AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विवेक-ऐश्वर्याच्या वादानंतर सलमान खानसोबत कसं आहे नातं? सुरेश ओबेरॉय म्हणतात..

मुंबई : 19 डिसेंबर 2023 | बॉलिवूडमधील काही नाती संपुष्टात आली असली तरी अनेक वर्षांपर्यंत त्यांची चर्चा होते. अभिनेता विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय यांचंही नातं असंच काहीसं आहे. या दोघांचं रिलेशनशिप जितकं चर्चेत होतं, त्यापेक्षा जास्त चर्चा त्यांच्या ब्रेकअपची झाली. 2003 मध्ये विवेक-ऐश्वर्याचे मार्ग वेगळे झाले होते. आता तब्बल 20 वर्षांनंतर विवेकचे वडील सुरेश […]

विवेक-ऐश्वर्याच्या वादानंतर सलमान खानसोबत कसं आहे नातं? सुरेश ओबेरॉय म्हणतात..
Suresh Oberoi and Salman KhanImage Credit source: Instagram
| Updated on: Dec 19, 2023 | 9:34 AM
Share

मुंबई : 19 डिसेंबर 2023 | बॉलिवूडमधील काही नाती संपुष्टात आली असली तरी अनेक वर्षांपर्यंत त्यांची चर्चा होते. अभिनेता विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय यांचंही नातं असंच काहीसं आहे. या दोघांचं रिलेशनशिप जितकं चर्चेत होतं, त्यापेक्षा जास्त चर्चा त्यांच्या ब्रेकअपची झाली. 2003 मध्ये विवेक-ऐश्वर्याचे मार्ग वेगळे झाले होते. आता तब्बल 20 वर्षांनंतर विवेकचे वडील सुरेश ओबेरॉय हे मुलाच्या रिलेशनशिपविषयी मोकळेपणे व्यक्त झाले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, विवेक-ऐश्वर्याच्या नात्याबद्दल त्यांना काहीच माहीत नव्हतं. कारण विवेकने त्यांना याबद्दल काहीच सांगितलं नव्हतं. या मुलाखतीत ते सलमान खान आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत आता नातं कसं आहे, याविषयीही व्यक्त झाले.

विवेक-सलमानचं नातं

विवेक ओबेरॉयने दिग्दर्शक राम गोपाल वर्माच्या ‘कंपनी’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. राम गोपाव वर्मा यांच्याकडून विवेकच्या नात्याबद्दल सर्वांत आधी समजल्याचं सुरेश ओबेरॉय म्हणाले. विवेक आणि ऐश्वर्या हे ‘क्यूँ हो गया ना’ या चित्रपटात एकत्र काम करताना एकमेकांच्या प्रेमात पडले होते. मात्र ऐश्वर्याचं सलमान खानसोबतचं भूतकाळातील नातं हे विवेकसाठी त्रासदायक ठरलं होतं. अचानक एकदा विवेकने सर्वांसमोर येऊन खुलासा केला की सलमान त्याला धमक्या देत आहे.

View this post on Instagram

A post shared by Vivek Oberoi (@vivekoberoi)

सलमानशी आता कसं आहे नातं?

आता इतक्या वर्षांनंतर सलमानसोबत कसं नातं आहे, याविषयी बोलताना सुरेश ओबेरॉय म्हणाले, “तो जेव्हा कधी मला भेटतो, तेव्हा त्याची सिगारेट लपवतो आणि माझ्याशी खूप आदराने बोलतो. तो किंवा त्याचे वडील सलीम खान माझ्याशी खूप आदराने भेटतात आणि बोलतात. मी विवेकला नेहमीच सलीम यांच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेण्यास सांगतो. मी सलीम भाई यांचा खूप आदर करतो. काही गोष्टी घडल्या, पण माझं नातं त्यांच्यासोबत चांगलं आहे.”

विवेकने ऑक्टोबर 2010 मध्ये कर्नाटकचे मंत्री जीवराज अल्वा यांची कन्या प्रियांका अल्वाशी लग्न केलं. लग्नापूर्वी विवेक केवळ ऐश्वर्यासोबतच नाही तर इतरही काही जणींसोबत रिलेशनशिपमध्ये होता. मात्र ब्रेकअपनंतर त्यांच्याशी चांगली मैत्री जपल्याचं विवेकने एका मुलाखतीत सांगितलं होतं. इतकंच नव्हे तर लग्नात माझ्या एक्स गर्लफ्रेंड्सनीही हजेरी लावली होती, असंही तो म्हणाला होता.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला