AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पारू’ मालिका अचानक का बंद? शरयू सोनावणेनं सोडलं मौन, म्हणाली “TRP चांगला असूनही पूर्वकल्पना न देता..”

झी मराठी वाहिनीवरील सर्वांत लोकप्रिय मालिका 'पारू'ने अचानक प्रेक्षकांचा निरोप घेतला. याबाबत अभिनेत्री शरयू सोनावणे हिनं सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला आहे. शरयू या व्हिडीओमध्ये काय म्हणाली, ते सविस्तर वाचा..

'पारू' मालिका अचानक का बंद? शरयू सोनावणेनं सोडलं मौन, म्हणाली TRP चांगला असूनही पूर्वकल्पना न देता..
शरयू सोनावणेImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 18, 2026 | 10:09 AM
Share

प्रसाद जवादे आणि शरयू सोनावणे यांच्या मुख्य भूमिका असलेली ‘पारू’ ही मालिका अचानक बंद झाली. फेब्रुवारी महिन्यात या मालिकेचा शेवटचा एपिसोड प्रसारित झाला होता. तेव्हा कोणालाच कल्पना नव्हती की, ही मालिका बंद होत आहे. आता या मालिकेत पारूची मुख्य भूमिका साकारलेली अभिनेत्री शरयू सोनावणे हिने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे. सतत दोन वर्षे टीआरपी चांगला असूनही ही मालिका अचानक का बंद केली, हे सर्व अनपेक्षित आणि धक्कादायक होतं, अशा शब्दांत शरयू व्यक्त झाली.

काय म्हणाली शरयू?

“नमस्कार, मी शरयू सोनावणे.. म्हणजे तुमच्या सगळ्यांची लाडकी पारू. बरीच प्रतीक्षा केल्यानंतर अखेर मी माझ्या प्रेक्षकांसाठी हा व्हिडीओ करतेय. कारणच तसं आहे. गेल्या काही दिवसांपासून मला बरेच मेसेज आणि फोन कॉल्स येत आहेत. पारू ही मालिका अचानक का बंद झाली, असा प्रश्न मला विचारला जात आहे. मी तुम्हा सर्वांना हे सांगू इच्छिते की, 10 फेब्रुवारी 2026 रोजी ‘पारू’ या मालिकेचा शेवटचा एपिसोड प्रसारित करण्यात आला होता. तुमच्या प्रेमामुळेच, पाठिंब्यामुळेच आम्ही इतक्या लांबचा पल्ला गाठू शकलो. सतत दोन वर्ष टीआरपी चांगला असूनही ही मालिका अचानक बंद होणं ही सर्वांसाठीच अनपेक्षित गोष्ट आहे आणि अर्थातच धक्कादायक गोष्ट आहे,” असं ती म्हणाली.

याविषयी तिने पुढे सांगितलं, “आमची ‘पारू’ ही मालिका अचानक बंद होतेय, याबद्दल निर्मात्यांनी आम्हाला कोणतीच पूर्वकल्पना दिली नव्हती. आजवर मराठी टीव्ही इंडस्ट्रीत असा कुठल्याही मालिकेचा शेवट झाला नाही, जसा पारू या मालिकेचा झाला. मी तुम्हा सर्वांची मनापासून माफी मागते. कारण या मालिकेचा शेवटचा भागही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू शकलो नाही. काही तांत्रिक अडचणी आणि प्रॉडक्शनच्या समस्येमुळे हा शेवटचा भाग प्रसारित झाला नाही. आता पारू ही मालिका बंद होत असली तरी आपल्यातलं नातं, तुमचं माझ्यावर असलेलं प्रेम हे कायम माझ्यासोबत असेल. पारूच्या सुखादु:खात तुम्ही माझ्यासोबत होतात, यासाठी मी कायम तुमची ऋणी असेन.”

“आता लवकरच एका नव्या रुपात, नव्या भूमिकेत भेटुयात. तोपर्यंत तुमचा आशीर्वाद आणि माझ्यावर असलेलं प्रेम कायम राहुद्या. मी तुमची मनापासून माफी मागते, तुमचीच पारू,” असं म्हणत शरयूने या व्हिडीओचा शेवट केला.

Follow Us
ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत राऊतांचा संताप
Sanjay Raut EXCLUSIVE | ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत संजय राऊतांचा संताप
राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही...
Sushma Andhare | राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही भ्रमात नाही...
धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या निर्णयाने बदलणार राजकीय गणित
Omraje Nimbalkar | धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या एका निर्णयाने बदलणार राजकीय गणित, घडामोडींना वेग
गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
Viral Photos | गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट
Jayant Patil UNCUT | सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट; भ्रष्टाचारावरून घणाघात!
एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण... जाधवांनी अधिवेशनाआधीच सरकारला घेरलं
Bhaskar Jadhav UNCUT | एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण...भास्कर जाधवांनी अधिवेशनाआधीच फडणवीस सरकारला घेरलं!
चहा नको, उत्तर द्या! मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला MVAचा ठेंगा
Bhaskar Jadhav । चहा नको, उत्तर द्या! मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला MVAचा ठेंगा; भास्कर जाधवांचा सरकारवर थेट हल्लाबोल
वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर....
मोठी बातमी! वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर, भूमिका स्पष्ट करत म्हणाल्या....
मोठी घडामोड! ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना निरोप; सोमवारी मातोश्रीवर होणार
मोठी घडामोड! ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना निरोप; सोमवारी मातोश्रीवर होणार निर्णायक भेट
ओमराजेंच्या निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, तर ठाकरे गटाची मनधरणी सुरूच
Omraje Nimbalkar | ओमराजेंच्या एका निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, रोखण्यासाठी ठाकरे गटाची मनधरणी सुरूच