AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘प्रचंड वाईट वाटतं जेव्हा…’, नको त्या गोष्टीचा सामना, मनिषा कोईरालाकडून मनातील खंत अखेर व्यक्त

Manisha Koirala: आयुष्यात नको त्या गोष्टीचा सामना केल्यानंतर मनिषा कोईराला म्हणाली, 'प्रचंड वाईट वाटतं जेव्हा...', अनेक वर्षांनंतर अभिनेत्रीकडून खंत व्यक्त..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मनिषा कोईराला हिच्या वक्तव्याची चर्चा...

'प्रचंड वाईट वाटतं जेव्हा...', नको त्या गोष्टीचा सामना, मनिषा कोईरालाकडून मनातील खंत अखेर व्यक्त
| Updated on: Nov 25, 2024 | 10:06 AM
Share

Manisha Koirala: गोव्यात सुरू असलेल्या 55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बॉलिवूडची व्हर्सेटाईल अभिनेत्री मनीषा कोईराला देखील सहभागी झाली होती. चित्रपट महोत्सवात अभिनेत्रीने अनेक वर्षांनंतर मनातील खंत बोलून दाखवली… सांगायचं झालं तर, गेल्या अनेक वर्षांपासून मनिषा बॉलिवूडपासून दूर आहे. पण ‘हीरामंडी’ सीरिजमुळे मनिषा हिला पुन्हा स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी मिळाली. दरम्यान ‘एकेकाळी अभिनेत्री होती…’ हा शब्द आपल्यासाठी वापरण्यात येत आहे… हे प्रचंड वाईट आहे… असं अभिनेत्री चित्रपट महोत्सवात म्हणाली. शिवाय इतर अभिनेत्रींबद्दल देखील मनिषाने वक्तव्य केलं आहे.

चित्रपट निर्माता विक्रमादित्य मोटवानी यांच्यासोबत कार्यक्रमात बोलत असताना मनिषाने मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. शिवाय ओटीटी प्लॅटफॉर्मचं भविष्य आणि ओटीटीचा कलाकार आणि वरिष्ठ कलाकारांवर काय प्रभाव पडेल यावर देखील त्यांनी चर्चा केली.

मनिषा म्हणाली, ‘एकेकाळी अभिनेत्री होती… हे शब्द प्रचंड वाईट आहेत आणि हे कायम महिला कलाकारांसोबत होतं. पण ओटीटीमुळे अनेक बदल झाले आहे. आज नीना गुप्ता यांसारख्या अभिनेत्रींनी नव्या संधी मिळत आहेत. आज नीना गुप्ता ओटीटीवर दमदार काम करत आहेत…’ असं मनिषा म्हणाली.

View this post on Instagram

A post shared by IFFI (@iffigoa)

सांगायचं झालं तर, दिग्दर्शत संजर लीला भन्सळी यांच्या ‘हीरामंडी’ सीरिजमध्ये मनिषा हिने वेश्यालयाच्या मालकिणीची भूमिका साकारली होती. अभिनेत्रीच्या भूमिकेचं नाव ‘मल्लिकाजान’ असं होतं. सीरिजमध्ये मनिषा हिच्यासोबत सोनाक्षी सिन्हा, अदिति राव हैदरी, ऋचा चड्ढा यांच्यासोबत अनेक सेलिब्रिटींनी महत्त्वाची भूमिका साकारली होती.

मनिषा कोईराला हिच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री सध्या ‘हीरामंडी: द डायमंड बाजार’ सीरिजच्या दुसऱ्या भागासाठी काम करत आहे. सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. चाहत्यांना देखील सीरिजच्या दुसऱ्या सीझनची प्रतीक्षा आहे.

मनिषा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, एक काळ असा होता जेव्हा बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत मनिषा हिचं नाव अव्वल स्थानी होतं. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत मनिषा हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आज मनिषा मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील मनिषाच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

Follow Us
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी..
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी... 'या' क्षेत्रात होणार बदल
पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
Independence Day 2026 | पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं - पंतप्रधान मोदी
PM Narendra Modi : स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं, पंतप्रधान मोदींकडून भारताच्या प्रगतीवर भर
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा