AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सतीश कौशिक यांच्या हत्येचा दावा करणाऱ्या महिलेला कोर्टाने बजावले समन्स, पत्नीने केली होती तक्रार

दिवंगत बॉलिवूड अभिनेते-दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे 9 मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर दिल्लीतील एका महिलेने त्यांची हत्या झाल्याचा दावा केला होता.

सतीश कौशिक यांच्या हत्येचा दावा करणाऱ्या महिलेला कोर्टाने बजावले समन्स, पत्नीने केली होती तक्रार
Image Credit source: instagram
| Updated on: May 20, 2023 | 11:31 AM
Share

Satish Kaushik : दिवंगत अभिनेते-दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या निधनाला (Satish Kaushik death) दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. सतीश कौशिक यांचे 9 मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर दिल्लीतील एका महिलेने मीडियाशी बोलताना सतीश कौशिक यांची हत्या झाल्याचा (claimed murder) दावा केला होता. त्यानंतर सतीश यांच्या पत्नीने त्या महिलेविरुद्ध मानहानीची तक्रार दाखल केली. याप्रकरणी दंडाधिकारी न्यायालयाने त्या महिलेला समन्स जारी केला आहे.

या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 जून रोजी होणार आहे. न्यायालयाने दिल्लीतील सान्वी मालू या महिलेसोबत राजेंद्र छाबरा नावाच्या व्यक्तीलाही समन्स बजावले आहे. सतीश कौशिक यांची पत्नी शशीने गेल्या महिन्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले होते की, वैद्यकीय अहवालात स्पष्टपणे निष्कर्ष काढण्यात आला आहे. ज्यामध्ये त्यांचा मृत्यू नैसर्गिक होता आणि त्यात मृत्यूसाठी कोणताही कट रचलेला नव्हता, असे नमूद करण्यात आले होते.

सतीश कौशिक यांच्या पत्नीने केलेल्या तक्रारीत असेही म्हटले आहे की, त्या महिलेने केलेले विधान बदनामीकारक होते. आणि त्यामुळे यशस्वी चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि अभिनेता असलेल्या कौशिक यांच्या प्रतिष्ठेला कधीही भरून न येणारी हानी पोहोचवण्याच्या उद्देशाने ते विधान करण्यात आले होते. मात्र, महिलेने लावलेल्या आरोपांमध्ये कोणालाच तथ्य दिसत नाही. मात्र आता याप्रकरणी न्यायालय काय निर्णय घेते, याचे उत्तर 15 जूनलाच मिळणार आहे.

सतीश यांचं निधन नव्हे तर हत्या झाल्याचा दावा सन्वी मालू यांनी केला होता. सान्वी मालू अभिनेते सतीश कौशिक यांचे मित्र विकास मालू यांच्या पत्नी आहेत. विकास यांनी सतीश यांच्याकडून १५ कोटी रुपये घेतल्याचा दावा सान्वी मालू यांनी केला. एवढंच नाही तर, सतीश सतत पैसे मागत असल्यामुळे विकास यांनी सतीश यांची हत्या केल्याचा गंभीर आरोप सान्वी यांनी पतीवर केला

Follow Us
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदत
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
मुंबई महापालिकेकडून शालेय साहित्य वाटपास विलंब: इराण युद्ध कारणीभूत
मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
शिल्पा गवारे कुटुंबीयांकडून छळाचा आरोप, न्यायची मागणी
पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी पार
Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी, काय सुनावणी घडलं?
नेपाळ पुराचा बिहारला फटका: पाटणा, चंपारण, गोपाळगंज, सारणमध्ये सतर्कता
नेपाळमधील महापुराचा बिहारला फटका: गंगा नदीकाठच्या झोपड्या पाण्याखाली
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार मागणाऱ्या लेकाला पालकांनीच संपवलं
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात; सांस्कृतिक सोहळ्यांमध्ये सहभाग
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर...
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश