AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रतन टाटांनी अमिताभ बच्चन यांच्यावर पैज लावली अन्…अपयश हाती येता स्वत:ला बॉलिवूडपासून केलं दूर

उद्योगपती रतन टाटांनी रुपेरी पडद्यासाठी काम केले होते. ज्यात अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत होते. अमिताभ बच्चन यांच्या अभिनयावर विश्वास ठेवून त्यांनी एक पैज लावली होती जे ती हारले. त्यानंतर त्यांनी स्वत:ला बॉलिवूडपासून दूर केले.काय होती ती पैज?

रतन टाटांनी अमिताभ बच्चन यांच्यावर पैज लावली अन्...अपयश हाती येता स्वत:ला बॉलिवूडपासून केलं दूर
Ratan Tata bet on Amitabh BachchanImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 09, 2025 | 3:23 PM
Share

बोर्डरूम आणि व्यावसायिक उपक्रमांच्या पलीकडे, रतन टाटा यांनी काही काळासाठी रुपेरी पडद्यावरही काम केले. पण त्यांचा पहिला प्रयत्न त्यांचा शेवटचा ठरला. चला जाणून घेऊया तो कोणता चित्रपट होता…

रतन टाटा यांनी काही काळासाठी रुपेरी पडद्यासाठी काम केले

आज (9 ऑक्टोबर) रतन टाटा यांची पुण्यतिथी आहे. संपूर्ण देशाला त्यांचा अभिमान आहे. तसेच त्यांच्यासारखे उद्योगपती, परोपकारी आणि प्रेरणादायी दुसरा होणे नाही असं ही भावना सर्वांच्याच मनात आहे. पण हे फार कमी जणांना माहित असेल की रतन टाटा यांनी चित्रपटासाठी काम केलं आहे. रतन टाटा यांनी काही काळासाठी रुपेरी पडद्यासाठी काम केले. पण त्यांचा पहिला प्रयत्न त्यांचा शेवटचा ठरला. चला जाणून घेऊया तो कोणता चित्रपट होता ते.

अमिताभ बच्चन यांच्याबद्दल काय पैज लावली होती?

रतन टाटा यांनी 2004 मध्ये अमिताभ बच्चन, जॉन अब्राहम आणि बिपाशा बसू यांच्या प्रमुख भूमिका असलेला “एतबार” हा चित्रपट तयार केला होता. हा चित्रपट प्रसिद्ध चित्रपट निर्माते विक्रम भट्ट यांनी दिग्दर्शित केलेला एक रोमँटिक सायकॉलॉजिकल थ्रिलर होता. या चित्रपटाची निर्मिती टाटांनी बीएसएस बॅनरखाली केली होती. रतन टाटा यांनी इतर निर्मात्यांसह या प्रकल्पात भाग घेतला. त्यांना विश्वास होता तो अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेबद्दल. कारण त्यांच्या भूमिकेवर जणू रतन टाटा यांनी पैज लावली होती. दुर्देवाने त्यांना यात हार मानावी लागली.

त्यानंतर त्यांनी स्वतःला बॉलिवूडपासून दूर केले.

या चित्रपटाचे बजेट 9.50 कोटी होते. परंतु बॉक्स ऑफिसवर त्याने फक्त 7.96 कोटींची कमाई केली, ज्यामुळे नक्कीच चित्रपटाचा खर्च वसूल होऊ शकला नाही. रतन टाटांची ही एकमेव निर्मिती होती आणि त्यानंतर त्यांनी स्वतःला बॉलिवूडपासून दूर केले.

चित्रपट प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यात अपयशी

“ऐतबार” ची कथा एका वडील आणि मुलीच्या नात्याभोवती फिरते. अमिताभ बच्चन यांनी डॉ. रणवीर मल्होत्राची भूमिका साकारली आहे, जो त्यांची मुलगी रिया मल्होत्रा ​​(बिपाशा बसू)बाबत खूप पझेसिव्ह असतो आणि तिला तिचा जोडीदार आर्यन त्रिवेदी (जॉन अब्राहम) पासून वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. या चित्रपटात सस्पेन्स, भावना आणि रोमान्सचे मिश्रण होते, परंतु प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यात हा चित्रपट अयशस्वी ठरला.

रतन टाटांचा बॉलिवूडमध्ये प्रवेश हा त्यावेळी चर्चेचा विषय ठरला होता

रतन टाटांचा बॉलिवूडमध्ये प्रवेश हा त्यावेळी चर्चेचा विषय ठरला होता. कारण त्यांनी टाटा समूहाच्या माध्यमातून ऑटोमोबाईल्स, स्टील आणि तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला होता. जरी “ऐतबार” हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या अपयशी ठरला असला तरी, रतन टाटांच्या बहुमुखी प्रतिभेचा आणि सर्जनशील जोखीम घेण्याच्या त्यांच्या धाडसाचं मात्र कौतुक झालं होतं.

चित्रपटाबद्दल आणखी काही मनोरंजक तथ्ये देखील आहेत जे जाणून आश्चर्य वाटेल. “ऐतबार” हे राजेश रोशन यांनी संगीतबद्ध केले होते आणि त्या वेळी त्यातील गाणी मध्यम प्रमाणात लोकप्रिय होती. तथापि, समीक्षकांनी चित्रपटाची कथा आणि पटकथा सरासरी मानली.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.