AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suniel Shetty: “.. तर माझं करिअरच उद्ध्वस्त झालं असतं”; सुनील शेट्टी असं का म्हणाला?

सुनील शेट्टीने सांगितलं बॉलिवूड चित्रपटांच्या अपयशामागचं कारण; म्हणाला "कचऱ्यासाठी लोक पैसे.."

Suniel Shetty: .. तर माझं करिअरच उद्ध्वस्त झालं असतं; सुनील शेट्टी असं का म्हणाला?
Suniel Shetty Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 12, 2023 | 10:28 AM
Share

मुंबई: उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भेटीदरम्यान अभिनेता सुनील शेट्टीने ‘बॉयकॉट बॉलिवूड’ ट्रेंडपासून सुटका करण्याची विनंती त्यांच्याकडे केली होती. यानंतर सुनील शेट्टी सोशल मीडियावर चर्चेत आला होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने बॉलिवूड चित्रपटांच्या अपयश होण्यामागचं कारण सांगितलं. आजच्या घडीला प्रेक्षक चित्रपटांच्या नावावर मिळणाऱ्या कचऱ्यासाठी पैसे भरायला तयार नसतात, असं रोखठोक विधान त्याने या मुलाखतीत केलं.

प्रेक्षक आता कचऱ्यासाठी पैसे भरायला तयार नसतात आणि त्यामुळेच बॉलिवूडवर अशी वेळ आली आहे, असं सुनील शेट्टी म्हणाला. “माझी मुलं मला विचारतात की तुम्ही चित्रपटांमध्ये काम करणं बंद का केलं? त्यावर मी त्यांना सांगितलं की मी बऱ्याच चुका केल्या आहेत आणि आता प्रेक्षक त्या कचऱ्यासाठी पैसे भरायला तयार नाहीत, जे मी त्यांना देत आलो होतो”, असं त्याने सांगितलं.

इतकंच नव्हे तर बॉलिवूडने पुन्हा शून्यापासून सुरूवात करून अर्थव्यवस्था कशी चालते, हे समजून घ्यावं असंही ते म्हणाले. “90 च्या दशकात कलाकारांविषयी इतकी मतं बनवली जायची नाही, जितकी आज बनवली जातात. माझा पहिला आरझू हा चित्रपट फ्लॉप ठरला. पण मी ॲक्शनमध्ये चांगला असल्याने मला पुढचे चित्रपट मिळाले. लोक माझ्याबद्दल चांगलं बोलत होते. जर का ही गोष्ट आजच्या काळात घडली असती तर माझं करिअरच उद्ध्वस्त झालं असतं. सोशल मीडियावर माझी प्रचंड टीका झाली असती”, असा फरकही त्याने सांगितला.

सुनील शेट्टीने नुकतीच ‘धारावी बँक’ या चित्रपटात भूमिका साकारली. यामध्ये त्याच्यासोबत विवेक ऑबेरॉयने मुख्य भूमिका साकारली. सुनीलच्या ‘हेरा फेरी 3’ या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.