AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | मामाचा फोन घेतला नाही, कॉलबॅक राहिला, दुसऱ्या दिवशी मामा गेला, पुष्कर जोग बोलता बोलता रडायला लागला

कॉल मेसेज तर कधीच कुणाचा मिस करु नका, अशी कळकळीची विनंती पुष्कर जोगने केली. (Pushkar Jog cries remembering Uncle)

VIDEO | मामाचा फोन घेतला नाही, कॉलबॅक राहिला, दुसऱ्या दिवशी मामा गेला, पुष्कर जोग बोलता बोलता रडायला लागला
Pushkar Jog cries remembering Uncle
| Updated on: May 14, 2021 | 10:47 AM
Share

मुंबई : ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog) याच्या मामांचे नुकतेच निधन झाले. मामाचा फोन उचलू शकलो नाही, त्याला कॉल बॅक करायचा राहिला, आणि दुसऱ्याच दिवशी मामा सोडून गेल्याची दुःखद बातमी आली, असं सांगताना पुष्कर जोग हळवा झाला. या कठीण काळात प्रियजनांच्या संपर्कात राहा, असं आवाहन पुष्करने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना केलं. (Marathi Actor Pushkar Jog cries remembering Mama on Instagram Live reel video while telling sudden death of Uncle)

“हा काळ आपल्या सर्वांसाठी प्रचंड कठीण आहे, तेव्हा हेवेदावे, रुसवे फुगवे, वैचारिक मतभेद सर्व काही प्लिज प्लिज बाजूला ठेवा आणि आपल्या नातेवाईक, मित्र परिवार आणि आप्त स्वकीयांसह संपर्कात रहा. कॉल मेसेज तर कधीच कुणाचा मिस करू नका” अशी  कळकळीची विनंती पुष्करने केली.

काय म्हणाला पुष्कर जोग?

“13 एप्रिल म्हणजे पाडव्याच्या दिवशी मला माझ्या गोव्याच्या मामाचा फोन आला. मला म्हणाला कसा आहेस, मुंबईची परिस्थिती कशी आहे, काळजी घे. नुकतीच माझी एक फिल्म रिलीज झाली होती. मी त्याला विचारलं, मामा माझा सिनेमा कधी बघणार आहेस? तो म्हणाला माझ्याकडे ओटीटी चॅनेल नाहीये, मी म्हटलं हरकत नाही मामा, दोन-तीन महिन्यांनंतर चॅनेलवर फिल्म येईल, तेव्हा तू बघ” असं फोनवरील संभाषण पुष्करने सांगितलं

“गोव्याचा सतीशमामा गेला”

“त्यानंतर 21 एप्रिलला सकाळी 8 वाजता मामाचा मला परत फोन आला. मला लवकर उठायची सवय नसल्यामुळे मी त्याचा फोन उचलू शकलो नाही. त्याच दिवशी त्याला कॉल बॅक करणं राहून गेलं. 22 एप्रिलला, म्हणजे त्याच्याच दुसऱ्या दिवशी मला माझ्या कुटुंबाकडून समजलं की गोव्याचा सतीशमामा गेला.” असं सांगतानाच पुष्करला अश्रू अनावर झाले.

“खूप वाईट वाटलं, मी त्याचा फोन का नाही उचलला. आपण नेहमी, आपल्या मित्र-नातेवाईकांचा फोन येतो, तेव्हा म्हणतो, जाऊदे नंतर करु. असं नका करु, आता मिस्ड कॉल नको, कॉल बॅक करा, त्यांना विचारा, कसे आहात, सगळं व्यवस्थित आहे ना, त्यांना सांगा आम्ही आहोत.” असं आवाहन पुष्करने चाहत्यांना केलं.

“आपली माणसं न सांगताच सोडून चालली”

“हल्ली कोरोनामुळे इतकी भीती निर्माण झाली आहे, की आपली माणसं न सांगताच सोडून चालली आहेत. त्यांना फोन करा, कठीण काळात एकमेकांसोबत असल्याचं सांगा. आपण सगळे एकत्र राहूया, एकमेकांना मदत करुया, कृपा करुन कोणाशी वाईट वागू नका, सगळ्यांशी चांगले राहा” असंही पुष्कर म्हणाला. (Pushkar Jog cries remembering Uncle)

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

VIDEO | लोक म्हणायचे, तू देवाचं करतेस, तुझ्या मुलीच्या आयुष्यात असं का व्हावं? तेजश्री प्रधानच्या आईचं मन जिंकणारं उत्तर

VIDEO | ‘येऊ कशी तशी…’च्या सेटवर ‘शकू’साठी पत्र, शुभांगी गोखलेंसह सगळ्यांच्या डोळ्याला धार

(Marathi Actor Pushkar Jog cries remembering Mama on Instagram Live reel video while telling sudden death of Uncle)

Follow Us
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.