AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RCB च्या विजयानंतर विराट कोहलीसाठी मंदिर बांधणार हा प्रसिद्ध अभिनेता?

तब्बल 18 वर्षांनंतर विराट कोहलीची स्वप्नपूर्ती झाली आहे. पंजाब किंग्जविरुद्ध आयपीएलच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने हा विजय मिळवला आहे. जर हा सामना आरसीबीने जिंकला तर मी विराट कोहलीचं मंदिर बांधेन, असं एका अभिनेत्याने म्हटलं होतं.

RCB च्या विजयानंतर विराट कोहलीसाठी मंदिर बांधणार हा प्रसिद्ध अभिनेता?
Virat Kohli Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 04, 2025 | 8:46 AM
Share

विराट कोहली आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूची 18 वर्षांपासूनची आयपीएल जेतेपदाची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली. बेंगळुरू टीमने मंगळवारी झालेल्या अंतिम लढतीत पंजाब किंग्जला सहा धावांनी पराभूत करत अखेर जेतेपदाची चव चाखली. या विजयासह विराट कोहलीचीही स्वप्नपूर्ती झाली. गेल्या 18 वर्षांपासून तो RCB टीमसोबतच आयपीएलमध्ये खेळत होता. या 18 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर त्याला मंगळवारी विजय अनुभवता आला. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि पंजाब किंग्जच्या या अंतिम सामन्यासाठी क्रिकेटप्रेमी प्रचंड उत्साही होते. हा सामना सुरू होण्यापूर्वी एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याने म्हटलं होतं की आरसीबीने ही मॅच जिंकली तर तो विराट कोहलीसाठी मंदिर बांधणार आणि विजय माल्याचे सर्व कर्ज फेडणार. आता RCB च्या या विजयानंतर त्या अभिनेत्याचं हे वक्तव्य सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे.

विराट कोहलीचं मंदिर बांधणार असं वक्तव्य करणारा हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून नकुल मेहता आहे. नकुलने ‘इश्कबाज’, ‘बडे अच्छे लगते है’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. आयपीएलच्या अंतिम सामन्यापूर्वी त्याने सोशल मीडियावर स्वत:चा व्हिडीओ पोस्ट केला. त्यात अत्यंत उत्साहाने तो म्हणाला, “अखेर 18 वर्षांनंतर तो दिवस आला, जेव्हा आपण तो विजयचा कप उचलणार. मिस्टर 18 (कोहली) हा निर्विवादपणे आयपीएल क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे आणि तो यंदा पहिली ट्रॉफी उचलणार आहे. तुम्ही सर्वजण माझ्यासोबत आहात का? आरसीबीने आपल्याला संयमाचा खरा अर्थ शिकवला आहे.”

View this post on Instagram

A post shared by Nakuul Mehta (@nakuulmehta)

“फक्त हा सामना जिंका आणि हा सामना जिंकल्यास मी वचन देतो की मी कन्नड भाषा शिकेन आणि हा व्हिडीओ पुन्हा अपलोड करेन. मी दाक्षिणात्य नाश्ता खाण्यासही सुरुवात करेन. जिथे वायफाय चांगला असेल तिथे मी राहायला जाईन. तुम्ही फक्त हा विजय प्राप्त करा आणि त्यासाठी मी सर्वकाही करायला तयार आहे. मी विराट कोहलीसाठी मंदिर बांधेन, नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीच्या जेवणातही रसम खाईन. मी विजय माल्याचंही सगळं कर्ज फेडेन. तुम्ही फक्त हा सामना जिंका”, अशी वचनं तो या व्हिडीओत देताना दिसतोय. त्यामुळे आता आरसीबीच्या विजयानंतर नेटकरी त्याच्या अकाऊंटवर कमेंट करून विराटच्या मंदिराबद्दल सवाल करत आहेत.

Follow Us
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात.
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.