AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“..म्हणून मी करिअरसाठी क्रिकेट निवडलं नाही”; सैफने सांगितलं खरं कारण

अभिनेता सैफ अली खानने नुकतीच कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याला त्याच्या करिअर निवडीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. सैफने क्रिकेटमध्ये का करिअर केलं नाही, असं कपिलने विचारलं असता त्याने यामागील खरं कारण सांगितलं आहे.

..म्हणून मी करिअरसाठी क्रिकेट निवडलं नाही; सैफने सांगितलं खरं कारण
Saif Ali KhanImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 01, 2024 | 9:12 AM
Share

‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चा दुसरा सिझन गेल्या आठवड्यापासून नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुरू झाला आहे. शनिवारी या शोमध्ये ‘देवारा’ या चित्रपटाची टीम पोहोचली होती. अभिनेता सैफ अली खान, ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूर यांच्यासोबत कॉमेडियन कपिल शर्माने विविध मुद्द्यांवर गप्पा मारल्या. यावेळी सैफ आणि ज्युनियर एनटीआर त्यांच्या करिअर निवडीविषयी मोकळेपणे व्यक्त झाले. अभिनयक्षेत्रात करिअर करण्याचं का ठरवलं, यामागचं कारण दोघांनी या शोमध्ये सांगितलं.

“तुझे वडील दिग्गज क्रिकेटर होते आणि आई इंडस्ट्रीतील दिग्गज कलाकार आहे, मग तू करिअर म्हणून अभिनयक्षेत्रच का निवडलंस”, असा सवाल कपिलने सैफला केला. त्यावर उत्तर देताना सैफ म्हणाला, “लोक म्हणायचे की क्रिकेट खेळण्याची मला माझ्या आईकडून वारसा म्हणून मिळाली. माझ्यात ते टागोर कुटुंबाकडून अनुवांशिकरित्या आलं. पण त्यासाठी गरजेचं असलेलं मानसिक स्थैर्य माझ्यात नव्हतं. त्यामुळे क्रिकेट मला फारसं भावलं नाही. माझ्या मते मी योग्य करिअर निवडलंय. मला अभिनय करण्यात खूप मजा येते.”

क्रिकेट आणि बॉलिवूड क्षेत्रात सैफ अली खानच्या कुटुंबीयांचा मोठा इतिहास आहे. सैफने आई शर्मिला टागोर यांच्या पावलांवर पाऊल टाकत अभिनयक्षेत्रात करिअर करायचं ठरवलं. तर सैफचे वडील मन्सूर अली खान पतौडी हे टायगर पतौडी म्हणूनही ओळखले जायचे. ते भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार होते. बीसीसीआयकडून त्यांचा सीके नायुडू लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड देऊन सन्मान करण्यात आला होता. सैफचे आजोबा इफ्तिखर अली खान पतौडी हे सुद्धा 1946 मध्ये भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार होते.

यावेळी ज्युनियर एनटीआरनेही अभिनयक्षेत्रात काम करण्याचं का निवडलं, यामागचं कारण सांगितलं. “माझा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा मी 17 वर्षांचा होतो. मला आधीपासूनच अभिनेता व्हायचं होतं. त्यामुळे मी कधी दुसरे कोणते पर्याय बघितलेच नाहीत. या करिअरच्या माध्यमातून मी असंख्य लोकांना भेटतोय. प्रतिभेची देवाणघेवाण होतेय. लोक जेव्हा बसून तुमच्या अभिनयाचा आनंद घेतात, तेव्हा मला खूप आनंद होतो. अभिनेता बनून मी खूप खुश आहे. त्यामुळे मी माझ्या करिअरसंदर्भात योग्य निर्णय घेतलाय असं वाटतं”, असं तो म्हणाला.

Follow Us
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चे सुरुच1.
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर, बिहारला सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी मदत क्रमांक जारी
नेपाळमध्ये महापूर; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महापुरात एक हजारहून अधिक बेपत्ता; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला विरोध!
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला मुळशीकरांचा तीव्र विरोध
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न
प्रसाद लाड पुन्हा मनोज जरांगे पाटलांशी संवाद साधणार