AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी मरेल तेव्हा कोणी खांदा द्यायला…, ऋषी कपूर रागात जे बोलले मृत्यूसमयी तसंच झालं

शब्दांमध्ये खूप असते ताकद... ऋषी कपूर यांच्या तोंडून रागात निघालेले शब्द ठरले खरे, त्यांच्या अंत्यसंस्करासाठी कोणीच नाही पोहोचलं, 'मी मरेल तेव्हा कोणी खांदा द्यायला...' असं का म्हणाले होते ऋषी कपूर? सध्या सर्वत्र ऋषी कपूर यांनी केलेल्या 'त्या' तीन ट्विटची चर्चा...

मी मरेल तेव्हा कोणी खांदा द्यायला..., ऋषी कपूर रागात जे बोलले मृत्यूसमयी तसंच झालं
| Updated on: May 01, 2024 | 9:59 AM
Share

बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाला चार वर्ष पूर्ण झाले आहेत. पण त्यांच्या अनेक आठवणी आजही चाहत्यांच्या मनात कायम आहे. कर्करोगामुळे ऋषी कपूर यांचं निधन झालं आणि सिनेविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली. कोरोना काळात ऋषी कपूर यांनी अखेरचा श्वास घेतल्यामुळे त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी इच्छा असून देखील सेलिब्रिटींना येता आलं आहे. त्यामागे कारण होतं लॉकडाऊन… सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऋषी कपूर यांची मुलगी रिद्धिमा साहनी देखील वडिलांच्या अंत्यसंस्काराला पोहचू शकली नाही. ऋषी कपूर यांच्याबद्दल एक गोष्ट फार कमी लोकांना माहिती असेल एकदा ऋषी कपूर रागात असं काही बोलून गेले की, त्यांचे ते शब्द त्यांच्या मृत्यूसमयी खरे ठरले…

मझ्या अंत्यसंस्काराला कोणीही यायचं नाही… कोणीही मला खांदा द्यायचा नाही… असं वक्तव्य ऋषी कपूर यांनी रागात केलं होतं. त्यामागे कारण देखील तितकंच मोठं होतं. अभिनेते विनोद खन्ना यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी फार कमी सेलिब्रिटी पोहोचले होते. यावर नाराजी व्यक्त करत ऋषी कपूर असं काही म्हणले जे सत्य झालं. ट्विट करत ऋषी कपूर यांनी नाराजी व्यक्त केली होती.

पहिल्या ट्विटमध्ये ऋषी कपूर म्हणाले, ‘लाजिरवाणं… या जेनरेशनचा एकही अभिनेता विनोद खन्ना यांच्या अंत्यसंस्कारासाठी पोहोचला नव्हता… ज्यांनी विनोद खन्ना यांच्यासोबत काम केलं ते सुद्धा नव्हते… आदर करायला शिका…’ असं म्हणत ऋषी कपूर यांनी नाराजी व्यक्त केली होती.

दुसऱ्या ट्विटमध्ये ऋषी कपूर म्हणाले, ‘मला एका गोष्टीसाठी कायम तयार राहायला हवं. मला खांदा देण्यासाठी कोणीही येणार नाही… आजचे सो कॉल्ड स्टार… मी खूप नाराज आहे… अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्या पार्टीमध्ये सेलिब्रिटी पोहोचले. पण अंत्यसंस्काराकडे पाठ फिवरली… ऋषी कपूर यांनी रागात बोलले शब्द त्यांच्या मृत्यूसमयी खरे ठरले.

सांगायचं झालं तर, तीन वर्षांनंतर ऋषी कपूर यांचं निधन झाले. पण त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी इच्छा असून देखील सेलिब्रिटी येऊ शकले नाहीत. फक्त 20 लोकं ऋषी कपूर यांना अखेरचा निरोप देऊ शकले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी रणबीर कपूर, नीतू कपूर यांच्यासोबत आलिया भट्ट, करीना कपूर, करिश्मा कपूर, रणधीर कपूर, बबीता कपूर, सैफ अली खान उपस्थित होते.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा