AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss OTT | अंतिम फेरीच्या जवळ पोहचून नेहा भसीन झाली बेघर, ‘या’ पाच स्पर्धकांमध्ये होणार तगडी टक्कर!

बिग बॉसच्या प्रत्येक सीझनचा शेवट जवळ आला की, एका किंवा दुसऱ्या स्पर्धकाला हा शो सोडावा लागतो. प्रत्येक हंगामाप्रमाणे, बिग बॉस ओटीटीमध्ये ‘मिडनाईट इव्हिक्शन’ झाली. ज्यात बिग बॉसने त्याच्या मुख्य गेटसमोर दुसरा गेट बसवला, जो शोमधून बाहेर जाणाऱ्या स्पर्धकांसाठी होता.

Bigg Boss OTT | अंतिम फेरीच्या जवळ पोहचून नेहा भसीन झाली बेघर, ‘या’ पाच स्पर्धकांमध्ये होणार तगडी टक्कर!
Pratik-Neha
| Edited By: Harshada Bhirvandekar | Updated on: Sep 16, 2021 | 11:32 AM
Share

मुंबई :बिग बॉस ओटीटी’चा (Bigg Boss OTT) हा शेवटचा आठवडा आहे, त्यामुळे बिग बॉसच्या घरामध्ये फक्त सहा सदस्य शिल्लक आहेत. अंतिम फेरीच्या इतक्या जवळ आल्यानंतर ‘बिग बॉस’ची ट्रॉफी आपल्या नावावर करणे हे प्रत्येक स्पर्धकाचे स्वप्न आहे. पण हे बिग बॉसचे घर आहे. या घरात सर्व काही इतके सहजतेने होऊ शकत नाही. प्रत्येक सीझनप्रमाणे अंतिम फेरीच्या चार दिवस आधी, या सीझनमध्ये देखील एक मोठा ट्विस्ट आला आहे. अंतिम फेरीच्या इतक्या जवळ पोहोचल्यावर एका स्पर्धकाचे ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले आणि त्याला शोला निरोप घ्यावा लागला.

बिग बॉसच्या प्रत्येक सीझनचा शेवट जवळ आला की, एका किंवा दुसऱ्या स्पर्धकाला हा शो सोडावा लागतो. प्रत्येक हंगामाप्रमाणे, बिग बॉस ओटीटीमध्ये ‘मिडनाईट इव्हिक्शन’ झाली. ज्यात बिग बॉसने त्याच्या मुख्य गेटसमोर दुसरा गेट बसवला, जो शोमधून बाहेर जाणाऱ्या स्पर्धकांसाठी होता. सरतेशेवटी, जेव्हा नेहा भसीन आणि राकेश बापट या दोघांनाही बेदखल होण्यासाठी गेटच्या मागे पाठवण्यात आले, जिथून राकेश घरात शिरला पण नेहा भसीनचा प्रवास बिग बॉसमध्ये इथेच संपला.

उरलेयत केवळ पाच स्पर्धक

नेहा भसीन बेघर झाल्यानंतर अंतिम फेरीत आता केवळ पाच कॅन्टेस्टेंट शो उरले आहेत. ज्यामध्ये घरात सुरक्षित राहणारे पहिले स्पर्धक दिव्या अग्रवाल, त्यानंतर निशांत भट्ट, शमिता शेट्टी, प्रतीक सहजपाल आणि राकेश बापट आहेत. घरातील हे उर्वरित पाच सदस्य आता अंतिम फेरीत एकमेकांशी स्पर्धा करताना दिसतील. तीन दिवसानंतर, प्रेक्षक त्यांच्या मतांच्या आधारे बिग बॉस ओटीटीचा विजेता निवडतील.

नेहाच्या जाण्यामुळे प्रतीक सहजपाल धक्का

‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात, जिथे बाकीचे चार स्पर्धक त्यांच्या सुरक्षेने खूप आनंदी दिसत होते, दुसरीकडे नेहा भसीनच्या जाण्याने प्रतीक सहजपाल पूर्णपणे तुटला होता आणि अश्रू ढाळत होता. ‘बिग बॉस’ने स्पर्धकांना त्यांचे कनेक्शन तोडण्याची आणि घरातील इतरांशी संबंध जोडण्याची संधी दिली, तेव्हापासून नेहा आणि प्रतीकने आपापले कनेक्शन अक्षरा आणि मिलिंदशी सोडून एकमेकांशी कनेक्शन केले होते.

नेहा भसीन आणि प्रतीक सहजपाल या कनेक्शनपासून ते प्रवासात एकत्र होते ते दोघेही गेममध्ये एकत्र होते. बिग बॉसने कनेक्शनमधील बंध तोडले, परंतु काळाच्या ओघात त्यांची मैत्री घट्ट होत गेली. प्रेम असो किंवा भांडण, ते प्रत्येक वेळी एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले आणि एकमेकांना साथ दिली.

बिग बॉसच्या घरात नेहमी मोकळेपणाने बोलणाऱ्या नेहा भसीनच्या संयमाचा बांध अंतिम फेरीच्या वेळेस मात्र मोडला. नेहमी भांडण आणि हाणामारीवर उतरून आपले मत सांगणारी नेहा बिग बॉसच्या घरात लोकांचे वर्तन पाहून रडताना दिसली. यासह, ती असेही म्हणताना दिसली की, बिग बॉसमध्ये तिच्यासोबत जे काही घडले ते आता तिच्या मनातून जात नाहीय.

हेही वाचा :

Raj Kundra Case | मुंबई गुन्हे शाखेने राज कुंद्राविरोधात दाखल केले आरोपपत्र, शिल्पा शेट्टी होणार साक्षीदार, 1500 पानांत लेखाजोखा…

आमीर खानच्या बॉडीगार्डचा तगडा पगार, आमदार-खासदार ते IAS-IPS पेक्षाही बक्कळ कमाई

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली