AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या शापित सिनेमाला बनवण्यासाठी लागली 23 वर्षे; प्रदर्शनापूर्वीच दोन अभिनेते, दिग्दर्शकाचं निधन

चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील या सर्वांत दुर्दैवी चित्रपटाला बनवायला तब्बल 23 वर्षे लागली होती. हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यातील अभिनेते आणि दिग्दर्शकांचं निधन झालं होतं. हा कोणता चित्रपट ते जाणून घ्या..

या शापित सिनेमाला बनवण्यासाठी लागली 23 वर्षे; प्रदर्शनापूर्वीच दोन अभिनेते, दिग्दर्शकाचं निधन
बॉलिवूडमधील दुर्दैवी चित्रपट म्हणून ओळखला जातो.Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 26, 2026 | 11:08 AM
Share

आजवर बॉलिवूडमध्ये असे असंख्य चित्रपट बनले आहेत, ज्यांच्या यशाची चर्चा वर्षानुवर्षे होत असते. तर दुसरीकडे असेही काही चित्रपट आहेत, ज्यांच्याबद्दल कोणी बोलायलाही तयार होत नाही. असाच एक चित्रपट जवळपास चाळीस वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट आता हिंदी सिनेसृष्टीतील सर्वांत दुर्दैवी चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. विशेष म्हणजे हा चित्रपट बनवण्यासाठी तब्बल 23 वर्षांचा काळ लागला होता. याच काळात चित्रपटातील दोन मुख्य अभिनेते आणि दिग्दर्शक यांचं निधन झालं होतं.

प्रत्येक चित्रपट निर्माता आणि कलाकार त्यांना यशाच्या नव्या उंचीवर पोहोचणाऱ्या चित्रपटाचा भाग बनण्याचं स्वप्न पाहत असतात. मात्र काही चित्रपट दुर्दैवी ठरतात आणि त्या कलाकारांच्या करिअरमधील एक काळा डाग बनतात. असाच एक चित्रपट बॉलिवूडमध्ये होऊन गेला असून त्याला बनवायला तब्बल 23 वर्षे लागली होती. तरीही तो बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरला होता. 1986 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात संजीव कुमार आणि अभिनेत्री निम्मी यांच्या मुख्य भूमिका आहेत. ‘लव्ह अँड गॉड’ असं या चित्रपटाचं नाव आहे.

प्रदर्शनाआधीच अभिनेते, दिग्दर्शकांचं निधन

आयएमडीबीने दिलेल्या माहितीनुसार, ‘मुघल-ए-आझम’चे दिग्दर्शक के. आसिफ जे करीमुद्दीन आसिफ म्हणूनही ओळखले जातात, त्यांनी 1963 मध्ये ‘लव्ह अँड गॉड’ बनवण्याची जबाबदारी स्वीकारली होती. सुरुवातीला गुरू दत्त हे या चित्रपटातील मुख्य अभिनेते होते. त्यांनी काही भागाचं शूटिंगसुद्धा केलं होतं. मात्र 1964 मध्ये त्यांच्या निधनामुळे या चित्रपटाचं काम थांबवण्यात आलं होतं. काही वर्षांनंतर अभिनेते संजीव कुमार यांची मुख्य अभिनेते म्हणून निवड झाली होती. तेव्हा 1970 मध्ये पुन्हा हा चित्रपट मार्गी लागला होता. याच काळात के. आसिफ यांचंही निधन झालं. तेव्हा ‘लव्ह अँड गॉड’ पुन्हा एकदा रखडला. के. आसिफ यांच्या पत्नी अख्तर आसिफ यांनी हा चित्रपट अखेर पूर्ण केला. मात्र या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच संजीव कुमार यांचंही निधन झालं.

हा चित्रपट अखेर 27 मे 1986 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला होता. त्यामुळे ‘लव्ह अँड गॉड’ हा चित्रपट बॉलिवूडचा सर्वांत दुर्दैवी चित्रपट म्हणून ओळखला जाऊ लागला. या चित्रपटात संजीव कुमार आणि निम्मी यांच्याव्यतिरिक्त अभिनेते प्राण आणि अभिनेत्री सिमी ग्रेवाल यांच्याही भूमिका होत्या.

Follow Us
मुंबईत मोठ्या घडामोडी! ठाकरे बंधूंच्या विजय सभेपूर्वीच...
Mumbai | मुंबईत मोठ्या घडामोडी! ठाकरे बंधूंच्या विजय सभेपूर्वीच...
प्रधानांच्या राजीनाम्यानंतर ठाकरे बंधूंची जल्लोष सभा; सगळीकडे लगबग,पहा
Thackeray Brothers Sabha | प्रधानांच्या राजीनाम्यानंतर ठाकरे बंधूंची जल्लोष सभा; सगळीकडे लगबग, पहा व्हिडीओ
गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
Rahul Gandhi | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि...
JP Nadda | नीट आंदोलनाला मोठं यश; जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि परीक्षा सुधारणांवरही सकारात्मक निर्णय
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक..
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक...
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबत
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबतच्या बैठकीत मोठा निर्णय
तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
Raj Thackeray | तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने...
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया
Sharad Pawar | धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...