनी प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यासाठी कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, थिएटर्स आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होऊ नये, यासाठी मृण्मयीने नव्या नावासह चित्रपट पुन्हा सादर करण्याचा निर्णय घेतला.

या चित्रपटात मृण्मयी देशपांडे, राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब अशी तरुणांची तगडी फळी झळकणार आहे. तसंच लीना भागवत, मंगेश कदम, शुभांगी गोखले आणि उदय टिकेकर हे ज्येष्ठ कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील.

Follow Us
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला.

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला

IND vs ZIM: मॅचच्या 24 तासआधी झिम्बाब्वेने भारतीय संघाला दिलं ओपन चॅलेंज, अचानक मोठा निर्णय घेतला.

IND vs ZIM: मॅचच्या 24 तासआधी झिम्बाब्वेने भारतीय संघाला दिलं ओपन चॅलेंज, अचानक मोठा निर्णय घेतला

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report.

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report