AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shilpa Shetty : शिल्पा शेट्टीची 4 तासांहून अधिक चौकशी; अभिनेत्रीला होऊ शकते अटक?

Shilpa Shetty : अभिनेत्री शिल्पा शेट्टीची सुमारे साडेचार तास चौकशी झाली. साठ कोटी रुपये फसवणुकीच्या प्रकरणात शिल्पा आणि तिचा पती राज कुंद्रा रडारवर आहेत. गेल्या काही दिवसांपासून हे प्रकरण चांगलंच चर्चेत आहे.

Shilpa Shetty : शिल्पा शेट्टीची 4 तासांहून अधिक चौकशी; अभिनेत्रीला होऊ शकते अटक?
Shilpa ShettyImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 08, 2025 | 9:08 AM
Share

Shilpa Shetty : एका बिझनेसमनची 60 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं अभिनेत्री शिल्पा शेट्टीची सुमारे साडेचार तास चौकशी केली. मात्र या प्रकरणात आपण लाभार्थी नसल्याचा दावा शिल्पाने या चौकशीदरम्यान केला. यावेळी तिने सादर केलेल्या कागदपत्रांची पोलीस पडताळणी करत आहेत. शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेसमन राज कुंद्रावर व्यावसायिक दीपक कोठारी यांची 60 कोटी 48 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं 14 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केला. राज कुंद्राने 60 कोटींपैकी 15 कोटी रुपये आपली पत्नी आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या जाहिरात कंपनीच्या बँक खात्यात वळविल्याची माहिती समोर आली होती. परंतु 4 ऑक्टोबर रोजी चौकशीदरम्यान खात्यात कोणतेही पैसे वळविण्यातत आले नसल्याचा दावा तिने केला आहे.

राज कुंद्राची दुसऱ्यांदा चौकशी

राज कुंद्रालाही चौकशीसाठी पुन्हा सोमवारी हजर राहण्याचे समन्स देण्या आले होते. मात्र त्याच्या विनंतीवरून शिल्पा शेट्टीसह त्याचीही सुमारे 4 तास चौकशी करण्यात आली. राज कुंद्राने सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करून नव्या पुराव्यांच्या आधारे त्याला यावेळी प्रश्न विचारण्यात आले.

नेमकं काय आहे प्रकरण?

2015 ते 2023 दरम्यान ही फसवणुकीची घटना घडल्याचा दावा संबंधित व्यावसायिकाने केला. शिल्पा आणि राजने त्यांचा व्यवसाय वाढवण्याच्या बहाण्याने पैसे घेतले, परंतु त्याऐवजी त्यांनी ते वैयक्तिक खर्चासाठी वापरलं, असा आरोप कोठारी यांनी केला. आर्थिक गुन्हे शाखेकडून शिल्पा आणि राजच्या प्रवासाच्या नोदींचीही तपासणी केली जात आहे. त्याचप्रमाणे त्यांना देश सोडून जाण्यापासून रोखता यावं, यासाठी लूकआऊट सर्क्युलर (LOC) जारी करण्यात आला आहे.

यावर्षी ऑगस्टमध्ये फसवणुकीचं हे वृत्त समोर आलं होतं. त्यावेळी शिल्पा आणि राजच्या वकिलांनी निवेदन जारी करत त्यांची बाजू मांडली होती. ‘शिल्पा आणि राजकडून त्यांच्याविरोधातील हे सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत. 4 ऑक्टोबर 2024 रोजी एनसीएलटी मुंबईने आधीच त्याचा निर्णय दिला आहे. हा एक जुना व्यवसाय करार असून आर्थिक अडचणींमुळे त्यात कायदेशीर समस्या निर्माण झाल्या होत्या. यात कोणताही गुन्हेगारी संबंध नाही. आमच्या लेखापरीक्षकांनी नियमितपणे EOW ला सर्व आवश्यक कागदपत्रे प्रदान केली आहेत. त्यामध्ये सर्व तपशील आहेत. हा करार इक्विटी गुंतवणुकीसारखाच होता आणि कंपनीने आधीच लिक्विडेशन ऑर्डर मिळवला होता. नंतर तो पोलीस विभागाकडेही सादर करण्यात आला होता’, असं त्याच्या वकिलाने स्पष्ट केलं होतं.

RSS स्वयंसेवकाचं मनसेत काय काम? पिट्याभाईला राज ठाकरेंनी खडसावलं!
RSS स्वयंसेवकाचं मनसेत काय काम? पिट्याभाईला राज ठाकरेंनी खडसावलं!.
जरांगेंना ठार मरण्यासाठी 3 प्लॅन! जरांगेंनी सांगितला A टू Z घटनाक्रम
जरांगेंना ठार मरण्यासाठी 3 प्लॅन! जरांगेंनी सांगितला A टू Z घटनाक्रम.
भास्कर जाधवांच्या मुलानं योगेश कदमांच्या कार्यकर्त्याला धुतलं अन्...
भास्कर जाधवांच्या मुलानं योगेश कदमांच्या कार्यकर्त्याला धुतलं अन्....
लोणार सरोवरातील खारं पाणी झालं गोडं! मासे दिसल्यानं जैवविविधता धोक्यात
लोणार सरोवरातील खारं पाणी झालं गोडं! मासे दिसल्यानं जैवविविधता धोक्यात.
'तो' मुंडेंचा PA, त्यानं मला ठार... जरांगेंच्या आरोपांनी राज्य हादरले
'तो' मुंडेंचा PA, त्यानं मला ठार... जरांगेंच्या आरोपांनी राज्य हादरले.
मनसे कार्यकर्त्यांकडून विहिरीत उतरून मतदारांचा शोध अन् अनोखं आंदोलन
मनसे कार्यकर्त्यांकडून विहिरीत उतरून मतदारांचा शोध अन् अनोखं आंदोलन.
1800 कोटीची जमीन 300 कोटीत, स्टॅम्प ड्युटीही माफ! पार्थ पवारांवर आरोप
1800 कोटीची जमीन 300 कोटीत, स्टॅम्प ड्युटीही माफ! पार्थ पवारांवर आरोप.
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, दादांनी झटकले हात अन् म्हणाले...
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, दादांनी झटकले हात अन् म्हणाले....
जरांगेंच्या हत्येचा कट, अडीच कोटींची सुपारी अन् बड्या नेत्याचं नाव
जरांगेंच्या हत्येचा कट, अडीच कोटींची सुपारी अन् बड्या नेत्याचं नाव.
'वंदे मातरम्' गीताला 150 वर्ष पूर्ण, मंत्रालयात विशेष कार्यक्रम
'वंदे मातरम्' गीताला 150 वर्ष पूर्ण, मंत्रालयात विशेष कार्यक्रम.