AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समजावलं होतं नको करूस.. विवेक-ऐश्वर्याच्या नात्याबद्दल सुरेश ओबेरॉय यांनी सोडलं मौन

मुंबई : 19 डिसेंबर 2023 | अभिनेते सुरेश ओबेरॉय हे बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांपैकी एक आहेत. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. नुकतीच त्यांनी रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ या चित्रपटात भूमिका साकारली होती. या चित्रपटानिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत, ते बऱ्याच वर्षांनंतर मुलगा विवेक ओबेरॉयच्या ऐश्वर्यासोबतच्या नात्याबद्दल व्यक्त झाले. विवेक आणि ऐश्वर्या राय यांच्या रिलेशनशिपविषयी मला काहीच […]

समजावलं होतं नको करूस.. विवेक-ऐश्वर्याच्या नात्याबद्दल सुरेश ओबेरॉय यांनी सोडलं मौन
ऐश्वर्याबद्दल विवेक माझ्याकडे.. सुरेश ओबेरॉय यांच्याकडून खुलासाImage Credit source: Instagram
| Updated on: Dec 19, 2023 | 8:36 AM
Share

मुंबई : 19 डिसेंबर 2023 | अभिनेते सुरेश ओबेरॉय हे बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांपैकी एक आहेत. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. नुकतीच त्यांनी रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ या चित्रपटात भूमिका साकारली होती. या चित्रपटानिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत, ते बऱ्याच वर्षांनंतर मुलगा विवेक ओबेरॉयच्या ऐश्वर्यासोबतच्या नात्याबद्दल व्यक्त झाले. विवेक आणि ऐश्वर्या राय यांच्या रिलेशनशिपविषयी मला काहीच माहीत नव्हतं, कारण माझ्या मुलाने मला या सगळ्या गोष्टी सांगितल्याच नव्हत्या, असं ते म्हणाले. यासोबतच आता त्यांचं सलमान खान आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबतचं नातं कसं आहेत, त्याविषयीही त्यांनी खुलासा केला.

“त्याला समजावलं होतं..”

या मुलाखतीत सुरेश ओबेरॉय म्हणाले की विवेकने त्यांना त्याच्या रिलेशनशिपविषयी काहीच सांगितलं नव्हतं. त्यामुळे त्यांना त्या दोघांच्या नात्याविषयी कोणतीची माहिती नव्हती. इतकंच नव्हे तर दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्याकडून मला विवेक-ऐश्वर्याबद्दल समजलं होतं, असंही ते म्हणाले. ‘लेहरें रेट्रो’ला दिलेल्या या मुलाखतीत ते पुढे म्हणाले, “बऱ्याच गोष्टी मला माहीत नव्हत्या. विवेकने मला कधीच त्या सांगितल्या नव्हत्या. राम गोपाल वर्माकडून मला ही गोष्ट समजली होती आणि त्याआधी आणखी एका व्यक्तीकडून मला त्या गोष्टी कळाल्या होत्या. मी त्याला समजावलं होतं की असं काही करू नकोस.”

अमिताभ बच्चन यांच्यासोबतचं नातं

या मुलाखतीत त्यांना असाही प्रश्न विचारण्यात आला होता की विवेकमुळे अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या नात्यावर काही परिणाम झाला का? त्याचं उत्तर देताना सुरेश म्हणाले, “अमिताभ बच्चन कधीच माझे खूप चांगले मित्र नव्हते. मी फक्त त्यांचा सहकलाकार होतो. माझ्या भावाच्या निधनाच्या वेळी जया बच्चन आल्या होत्या. पण आमचं नातं इंडस्ट्रीच्या हिशोबानेच होतं. माझी मैत्री डॅनी मुकूलशीच होती. मिस्टर बच्चन यांनी मला त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमंत्रित केलं होतं. आम्ही जेव्हा कधी एकमेकांसमोर येतो, तेव्हा चांगलेच असतो.”

सलमान खानबद्दल काय म्हणाले?

सलमान खानबद्दल बोलताना सुरेश ओबेरॉय म्हणाले, “सलमान जेव्हा कधी मला भेटतो, तेव्हा त्याची सिगारेट लपवतो आणि माझ्याशी खूप आदराने बोलतो. तो किंवा त्याचे वडील सलीम खान माझ्याशी खूप आदराने भेटतात आणि बोलतात. मी विवेकला नेहमीच सलीम यांच्या पायांना स्पर्श करण्यास सांगतो. मी सलीम भाई यांचा खूप आदर करतो. काही गोष्टी घडल्या, पण माझं नातं त्यांच्यासोबत चांगलं आहे.”

विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय हे एकमेकांना डेट करत होते. मात्र 2003 मध्ये त्यांचा ब्रेकअप झाला होता. ऐश्वर्याचा एक्स बॉयफ्रेंड सलमान खानने धमकी दिल्याचा खुलासा विवेकने काही जुन्या मुलाखतींमध्ये केला होता.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.