मी मरेल तेव्हा कोणी खांदा द्यायला…, ऋषी कपूर रागात जे बोलले मृत्यूसमयी तसंच झालं

शब्दांमध्ये खूप असते ताकद... ऋषी कपूर यांच्या तोंडून रागात निघालेले शब्द ठरले खरे, त्यांच्या अंत्यसंस्करासाठी कोणीच नाही पोहोचलं, 'मी मरेल तेव्हा कोणी खांदा द्यायला...' असं का म्हणाले होते ऋषी कपूर? सध्या सर्वत्र ऋषी कपूर यांनी केलेल्या 'त्या' तीन ट्विटची चर्चा...

मी मरेल तेव्हा कोणी खांदा द्यायला..., ऋषी कपूर रागात जे बोलले मृत्यूसमयी तसंच झालं
Follow us
| Updated on: May 01, 2024 | 9:59 AM

बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाला चार वर्ष पूर्ण झाले आहेत. पण त्यांच्या अनेक आठवणी आजही चाहत्यांच्या मनात कायम आहे. कर्करोगामुळे ऋषी कपूर यांचं निधन झालं आणि सिनेविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली. कोरोना काळात ऋषी कपूर यांनी अखेरचा श्वास घेतल्यामुळे त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी इच्छा असून देखील सेलिब्रिटींना येता आलं आहे. त्यामागे कारण होतं लॉकडाऊन… सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऋषी कपूर यांची मुलगी रिद्धिमा साहनी देखील वडिलांच्या अंत्यसंस्काराला पोहचू शकली नाही. ऋषी कपूर यांच्याबद्दल एक गोष्ट फार कमी लोकांना माहिती असेल एकदा ऋषी कपूर रागात असं काही बोलून गेले की, त्यांचे ते शब्द त्यांच्या मृत्यूसमयी खरे ठरले…

मझ्या अंत्यसंस्काराला कोणीही यायचं नाही… कोणीही मला खांदा द्यायचा नाही… असं वक्तव्य ऋषी कपूर यांनी रागात केलं होतं. त्यामागे कारण देखील तितकंच मोठं होतं. अभिनेते विनोद खन्ना यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी फार कमी सेलिब्रिटी पोहोचले होते. यावर नाराजी व्यक्त करत ऋषी कपूर असं काही म्हणले जे सत्य झालं. ट्विट करत ऋषी कपूर यांनी नाराजी व्यक्त केली होती.

हे सुद्धा वाचा

पहिल्या ट्विटमध्ये ऋषी कपूर म्हणाले, ‘लाजिरवाणं… या जेनरेशनचा एकही अभिनेता विनोद खन्ना यांच्या अंत्यसंस्कारासाठी पोहोचला नव्हता… ज्यांनी विनोद खन्ना यांच्यासोबत काम केलं ते सुद्धा नव्हते… आदर करायला शिका…’ असं म्हणत ऋषी कपूर यांनी नाराजी व्यक्त केली होती.

दुसऱ्या ट्विटमध्ये ऋषी कपूर म्हणाले, ‘मला एका गोष्टीसाठी कायम तयार राहायला हवं. मला खांदा देण्यासाठी कोणीही येणार नाही… आजचे सो कॉल्ड स्टार… मी खूप नाराज आहे… अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्या पार्टीमध्ये सेलिब्रिटी पोहोचले. पण अंत्यसंस्काराकडे पाठ फिवरली… ऋषी कपूर यांनी रागात बोलले शब्द त्यांच्या मृत्यूसमयी खरे ठरले.

सांगायचं झालं तर, तीन वर्षांनंतर ऋषी कपूर यांचं निधन झाले. पण त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी इच्छा असून देखील सेलिब्रिटी येऊ शकले नाहीत. फक्त 20 लोकं ऋषी कपूर यांना अखेरचा निरोप देऊ शकले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी रणबीर कपूर, नीतू कपूर यांच्यासोबत आलिया भट्ट, करीना कपूर, करिश्मा कपूर, रणधीर कपूर, बबीता कपूर, सैफ अली खान उपस्थित होते.

Non Stop LIVE Update
दोन मुडदे पडलेत आणि आरोपीला पिझ्झा-बर्गर, पुणे अपघातावर राऊत आक्रमक
दोन मुडदे पडलेत आणि आरोपीला पिझ्झा-बर्गर, पुणे अपघातावर राऊत आक्रमक.
कपिल पाटलांकडून निवडणूक आणि पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ? नेमकं काय घडल?
कपिल पाटलांकडून निवडणूक आणि पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ? नेमकं काय घडल?.
पोलिसांवर दबाव? पुणे अपघात प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त काय म्हणाले?
पोलिसांवर दबाव? पुणे अपघात प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त काय म्हणाले?.
ठाकरे कुटुंब लंडनला पळून जाण्याच्या तयारीत, भाजप नेत्याचं वक्तव्य
ठाकरे कुटुंब लंडनला पळून जाण्याच्या तयारीत, भाजप नेत्याचं वक्तव्य.
या जिल्ह्यातील विद्यार्थीन 12 वीत पटकावले 100 %; सांगितला फ्युचर प्लॅन
या जिल्ह्यातील विद्यार्थीन 12 वीत पटकावले 100 %; सांगितला फ्युचर प्लॅन.
संजय शिरसाट म्हणाले, कितीही मोठ्या बापाचा माजलेला लेक असला तरीही…
संजय शिरसाट म्हणाले, कितीही मोठ्या बापाचा माजलेला लेक असला तरीही….
बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरला 'हे' 2 पर्याय अन् घरासमोर आंदोलनाचा इशारा
बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरला 'हे' 2 पर्याय अन् घरासमोर आंदोलनाचा इशारा.
पिसारा फुलवणाऱ्या मोरासोबत सेल्फी काढलाय? व्हिडीओ बघा, तुम्ही म्हणाल..
पिसारा फुलवणाऱ्या मोरासोबत सेल्फी काढलाय? व्हिडीओ बघा, तुम्ही म्हणाल...
EVM हॅकचा प्रयत्न फसला म्हणून... संजय राऊतांचा भाजपसह आयोगावर हल्लाबोल
EVM हॅकचा प्रयत्न फसला म्हणून... संजय राऊतांचा भाजपसह आयोगावर हल्लाबोल.
झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ठाण्यात एकच चर्चा
झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ठाण्यात एकच चर्चा.