AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्या राय, विराट कोहलीबद्दल काय म्हणाले राहुल गांधी? भाजपवर टीका करताना सेलिब्रिटींचा उल्लेख

नवी दिल्लीतल्या सामाजिक न्याय संमेलनात बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा ऐश्वर्या राय आणि अमिताभ बच्चन यांचा उल्लेख केला. भाजपवर टीका करताना त्यांनी विराट कोहलीचाही उल्लेख केला.

ऐश्वर्या राय, विराट कोहलीबद्दल काय म्हणाले राहुल गांधी? भाजपवर टीका करताना सेलिब्रिटींचा उल्लेख
ऐश्वर्या राय, राहुल गांधी, विराट कोहलीImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 25, 2024 | 11:58 AM
Share

काँग्रेस नेते राहुल गांधी हे नेहमीच त्यांच्या कोणत्या ना कोणत्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. सध्या त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. यामध्ये ते त्यांच्यावर होत असलेल्या टीकेवर बोलताना दिसले. “मला राजकारणात रस नाही, मी गंभीर नाही, असं ते मीडियासमोर बोलायचे”, असं म्हणत त्यांनी पुढे अभिनेत्री ऐश्वर्या राय, अमिताभ बच्चन आणि क्रिकेटर विराट कोहली यांचा उल्लेख केला. या तिन्ही मोठ्या सेलिब्रिटींचं नाव घेत राहुल गांधीनी केलेलं वक्तव्य सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

काय म्हणाले राहुल गांधी?

“माझ्याबद्दल ते मीडियात म्हणायचे की मला राजकारणात रस नाही, मी राजकारणाविषयी गंभीर नाही. त्यांच्यासाठी मनरेगा आणि भूसंपादन विधेयकाबाबत लढणारा गंभीर नाही, तर अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय आणि विराट कोहली यांच्याविषयी बोलणारा गंभीर आहे का”, असा सवाल त्यांनी केला. नवी दिल्लीतल्या सामाजिक न्याय संमेलनात राहुल गांधी बोलत होते. यापुढे ते म्हणाले की, “काही लोकच मुद्द्यांवर चर्चा करतात आणि मत व्यक्त करतात. पण 90 टक्के लोक काय विचार करतात, याबद्दल कोणीच काही बोलत नाही. मी त्या 90 टक्के लोकांविषयी बोलतो, म्हणून मला गंभीर नसल्याचं म्हटलं जातं.” मीडियात एकसुद्धा आदिवासी, दलित आणि ओबीसी अँकर नसल्याचंही वक्तव्य त्यांनी केलं.

राहुल गांधींनी त्यांच्या भाषणात अशा पद्धतीने ऐश्वर्या राय आणि अमिताभ बच्चन यांचा उल्लेख करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. फेब्रुवारी महिन्यात छत्तीसगडमध्ये ट्रान्सपोर्ट नगर चौकमधील सभेत राहुल गांधी यांनी अयोध्येतील राम मंदिरात आयोजित केलेल्या भव्यदिव्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून भाजप सरकारवर निशाणा साधला होता. या कार्यक्रमाला ओबीसीचे कोणतेच सदस्य का नव्हते, असा सवाल त्यांनी केला होता. “मी अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, अंबानी, अदानी आणि सर्व बिझनेसच्या लोकांना पाहिलं, पण मला त्यात एकही गरीब माणूस दिसला नाही. एकही शेतकरी, मजूर, बेरोजगार व्यक्ती त्या सोहळ्याला उपस्थित नव्हती”, असं ते म्हणाले होते.

दुसऱ्या एका रॅलीतही त्यांनी ऐश्वर्या आणि अमिताभ बच्चन यांचा उल्लेख केला होता. “ऐश्वर्या डान्स करताना दिसेल आणि बच्चन साहेब बल्ले बल्ले करताना दिसतील”, असा टोला त्यांनी लगावला होता. यानंतर त्यांच्यावर भाजपच्या नेत्यांकडून बरीच टीका झाली होती.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा