AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आतला जाळ मोकळा करत राहावं माणसांनी’, नागराजनं सांगितलं की, “सिनेमा काढून समाज…”

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी कविता आणि सिनेमांबाबत आपलं मत मांडलं आहे. ‘आतला जाळ मोकळा करत राहावं माणसांनी’, असं नागराज मंजुळे म्हणाले आहेत.

‘आतला जाळ मोकळा करत राहावं माणसांनी’, नागराजनं सांगितलं की, सिनेमा काढून समाज…
नागराज मंजुळे, दिग्दर्शक
| Updated on: Mar 14, 2022 | 1:46 PM
Share

मुंबई : दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचे सिनेमे समाजाला अंतर्मुख करणारे असतात. पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या तरी आजही तितक्याच ताज्या वाटणाऱ्या प्रश्नावर नागराज मंजुळे यांचे सिनेमे भाष्य करतात. त्यांचा ‘झुंड’ (Jhund) हा सिनेमा झोपडपट्टीतील मुलं आणि तिथल्या लोकांचं आयुष्य यावर हा सिनेमा बेतलेला आहे. हा सिनेमा सध्या बॉक्सऑफिस गाजवत असताना नागराज यांनी कविता आणि सिनेमांबाबत आपलं मत मांडलं आहे. ‘आतला जाळ मोकळा करत राहावं माणसांनी’, असं नागराज मंजुळे म्हणाले आहेत. तसंच “सिनेमा काढून समाज बदलत नाही,” असंही नागराज म्हणाले. पुणे कविसंमेलनात आणि कविसंमेलनानंतरच्या बैठकीत ते बोलत होते.

“जी आत्ता आहे ती संस्कृती हलकट आहे.पण तिचं वय खूप जुनं आहे आणि तुम्ही तिच्याशी जुन्याच शस्त्रांनी लढताय.कवितेने किंवा सिनेमांनी समाज बदलेल असं तुम्हाला वाटतं.पण लय भाबडे लोक आहात तुम्ही. तसं काही होणार नाही. पण आपण लढत रहायला हवं. मी कवितेतून किंवा सिनेमातून फक्त मोकळा होत असतो आणि त्याचे पैसेही मिळतात, ही गोष्ट मला खूप नंतर कळली. कवी होणं किंवा दिग्दर्शक होणं ही माझी कधीच महत्त्वाकांक्षा नव्हती. पण आतला जाळ मोकळा करत रहावं माणसांनी… लय थंडावा मिळतो जिवाला…”, असं नागराज मंजुळे म्हणाले आहेत.

नागराज मंजुळे यांच्या सिनेमांइतकंच त्यांच्या कविताही प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कविता मनात घर करतात. उन्हाच्या कटाविरूद्ध हा त्यांचा काव्यसंग्रहही प्रसिद्ध झाला आहे.त्याच्या अनेक कविता प्रसिद्ध आहेत. त्यातील त्याच्या मनातील ‘कोलाहल’ दाखवणारी कविता…

माझ्या हाती नसती लेखणी तर…तर असती छिन्नी सतार, बासरी अथवा कुंचला मी कशानेही उपसतच राहिलो असतो हा अतोनात कोलाहल मनातला…

नागराज यांची ‘मित्र’ ही कविताही अनेकांच्या मनात घर करून आहे. नागराज म्हणतात…

आम्ही दोघे मित्र एकमेकांचे जिवलग… एकच ध्येय, एकच स्वप्न घेऊन जगणारे पुढे त्याने आत्महत्या केली आणि मी कविता लिहिली…

संबंधित बातम्या

‘आता आपण फक्त दिवस मोजायचे’; प्रवीण तरडेंचा ‘सरसेनापती हंबीरराव’ ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

‘द काश्मीर फाईल्स’च्या पल्लवी जोशी, विवेक अग्निहोत्रींविरोधात काढण्यात आला फतवा

मोबाईलमध्ये शूट झालेला ‘पॉंडीचेरी’ सिनेमा आता ओटीटीवर, 18 मार्चपासून ‘प्लॅनेट मराठी’वर पाहता येणार

Follow Us
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात.
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.