AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Taarak Mehta | ‘तारक मेहता’ने अखेर सांगितलं मालिका सोडण्यामागचं खरं कारण; निर्मात्यांविषयी केला मोठा खुलासा

निर्मात्यांनी त्यांची फी परत केली नसल्याचेही आरोप झाले. त्यावर निर्माते असित कुमार मोदी यांचीही प्रतिक्रिया समोर आली. इतकंच नव्हे तर हे दोघं अप्रत्यक्षपणे एकमेकांवर निशाणा साधताना दिसले.

Taarak Mehta | 'तारक मेहता'ने अखेर सांगितलं मालिका सोडण्यामागचं खरं कारण; निर्मात्यांविषयी केला मोठा खुलासा
| Updated on: Feb 26, 2023 | 1:50 PM
Share

मुंबई : छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ गेल्या 15 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. मात्र गेल्या काही दिवसांपासून या मालिकेशी संबंधित काही नकारात्मक चर्चा समोर येत आहेत. या मालिकेत तारक मेहताची भूमिका साकारणारे अभिनेते शैलेश लोढा यांनी मालिकेला रामराम केला. त्यानंतर या चर्चांना उधाण आलं. निर्मात्यांनी त्यांची फी परत केली नसल्याचेही आरोप झाले. त्यावर निर्माते असित कुमार मोदी यांचीही प्रतिक्रिया समोर आली. इतकंच नव्हे तर हे दोघं अप्रत्यक्षपणे एकमेकांवर निशाणा साधताना दिसले. आता याप्रकरणी शैलेश लोढा यांनी अखेर मालिका सोडण्यामागचं खरं कारण सांगितलं आहे.

निर्मात्यांवर अप्रत्यक्ष निशाणा

शैलेश लोढा यांनी नुकताच एका साहित्यिक कार्यक्रमात भाग घेतला होता. या कार्यक्रमात त्यांनी सुंदर कविता वाचून दाखवल्या. त्यानंतर त्यांना जेव्हा मालिकेविषयी विचारण्यात आलं, तेव्हा ते म्हणाले, “जे मागे निघून गेलं, त्याच्याविषयी काय विचार करायचा? तुम्ही माझ्या इशाऱ्यांमधून माझं बोलणं समजून घ्या. पुस्तकं छापणारे पब्लिशर हिऱ्याची अंगठी घालून फिरत आहेत आणि लेखकाला आपलंच पुस्तक छापण्यासाठी पैसे द्यावे लागत आहेत. जेव्हा दुसऱ्यांच्या प्रतिभेतून कमावणारे व्यापारी स्वत:ला त्यांच्यापेक्षा मोठं समजू लागतात, तेव्हा त्यांना हे सांगणं खूप गरजेचं असतं की ते इतरांच्या प्रतिभेतून कमाई करत आहेत.”

“..तेव्हा माझा ज्वालामुखी फुटेल”

हे सर्व बोलताना निर्मात्यांवर निशाणा साधत ते पुढे म्हणाले, “मी ती व्यक्ती आहे, जिने आवाज उठवला. या जगातील कोणताच पब्लिशर एका लेखकापेक्षा कधीच मोठा होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे जगातील कोणताच निर्माता एखाद्या अभिनेत्यापेक्षा मोठा होऊ शकत नाही. मी कवी आणि अभिनेता आहे. जेव्हा जेव्हा मी कवी किंवा अभिनेता असण्यावर किंवा माझ्या विचारांवर दबाव आणला जाईल, तेव्हा तेव्हा माझा ज्वालामुखी फुटेल.”

शैलेश लोढा यांची फी थकवली?

शैलेश लोढा यांची सहा आकडी फी निर्मात्यांनी थकवल्याची चर्चा होती. गेल्या वर्षी त्यांनी ही मालिका सोडली. मालिकेत आता त्यांची जागा अभिनेता साहिल श्रॉफने घेतली आहे. शैलेश यांनी मानधन थकवल्याच्या चर्चांवर थेट प्रतिक्रिया दिली नाही. मात्र एका मुलाखतीत ते उपरोधिकपणे म्हणाले होते, “यात काही नवीन नाही.”

“मालिका सोडल्यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यास अनेकदा सांगूनही शैलेश लोढा यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. जेव्हा तुम्ही कोणताही शो किंवा कंपनी सोडता, तेव्हा तुम्हाला ती प्रक्रिया पूर्ण करावी लागते. कोणतीच कंपनी प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय मानधन देत नाही”, असं मालिकेचे प्रोजेक्ट हेड सुहेल रमाणी म्हणाले.

Follow Us
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम.
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं..
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी....
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन.
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट..
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट...
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं.
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?.
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर.
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ.
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि.