AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मृण्मयी देशपांडेच्या ‘मनाचे श्लोक’ला इतका विरोध का? वादामागचं नेमकं कारण काय?

Manache Shlok : अभिनेत्री मृण्मयी देशपांडेच्या 'मनाचे श्लोक' या चित्रपटावरून सध्या मोठा वाद सुरू आहे. या चित्रपटाचे शोज थिएटरमध्ये जाऊन बंद पाडण्यात आले आहेत. त्यानंतर मृण्मयीने मोठा निर्णय घेतला आहे. हे संपूर्ण प्रकरण काय, ते सविस्तर वाचा..

मृण्मयी देशपांडेच्या 'मनाचे श्लोक'ला इतका विरोध का? वादामागचं नेमकं कारण काय?
Manache ShlokImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 13, 2025 | 10:39 AM
Share

मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित ‘मनाचे श्लोक’ या मराठी चित्रपटाचे शोज काही हिंदुत्ववादी संघटनांनी पुण्यासह विविध ठिकाणी गोंधळ घालून बंद पाडले. या पार्श्वभूमीवर मृण्मयी देशपांडेनं चित्रपटाचं प्रदर्शन तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी 16 ऑक्टोबरपासून हा चित्रपट नवीन नावासह पुन्हा प्रदर्शित करण्याची घोषणा तिने केली आहे. या चित्रपटावरून हा वाद का होत आहे आणि हिंदुत्ववादी संघटना या चित्रपटाला इतका विरोध का करत आहेत, ते समजून घेऊयात..

‘मनाचे श्लोक’ला विरोध का?

मृण्मयीने जरी तिच्या चित्रपटाचं नाव ‘मनाचे श्लोक’ असं दिलं असलं तरी याच नावाने समर्थ रामदारांनी अध्यात्मिक पुस्तक लिहिलं होतं. त्यामुळे चित्रपटाला असं नाव देऊ नये, असा मुद्दा मांडला जात आहे. तर दुसरीकडे या चित्रपटात लिव्ह-इन रिलेशनशिपसारखा वादग्रस्त मुद्दा मांडण्यात आल्याचंही म्हटलं गेलंय. त्यामुळे अशा विषयाच्या चित्रपटाला ‘मनाचे श्लोक’ हे नाव देऊन लोकांच्या भावना दुखावल्याची तक्रार केली जात आहे. आज ‘मनाचे श्लोक’ असं नाव देऊन त्यात लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दलची कथा दाखवली, उद्या ‘ज्ञानेश्वरी’ असं चित्रपटाचं नाव देत त्यात गौतमी पाटीलला नाचवतील, अशी टीका नेटकऱ्यांनी केली आहे.

महाराष्ट्र आणि छत्तीसगडचे हिंदू जनजागृती समितीचे निमंत्रक सुनील घनवट याविषयी म्हणाले, “शतकांपासून मनाचे श्लोक हे पुस्तक लाखो लोकांना धर्म, आत्म-शिस्त आणि भक्तीच्या मार्गावर मार्गदर्शन करथ आहे. या पूजनीय धर्मग्रंथाला नफा आणि मनोरंजनाचं साधन बनवणं अस्वीकार्य आहे. यामुळे कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत.”

चित्रपटाचं प्रदर्शन थांबवलं

‘मनाचे श्लोक’ चित्रपटाच्या प्रमाणपत्राला आणि प्रदर्शनाला स्थगिती द्यावी, अशी मागणी सज्जनगड इथल्या ‘समर्थ सेवा मंडळा’ने उच्च न्यायालयात केली होती. ती अमान्य झाल्यानंतर 10 ऑक्टोबरला चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित करण्यात आला. मात्र पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांनी थिएटरमध्ये जाऊन आक्षेप घेतला आणि गोंधळ घालत शोज बंद पाडले. त्यानंर मृण्मयी देशपांडेनं चित्रपटाचं प्रदर्शन थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रकरणी अनेक मराठी कलाकारांनी मृण्मयीला पाठिंबा दिला असून शोज बंद पाडणाऱ्यांचा तीव्र निषेध केला आहे.

Delhi Blast : मोठी अपडेट...एका संशयिताला पोलिसांनी घेतले ताब्यात
Delhi Blast : मोठी अपडेट...एका संशयिताला पोलिसांनी घेतले ताब्यात.
दिल्लीत खळबळ! शहांकडून सर्वात मोठी अपडेट, लालकिल्ला परिसरात घडलं काय?
दिल्लीत खळबळ! शहांकडून सर्वात मोठी अपडेट, लालकिल्ला परिसरात घडलं काय?.
राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'बाहेर गस्त वाढवली, कारण नेमकं काय?
राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'बाहेर गस्त वाढवली, कारण नेमकं काय?.
रूपाली पाटलांना 'तो' वाद भोवला थेट प्रवक्तेपद गेलं; मिटकरींचा पत्ता कट
रूपाली पाटलांना 'तो' वाद भोवला थेट प्रवक्तेपद गेलं; मिटकरींचा पत्ता कट.
दिल्लीत स्फोट नाही तर दहशतवादी हल्ला? पोलिसांकडून हादरवणारी माहिती
दिल्लीत स्फोट नाही तर दहशतवादी हल्ला? पोलिसांकडून हादरवणारी माहिती.
दिल्ली स्फोटानं हादरली, काय घडल? प्रत्यक्षदर्शीनं जे सांगितलं ते भयानक
दिल्ली स्फोटानं हादरली, काय घडल? प्रत्यक्षदर्शीनं जे सांगितलं ते भयानक.
दिल्लीत लाल किल्ला परिसरात कार स्फोटाने खळबळ, अनेक कारचे झाले नुकसान
दिल्लीत लाल किल्ला परिसरात कार स्फोटाने खळबळ, अनेक कारचे झाले नुकसान.
रूपाली चाकणकर हा अत्यंत शुद्र विषय...अंधारेंची जिव्हारी लागणारी टीका
रूपाली चाकणकर हा अत्यंत शुद्र विषय...अंधारेंची जिव्हारी लागणारी टीका.
अजिंक्य नाईक मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी, बिनविरोध निवड
अजिंक्य नाईक मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी, बिनविरोध निवड.
अंजली दमानियांच्या जीवाला धोका, गेम करण्याची कोणी केली भाषा?
अंजली दमानियांच्या जीवाला धोका, गेम करण्याची कोणी केली भाषा?.