AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्या राय सोबत घटस्फोटांच्या चर्चांवर अभिषेकची स्पष्ट भूमिका; म्हणाला, ‘मी काहीही बदलू शकत नाही…’

Abhishek Bachchan on Divorce rumours: ऐश्वर्या राय - अभिषेक बच्चन यांचा होणार घटस्फोट? अभिनेता असं का म्हणाला? 'मी काहीही बदलू शकत नाही...', गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या - अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे...

ऐश्वर्या राय सोबत घटस्फोटांच्या चर्चांवर अभिषेकची स्पष्ट भूमिका; म्हणाला, 'मी काहीही बदलू शकत नाही...'
| Updated on: Nov 25, 2024 | 9:11 AM
Share

Abhishek Bachchan on Divorce rumours: अनेक महिन्यांपासून अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. अनेक वर्ष एकत्र संसार केल्यानंतर ऐश्वर्या – अभिषेक आता विभक्त होतील का? असा प्रश्न चाहते सतत विचारत आहेत. पण घटस्फोटाच्या चर्चांवर दोघांनी देखील आतापर्यंत मौन बाळगलं आहे. पण अभिषेक याने ‘आय वॉन्ट टू टॉक’ सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान रंगणाऱ्या चर्चांमुळे झालेल्या समस्यांबाबत मोठा खुलासा केला आहे.

नुकताच झालेल्या मुलाखतीत अभिषेक बच्चन म्हणाला. ‘आयुष्यात कितीही अडचणी आल्यातरी व्यक्तीसा आशेच्या किरणाचा शोध घ्यायला हवा… ‘ सध्या अभिनेता आयुष्यात सुरु असलेल्या नकारात्मक गोष्टींचा सामना करत आहे. अभिषेक म्हणाला, ‘हिंदीमध्ये एक शब्द आहे… ‘दृढता’… कुठे न कुठे… एक व्यक्तीच्या रुपात तुम्ही कोण आहात हे कधीही बदलू नये. स्वतःचे मूलतत्त्व कधीही बदलू नये…’

पुढे अभिषेक म्हणाला, ‘जर वाईट वाईटाला सोडत नाही तर, आपण आपला चांगूलपणा का सोडवा? मी जे काही आहे त्याला बदलू शकत नाही. मी एक सकारात्मक व्यक्ती आहे. नकारात्मक गो।ष्टींवर मी लक्ष देत नही. जर तुम्ही नकारात्मक गोष्टींकडे लक्ष देता तेव्हा त्याच नकारात्मक गोष्टी तुमच्यावर वरचढ ठरतात…’ असं देखील अभिनेता म्हणाला.

‘कठीण काळात तर तुम्हाला आशेचं किरण दिसत असेल, तर त्याला पकडून ठेवा… कारण त्यामुळेच तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी योग्य दिशा मिळेल… आजकाल लोकांसाठी अंधारात आणि नकारात्मकतेत हरवून जाणे खूप सोपे आहे… अडथळे काहीही असोत, तुमचा आशेचा किरण शोधा…’ असं देखील अभिषेक बच्चन म्हणाला.

ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चन लग्न

ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चन यांच्या लग्नाला 17 वर्ष पूर्ण झाली आहे. 2007 मध्ये ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चन यांनी लग्न केलं. दोघांना एक मुलगी आराध्या देखील आहे. आराध्या हिला कायम आई ऐश्वर्या हिच्यासोबत स्पॉट केलं जातं. गेल्या काही दिवसांपासून अभिषेक दोघींसोबत दिसत नसल्यामुळे ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे.

अजित पवार यांचं स्वप्न पूर्ण करायचयं! सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर
अजित पवार यांचं स्वप्न पूर्ण करायचयं! सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर.
कोश्यारींच्या विधानाने नवा राजकीय वाद; राऊतांचा जोरदार पलटवार
कोश्यारींच्या विधानाने नवा राजकीय वाद; राऊतांचा जोरदार पलटवार.
राज्यपाल कोट्यातील रिक्त जागा लवकरच भरणार?
राज्यपाल कोट्यातील रिक्त जागा लवकरच भरणार?.
विलीनीकरण हीच दादांना खरी श्रद्धांजली! शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया
विलीनीकरण हीच दादांना खरी श्रद्धांजली! शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया.
कामं नाही केलीत तर बघतोच; गणेश नाईक पालिका अधिकाऱ्यांवर संतापले
कामं नाही केलीत तर बघतोच; गणेश नाईक पालिका अधिकाऱ्यांवर संतापले.
... तेव्हाच एक खोक्याचा पुरावा देऊ! संदीप देशपांडेंचं मोठं वक्तव्य
... तेव्हाच एक खोक्याचा पुरावा देऊ! संदीप देशपांडेंचं मोठं वक्तव्य.
तर मी राजीनामा देईन...; एसीबीच्या धडक कारवाईनंतर झिरवळांचं मोठं विधान
तर मी राजीनामा देईन...; एसीबीच्या धडक कारवाईनंतर झिरवळांचं मोठं विधान.
उपमुख्यमंत्री शिंदे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल
उपमुख्यमंत्री शिंदे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल.
त्यांनी अमेरिकेत जाऊन ट्रम्पची भांडी घासावी; राऊतांची खरमरीत टीका
त्यांनी अमेरिकेत जाऊन ट्रम्पची भांडी घासावी; राऊतांची खरमरीत टीका.
भंडाऱ्याच्या वैनगंगा नदी पुलाची दुरावस्था, प्रवाशांचा जीव धोक्यात
भंडाऱ्याच्या वैनगंगा नदी पुलाची दुरावस्था, प्रवाशांचा जीव धोक्यात.