Samay Raina : करिअर संपवणारी कॉन्ट्रोव्हर्सी ते जबरदस्त कमबॅक.. समय रैनाने कसं बदललं स्वत:चं नशीब?
करिअरमधील सर्वांत मोठ्या वादानंतर कॉमेडियन समय रैनाने जबरदस्त कमबॅक केलं आहे. हा कमबॅक काही साधासुधा नाही तर त्याचा व्हिडीओ जगभरात सर्वाधिक पाहिला गेला आहे. कॉन्ट्रोव्हर्सीनंतर समयने त्याच्या आयुष्याची संपूर्ण कथा पुन्हा नव्याने कशी लिहिली, ते जाणून घ्या..

कंटेंट क्रिएशन आणि सोशल मीडियाच्या विश्वात वेळेचं फार महत्त्व असतं, पण त्याहीपेक्षा अधिक महत्त्व विश्वास, पडत्या काळातही तुम्ही स्वत:ला कसं सावरता आणि त्यानंतर स्वत:ची कथा इतरांपेक्षा वेगळी कशी लिहिता, याला असतं. स्टँडअप कॉमेडियन समय रैनाने फेब्रुवारी 2025 मध्ये त्याच्या करिअरमधील आणि आयुष्यातील सर्वांत कठीण काळाचा सामना केला होता. ‘इंडियाज गॉट लेटंट’ या त्याच्या शोमध्ये युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहाबादियाने अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. ज्यानंतर देशभरात त्यांच्याविरोधात आणि शोविरोधात संतापाची लाट उसळली होती. अर्थातच समय रैनाला याचा सर्वांत मोठा फटका बसला होता. अनेक ब्रँड्सने त्याच्यापासून फारकत घेतली. ‘मिंत्रा’ने व्हॅलेंटाइन डेचा कोलॅबरेशन रद्द केला, ‘केएफसी’ने समयसोबत बनवलेला रील कॅम्पेन काढून टाकला, अनेक स्पॉन्सरशिप रद्द झाले. समय रैनाच्या करिअरला कायमची खीळ बसू शकते, असं त्यावेळी सर्वांना वाटलं होतं. पण हार मानणार तो समय रैना कसला? वादानंतर जाहीररित्या माफी मागणं किंवा दीर्घकाळापर्यंत शांत राहणं या नेहमीच्या मार्गाचा त्याने अवलंब केला नाही. वर्षभरापेक्षा जास्त काळ तो प्रसिद्धीपासून दूर राहिला आणि ‘इंडियाज गॉट लेटंट’चे सर्व...
