AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Ponkshe Post | आधी आरोपांच्या फैरी झाडल्या, आता शरद पोंक्षेंची पोस्ट डिलीट, नेमकं प्रकरण काय?

मराठी मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) पुन्हा एकदा त्यांच्या पोस्टमुळे चर्चेत आले आहेत. शरद पोंक्षे यांनी ब्राह्मण संघाच्या आनंद दवे (Anand Dave) यांच्यावर काही आरोप केले होते.

Sharad Ponkshe Post | आधी आरोपांच्या फैरी झाडल्या, आता शरद पोंक्षेंची पोस्ट डिलीट, नेमकं प्रकरण काय?
Sharad Ponkshe
| Edited By: | Updated on: Dec 06, 2021 | 3:48 PM
Share

मुंबई : मराठी मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) पुन्हा एकदा त्यांच्या पोस्टमुळे चर्चेत आले आहेत. शरद पोंक्षे यांनी ब्राह्मण संघाच्या आनंद दवे (Anand Dave) यांच्यावर काही आरोप केले होते. आनंद दवे यांनी आपली आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप केला होता. एका कार्यक्रमासाठी बोलावून हॅाटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन देऊन, त्यासाठीचे बील न भरल्याने आपल्याला त्रास झाल्याचे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले होते.

शरद पोंक्षे यांची ही सोशल मीडिया पोस्ट व्हायरल झाल्यानंतर डिलीट करण्यात आली आहे. मात्र, आता या पोस्ट वरून चर्चा रंगल्या आहेत.

काय होती पोस्ट?

‘माझ्या मी व नथुराम ह्या पुस्तकाच्या 8 व्या आवृत्तीचं लोकार्पण पुण्यातील श्री आनंद दवे ह्यांनी त्यांच्या ब्राह्मण महासंघातर्फे करायचं ठरवलं. त्यासाठी आम्ही मी व प्रकाशक पार्थ बावस्कर पुण्यात पोहोचलो. हॉटेलवर कृष्णा रेसिडेंसीवर दोन खोल्या दवेंनी बूक केल्या. कार्यक्रम संपवून आम्ही घरी परतलो. या घटनेला महिना होऊन गेला तरी आजतागयात दवेंनी कृष्णा हॉटेलचे पैसे भरलेले नाहीत, व ते फोनही ऊचलत नाहीत.’

‘ब्राह्मण संघातर्फे कार्यक्रम केला म्हणून मी हो म्हटले पण हा माणूस मला नेहमीच डँबीस आहे असा संशय होताच त्याने ते सिध्द केले. अखेर प्रकाशकांनी ते पैसे भरले. तेव्हा सर्वांनी दवे बरोबर कोणताही व्यवहार करू नये ही विनंती, सोबत त्याचा फोटो देत आहे. तसेच समस्त ब्राह्मण संघातील सभासदांनी सावध रहावे’, अशी पोस्ट त्यांनी लिहिली होती, जी आता काढून टाकण्यात आली आहे.

ब्राह्मण संघ आणि याचा काही संबंध नाही!

शरद पोंक्षे यांची ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर एका वेबसाईटशी बोलताना आनंद दवे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली. याविषयी बोलताना आनंद दवे म्हणाले की, ‘या रूम बुकिंगचा आणि ब्राह्मण सेवा संघाचा काहीही सबंध नाही. शरद पोंक्षेंचे दोन कार्यक्रम ब्राह्मण संघाने घेतले होते. या कार्यक्रमासाठी आवश्यक असलेला हॉल, साहित्य आणि इतर गोष्टींची पूर्तता करण्याची जबाबदारी ब्राह्मण संघाची होती आणि त्यांनी ती पूर्ण देखील केली.’

आता शरद पोंक्षे यांनी देखील त्यांची पोस्ट आपल्या वॉलवरून हटवली आहे. त्यामुळे हा वाद आता मिटला असावा, किंवा यावर तोडगा निघाला असावा असे म्हटले जात आहे.

हेही वाचा :

Janhvi Kapoor | परी म्हणू की सुंदरा… जान्हवी कपूरच्या दिलखेचक अदा पाहून चाहतेही घायाळ!

Priya Bapat | ‘मैं भी गुलाबी तू है गुलाबी, दिन भी गुलाबी है गुलाबी ये कहर…’, प्रिया बापटच्या स्मायलिंग अंदाजावर खिळल्या नजरा!

RRR Movie | प्रदर्शनापूर्वीच RRR चित्रपटाचा नवा विक्रम! अमेरिकेतील बहुसंख्य मल्टिप्लेक्समध्ये प्रदर्शित होणारा पहिला भारतीय चित्रपट!

Follow Us
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.