AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘The kerala story ची वनलाईन रामदास स्वामींनी शेकडो वर्षांपूर्वी लिहिली…’ मराठी अभिनेत्याचं मोठं वक्तव्य

‘द केरळ स्टोरी’सिनेमाची कथा शेकडो वर्षांपूर्वी समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिली आहे....', मराठी अभिनेत्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल

'The kerala story ची वनलाईन रामदास स्वामींनी शेकडो वर्षांपूर्वी लिहिली...' मराठी अभिनेत्याचं मोठं वक्तव्य
| Updated on: May 10, 2023 | 12:15 PM
Share

मुंबई : अभिनेत्री अदा शर्मा स्टारर ‘द केरळ स्टोरी’(The Kerala Story) सिनेमाची चर्चा सध्या देशभरात रंगत आहे. ५ मे रोजी सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर अनेक ठिकाणी सिनेमाचा विरोध करण्यात आला. अनेक ठिकाणी सिनेमाचं प्रदर्शन देखील रोकण्यात आलं. एवढंच नाही तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी या सिनेमावर बंदी घालण्याची घोषणा केली. त्यांनी बंदी घोषित केल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला. अनेक क्षेत्रातील लोक सिनेमाबद्दल स्वतःचं मत व्यक्त करत असताना अभिनेते योगेश सोमण यांनी सिनेमाचा संबंध थेट रामदास स्वामींशी जोडला आहे. योगेश सोमण यांनी फेसबूकवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. सध्या त्यांची पोस्ट सोशल मिडीयावर चर्चेत आहे.

योगेश सोमण म्हणाले, ‘दोन दिवसांपूर्वी द केरळ स्टोरी सिनेमा प्रदर्शित झाला आणि इंटरनेटवर किंवा इतर माध्यमांवरुन त्याच्यावर गदारोळ उठला.. कहीजणांनी त्याचं गांभीर्य लोकांना सांगितलं… काही लोकांनी त्याची सत्य – असत्यता याबाबत आपले विचार मांडले आणि अचानक माझ्या हाती रामदास स्वामी यांच्या अस्मानी सुलतानीच्या चार ओळी आल्या. मी तर म्हणेल की, केरळ स्टोरीची वनलाईन शेकडो वर्षांपूर्वी रामदास स्वामी यांनी लिहून ठेवली आहे.’

योगेश सोमण पुढे म्हणाले, ”किती गुजरिणी, ब्राह्मीणी भ्रष्टविल्या… किती शांबूखी जहाजी फाकविल्या… किती एक देशांतरी त्या विकिल्या… किती सुंदरा हाल होऊनी मेल्या… या चार ओळींमध्ये समर्थ रामदास स्वामी यांनी केरळ स्टोरीची वनलाईन शेकडो वर्षांपूर्वी लिहिल ठेवल्या आहेत…’ सध्या योगोश सोमण यांचा व्हिडीओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे.

एवढंच नाही तर, योगेश सोमण यांनी प्रत्येक शब्दाचा अर्थ देखील सांगितला आहे. शांबूखी शब्दाचा अर्थ सांगताना ते म्हणाले, ‘शांबूही’ हा शब्द ‘शहामुखी’ या शब्दाचा अपभ्रंश आहे, तर ‘फाकविल्या’ म्हणजे पाठविल्या.’ सध्या सर्वत्र योगेश सोमण यांच्या व्हिडीओची चर्चा रंगत आहे.

नक्की काय आहे ‘द केरळ स्टोरी’ ?

‘द केरळ स्टोरी’ सिनेमा त्या अहवालांवर आधारित आहे ज्यानुसार केरळमधील सुमारे ३२  हजार महिलांना बळजबरीने इस्लाममध्ये धर्मांतरित करण्यात आलं आणि अनेकांना ISIS अंतर्गत सीरियात नेण्यात आलं. सिनेमाचे निर्माते म्हणतात की हा सिनेमा सत्य घटनांवर आधारित आहे आणि त्यामुळे तो अनेक वादांनी घेरला आहे…. सध्या सर्वत्र ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाची चर्चा रंगत आहे. सिनेमाने पाच दिवसांत ५० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.