AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे लग्न टिकणार नाही असं अनेकांना वाटलेलं..; अशोक सराफांबद्दल काय म्हणाल्या निवेदिता?

अशोक आणि निवेदिता सराफ ही मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. या दोघांच्या लग्नाला तीस वर्षे उलटून गेली आहेत. वयातील अंतरामुळे अनेकांनी त्यांच्या नात्याबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. लग्नातील आव्हानांबद्दल खुद्द निवेदिता व्यक्त झाल्या होत्या..

हे लग्न टिकणार नाही असं अनेकांना वाटलेलं..; अशोक सराफांबद्दल काय म्हणाल्या निवेदिता?
Ashok and Nivedita SarafImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 26, 2025 | 10:47 AM
Share

मराठी कलाविश्वातील दिग्गज अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या लग्नाला 35 वर्षे पूर्ण झाली आहेत. 27 जून 1989 रोजी या दोघांनी गोव्यातील मंगेशीच्या देवळात लग्नगाठ बांधली. या दोघांच्या वयात 18 वर्षांचं अंतर आहे. त्यामुळे अनेकांनी त्यांच्या नात्याबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. ‘मी बहुरुपी’ या अशोक सराफांच्या आत्मचरित्रात खुद्द निवेदिता या त्यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाल्या होत्या. “आज इतकी वर्षे झालीत आमच्या लग्नाला. हे लग्न टिकणार नाही असं त्यावेळी अनेकांना वाटलं होतं. अनेकांनी मला तसं बोलूनही दाखवलं होतं. लग्न करायचं तर ते टिकवण्यासाठी असं मी पक्कं ठरवलं होतं,” असं त्यांनी म्हटलंय.

“प्रत्येक लग्नाच चढउतार असतात. त्याप्रमाणे आमच्याही आयुष्यात आले. आमचीही भांडणं झाली, वादविवाद झाले. आमच्या वयात खूप जास्त अंतर आहे. आमचे स्वभाव निरनिराळे, विचारसरणीत फरक आणि आम्ही ज्या सामाजिक स्तरातून आलो तोही वेगळा. त्यामुळे अनेकदा भांड्याला भांडं लागण्याचे प्रसंग आले. आम्ही सगळ्या भोज्यांना शिवून आलो. परंतु आजही आम्ही एकमेकांच्या बाजूला ठामपणे उभे आहोत. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आम्हा दोघांना एकमेकांविषयी वाटत असलेला आदर,” अशा शब्दांत निवेदिता व्यक्त झाल्या.

लग्न टिकवण्याबद्दल त्यांनी पुढे लिहिलं, “आज इतकी वर्षे झालीत आमच्या लग्नाला. हे लग्न टिकणार नाही असं त्यावेळी अनेकांना वाटलं होतं. अनेकांनी मला तसं बोलूनही दाखवलं होतं. लग्न करायचं तर ते टिकवण्यासाठी असं मी पक्कं ठरवलं होतं. त्यासाठी लागतील ते आणि तेवढे प्रयत्न करण्याची माझी तयारी होती. कारण कोणतंही लग्न आपोआप टिकत नाही, त्यासाठी मेहनत करावीच लागते, असं मला वाटतं, तशी मी केलीये. त्यासाठी प्रसंगी माझ्या करिअरशी तडजोडही केलीये. स्वत:ला बदललंय. अर्थात हे मी एकटीनेच केलंय असं नाही. अशोकनंही त्याच्या बाजूनं तेच केलंय. या नात्याशी शंभर टक्के बांधिलकी मानणारा नवरा मला मिळाला म्हणून मी स्वत:ला अतिशय नशीबवान मानते. माझं सुखाचं आणि समाधानाचं पारडं खूप जास्त जड आहे.”

“अशोकचं कौतुक हे की त्यानंही मला खूप समजून घेतलं. अतिशय रुढिप्रिय माणून असूनसुद्धा त्यानं कधीही आपले विचार माझ्यावर लादले नाहीत. मी तुलनेनं आधुनिक विचारांची आहे. त्यानं मला माझ्या पद्धतीनं जगू दिलं. कधी भांडून असेल, कधी माझ्यावरच्या प्रेमामुळे असेल, पण माझ्या स्वातंत्र्यावर त्यानं कधी बंधन घातलं नाही,” असं त्या पुढे म्हणाल्या.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...