AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘प्रचंड वाईट वाटतं जेव्हा…’, नको त्या गोष्टीचा सामना, मनिषा कोईरालाकडून मनातील खंत अखेर व्यक्त

Manisha Koirala: आयुष्यात नको त्या गोष्टीचा सामना केल्यानंतर मनिषा कोईराला म्हणाली, 'प्रचंड वाईट वाटतं जेव्हा...', अनेक वर्षांनंतर अभिनेत्रीकडून खंत व्यक्त..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मनिषा कोईराला हिच्या वक्तव्याची चर्चा...

'प्रचंड वाईट वाटतं जेव्हा...', नको त्या गोष्टीचा सामना, मनिषा कोईरालाकडून मनातील खंत अखेर व्यक्त
| Updated on: Nov 25, 2024 | 10:06 AM
Share

Manisha Koirala: गोव्यात सुरू असलेल्या 55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बॉलिवूडची व्हर्सेटाईल अभिनेत्री मनीषा कोईराला देखील सहभागी झाली होती. चित्रपट महोत्सवात अभिनेत्रीने अनेक वर्षांनंतर मनातील खंत बोलून दाखवली… सांगायचं झालं तर, गेल्या अनेक वर्षांपासून मनिषा बॉलिवूडपासून दूर आहे. पण ‘हीरामंडी’ सीरिजमुळे मनिषा हिला पुन्हा स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी मिळाली. दरम्यान ‘एकेकाळी अभिनेत्री होती…’ हा शब्द आपल्यासाठी वापरण्यात येत आहे… हे प्रचंड वाईट आहे… असं अभिनेत्री चित्रपट महोत्सवात म्हणाली. शिवाय इतर अभिनेत्रींबद्दल देखील मनिषाने वक्तव्य केलं आहे.

चित्रपट निर्माता विक्रमादित्य मोटवानी यांच्यासोबत कार्यक्रमात बोलत असताना मनिषाने मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. शिवाय ओटीटी प्लॅटफॉर्मचं भविष्य आणि ओटीटीचा कलाकार आणि वरिष्ठ कलाकारांवर काय प्रभाव पडेल यावर देखील त्यांनी चर्चा केली.

मनिषा म्हणाली, ‘एकेकाळी अभिनेत्री होती… हे शब्द प्रचंड वाईट आहेत आणि हे कायम महिला कलाकारांसोबत होतं. पण ओटीटीमुळे अनेक बदल झाले आहे. आज नीना गुप्ता यांसारख्या अभिनेत्रींनी नव्या संधी मिळत आहेत. आज नीना गुप्ता ओटीटीवर दमदार काम करत आहेत…’ असं मनिषा म्हणाली.

View this post on Instagram

A post shared by IFFI (@iffigoa)

सांगायचं झालं तर, दिग्दर्शत संजर लीला भन्सळी यांच्या ‘हीरामंडी’ सीरिजमध्ये मनिषा हिने वेश्यालयाच्या मालकिणीची भूमिका साकारली होती. अभिनेत्रीच्या भूमिकेचं नाव ‘मल्लिकाजान’ असं होतं. सीरिजमध्ये मनिषा हिच्यासोबत सोनाक्षी सिन्हा, अदिति राव हैदरी, ऋचा चड्ढा यांच्यासोबत अनेक सेलिब्रिटींनी महत्त्वाची भूमिका साकारली होती.

मनिषा कोईराला हिच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री सध्या ‘हीरामंडी: द डायमंड बाजार’ सीरिजच्या दुसऱ्या भागासाठी काम करत आहे. सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. चाहत्यांना देखील सीरिजच्या दुसऱ्या सीझनची प्रतीक्षा आहे.

मनिषा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, एक काळ असा होता जेव्हा बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत मनिषा हिचं नाव अव्वल स्थानी होतं. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत मनिषा हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आज मनिषा मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील मनिषाच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.