AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanajy Leela Bhansali : संजय लीला भन्साळी अ‍ॅडमिट असल्याची चर्चा, खरं काय? भन्साळीच्या टीमने काय सांगितलं?

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना हार्ट अटॅक आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते, मात्र आता त्यांच्या टीमने या संपूर्ण घटनेवर स्पष्टीकरण देत या सर्व अफवा असल्याचे स्पष्ट केलं.

Sanajy Leela Bhansali : संजय लीला भन्साळी अ‍ॅडमिट असल्याची चर्चा, खरं काय? भन्साळीच्या टीमने काय सांगितलं?
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी
| Updated on: Feb 25, 2026 | 1:50 PM
Share

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना हार्ट अटॅक आल्याने त्यांना रुग्णलयात अ‍ॅडमिट असल्याचे वृत्त समोर आले होते. काल त्यांचा वाढदिवस होता, आणि काल रात्रीच त्यांना अटॅक आला अशीही बातमी समोर आली होती.  त्यानंतर त्यांना लगेचच कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्तही समोर आले होते. मात्र संजय लीला भन्साळी यांच्या प्रकृतीबाबत येणाऱ्या बातम्या या केवळ अफवा आहेत, त्यांची प्रकृती उत्तम आहे, असं त्यांच्या टीमने सांगितलं आहे. त्यांच्या टीमने या संपूर्ण घटनेवर स्पष्टीकरण दिलं आहे.

भन्साळींच्या टीमने काय सांगितलं ?

एसएलबी (संजय लिला भन्साली ) हे रुग्णालयात दाखल झाल्याचे वृत्त पूर्णपणे खोटे आणि निराधार आहे. या वृत्ता काहीही तथ्य नाही. अशा कोणत्याही कथा प्रसारित करू नका, कारण त्यांचा कोणताही व्हेरिफाईड स्रोत नाही, असं म्हणत त्यांच्या टीमने अफवा न पसरवण्याची विनंती केली आहे. यामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

खरंतर सोशल मीडियावर एक पोस्ट खूप व्हायरल झाली होती, त्यामध्ये असा दाव करण्यात आला होता की संजय लीला भन्साळी यांना त्यांच्या वाढदिवशीच हार्ट अटॅक आला आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यामुळे चाहते चिंतेत होते. मात्र अशा बातम्या समोर येऊ लागताच संजय लीला भन्साळी यांच्या टीमकडन ताबडतोब एक निवेदन जारी करण्यात आलं आणि त्यांची प्रकृती उत्तम असल्याचं स्पष्टपणे सांगण्यात आलं.या सर्व बातम्या निराधार असून केवळ अफवा असल्याचंही टीमने नमूद केलं. टीमच्या या स्पष्टीकरणामुळे चाहत्यांचा जीव मात्र भांड्यात पडला आहे.

संजय लीला भन्साळी हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत.  ‘खामोशी’,  ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘हीरामंडी’ सारख्या अनेक उत्तम कलाकृती त्यांनी प्रेक्षकांसमोर सादर केल्या आहेत. सध्या ते ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटात व्यस्त असून त्यामध्ये रणबीर कपूर, विकी कौशल आणि आलिया भट्ट यांची प्रमुख भूमिका आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसा येणार असून चाहते त्यासाठी खूप उत्सुक आहेत.

Follow Us
एकनाथ शिंदें ऐवजी सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होणार? राऊतांचं विधान काय?
एकनाथ शिंदें ऐवजी सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होणार? राऊतांचं विधान काय?.
शरद पवारांच्या अस्तित्वाशिवाय बारामती आहे का?; राऊतांचे विधान चर्चेत
शरद पवारांच्या अस्तित्वाशिवाय बारामती आहे का?; राऊतांचे विधान चर्चेत.
जळगावात धक्कादायक प्रकार! KYCच्या बहाण्याने महिलेाकडे शरीरसुखाची मागणी
जळगावात धक्कादायक प्रकार! KYCच्या बहाण्याने महिलेाकडे शरीरसुखाची मागणी.
आशा भोसलेंचं निधन, शिवाजी पार्कातील स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
आशा भोसलेंचं निधन, शिवाजी पार्कातील स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार.
संगीत क्षेत्रातल्या युगाचा अस्त, आशा भोसलेंचं 92 व्या वर्षी निधन
संगीत क्षेत्रातल्या युगाचा अस्त, आशा भोसलेंचं 92 व्या वर्षी निधन.
ई केवायसीच्या नावाखाली महिलेकडून शरीर सुखाची मागणी, जळगावातील घटनेने ख
ई केवायसीच्या नावाखाली महिलेकडून शरीर सुखाची मागणी, जळगावातील घटनेने ख.
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! पुढील 18 तास काही भागातील पाणी पुरवठा बंद
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! पुढील 18 तास काही भागातील पाणी पुरवठा बंद.
आढावा बैठकीत शेजारी बसूनही शिरसाट, सत्तारांचा अबोला, भर मंचावर...
आढावा बैठकीत शेजारी बसूनही शिरसाट, सत्तारांचा अबोला, भर मंचावर....
एका युगाचा अंत! अजरामर गीतांना स्वर देणाऱ्या आशाताईंचा अल्पपरिचय
एका युगाचा अंत! अजरामर गीतांना स्वर देणाऱ्या आशाताईंचा अल्पपरिचय.
आशा भोसले यांना अशोक सराफ यांनी वाहिली आदरांजली, म्हणाले त्यांचा आवाज
आशा भोसले यांना अशोक सराफ यांनी वाहिली आदरांजली, म्हणाले त्यांचा आवाज.