AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेम असं असेल तर नकोच… ब्रेकअपनंतर तीन दिवसात अभिनेत्याने केली लग्नाची घोषणा; खासगी आयुष्यामुळे आला चर्चेत

अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं आभिनेत्याचं नाव... ब्रेकअपनंतर तिसऱ्या दिवशी दुसऱ्या महिलेसोबत केली लग्नाची घोषणा... एक्स-गर्लफ्रेंडचं तर हृदयद्रावक निधन

प्रेम असं असेल तर नकोच... ब्रेकअपनंतर तीन दिवसात अभिनेत्याने केली लग्नाची घोषणा; खासगी आयुष्यामुळे आला चर्चेत
| Updated on: Jul 19, 2023 | 3:58 PM
Share

मुंबई | 19 जुलै 2023 : प्रेम म्हणजे एक निस्वर्थ भावना असते… प्रेम ही एक भावना असता… आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात असतो. तेव्हा आपण फक्त आणि फक्त त्याच व्यक्तीच्या विचारात असतो… दुसऱ्या कोणत्या गोष्टीचा मनात विचार देखील येत नाही. पण झगमगत्या विश्वातील एक अभिनेता असा आहे, ज्याने ब्रेकअप झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी लग्नाची घोषणा केली. आज तोच अभिनेता आनंदाने वैवाहिक आयुष्य जगत आहे. पण अभिनेत्याच्या एक्स-गर्लफ्रेंडच्या आयुष्यात मात्र अनेक चढ – उतार आले. सध्या ज्या अभिनेत्याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगत आहे, त्याचं नाव अनेक महिलांसोबत जोडण्यात आलं. एवढंच नाही अभिनेत्याच्या एक्स-गर्लफ्रेन्डच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली होती.

सध्या ज्या अभिनेत्याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगत आहे, तो दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेती करण पटेल (Karan Patel) आहे. एक काळ असा होता जेव्हा करण आणि अभिनेत्री काम्या पंजाबी (Kamya Panjabi) यांच्या नात्याची तुफान चर्चा रंगली होती. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं होतं.

टीव्ही विश्वातील सर्वात पॉव्हरफुल कपल म्हणून करण आणि काम्या यांची ओळख होती. दोघांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. पण करण आणि काम्या यांचं नातं अधिक काळ टिकलं नाही. त्यांच्या नात्याचा अंत फार वाईट झाला होता. आजही त्यांच्या नात्याच्या चर्चा तुफान रंगत असतात.

नात्यात सतत होत असलेल्या भाडणांमुळो करण आणि काम्या यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. धक्कादायक गोष्ट म्हणजे काम्या हिच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अभिनेत्याने तीन दिवसांत लग्नाची घोषणा केली. अखेर करण याने २०१५ मध्ये अंकिता भार्गव हिच्यासोबत लग्न केलं.

करण याचं लग्न झालं, पण काम्या हिच्यासोबत असलेल्या त्याच्या नात्याच्या चर्चा आजही रंगत आहेत. रिपोर्टर्सनुसार, काम्या हिच्यासोबत करण अन्य तरुणीला डेट करत असल्याचं अभिनेत्रीला माहिती पडलं.. तेव्हा काम्या हिने करण याच्यावर अनेक आरोप लगावले.

मिळालेल्या माहितीनुसार; करण काम्या पंजाबीसोबत प्रत्युषा बॅनर्जीलाही डेट करत होता. काम्याने करण अनेकदा विचारलं. पण त्याने सत्य सांगितलं नाही. अखेर प्रत्युषा करण याच्यापासून दूर झाली. त्यानंतर प्रत्युषा अभिनेता राहुल सिंग रॉय याला डेट करु लागली. पण जेव्हा अभिनेत्री स्वतःचा जीव संपवला तेव्हा सर्वत्र खळबळ माजली होती.

करण आणि काम्या यांच्या नात्यात अनेक चढ – उतार आले. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतलं. काम्याने देखील लग्न केलं. पण अभिनेत्री पहिलं लग्न जास्त काळ टिकू शकलं नाही. अभिनेत्री दुसरं २०२० मध्ये लग्न डॉक्टर शलभ डांग यांच्यासोबत केलं. आज अभिनेत्री तिच्या वैवाहिक आयुष्यामध्ये आनंदी आहे.

Follow Us
सावधान! दूधात तब्बल 997 किलो तेल, धाड टाकताच भेसळयुक्त दूध जप्त
सावधान! दूधात तब्बल 997 किलो तेल, धाड टाकताच भेसळयुक्त दूध जप्त.
नीट प्रकरणी 19 व्या दिवशीही CBI चा मुक्काम लातूरमध्येच, चौथ्या...
नीट प्रकरणी 19 व्या दिवशीही CBI चा मुक्काम लातूरमध्येच, चौथ्या....
संघ कार्यालय जाळपोळ प्रकरणात कोर्टाचा मोठा निकाल, 16 वर्षांनी...
संघ कार्यालय जाळपोळ प्रकरणात कोर्टाचा मोठा निकाल, 16 वर्षांनी....
केंद्रात मंत्रिपद देतो, 20 कोटी द्या, भाजपाच्या नेत्यावरच टाकलं जाळं;
केंद्रात मंत्रिपद देतो, 20 कोटी द्या, भाजपाच्या नेत्यावरच टाकलं जाळं;.
एकच खळबळ! 700 कर्मचारी असलेल्या पुण्यातील IT कंपनीला रातोरात टाळे
एकच खळबळ! 700 कर्मचारी असलेल्या पुण्यातील IT कंपनीला रातोरात टाळे.
लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनीच केली मोठी घोषणा, थेट म्ह
लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनीच केली मोठी घोषणा, थेट म्ह.
मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत...
मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत....
मुंबईत खळबळ, वर्दळीच्या ठिकाणी आढळली बेवारस बॅग
मुंबईत खळबळ, वर्दळीच्या ठिकाणी आढळली बेवारस बॅग.
बीड पुन्हा हादरलं! सासरच्यांनी आधी तिला उपाशी ठेवलं नंतर...पाच जणांवर
बीड पुन्हा हादरलं! सासरच्यांनी आधी तिला उपाशी ठेवलं नंतर...पाच जणांवर.
ज्याची भीती तेच घडलं! या करणामुळे पुन्हा 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र,
ज्याची भीती तेच घडलं! या करणामुळे पुन्हा 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र,.