AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aai Kuthe Kay karte | एकमेकांची साथ 25 वर्षांचा संसार, अनिरुद्ध आणि अरुंधती पुन्हा असे कधी हसतील का?, पाहा मिलिंद गवळींची खास पोस्ट

मिलिंद गवळी यांनी शेअर केलेल्या या पोस्टमध्ये त्यांचे आणि अरुंधती साकारणाऱ्या मधुराणी प्रभुलकर यांचे खास हसरे फोटो आहेत. तर, या फोटोंना कॅप्शन देताना त्यांनी लिहिली की, ‘अनिरुद्ध आणि अरुंधती पुन्हा असे कधी हसतील का?’ सोबतच त्यांनी या मालिकेचं कथानक देखील समजावून सांगितलं आहे.

Aai Kuthe Kay karte | एकमेकांची साथ 25 वर्षांचा संसार, अनिरुद्ध आणि अरुंधती पुन्हा असे कधी हसतील का?, पाहा मिलिंद गवळींची खास पोस्ट
अरुंधती-अनिरुद्ध
| Edited By: | Updated on: Aug 30, 2021 | 1:20 PM
Share

मुंबई : छोट्या पडद्यावरील बहुचर्चित आणि लोकप्रिय मालिका म्हणजे स्टार प्रवाह वरील ‘आई कुठे काय करते’(Aai Kuthe Kay Karte). या मालिकेने घराघरांत आणि प्रेक्षकांच्या मनामनात स्थान मिळवले आहे. या वेळी ही मालिका टीआरपी शर्यतीतही अव्वल क्रमांकावर आहे. सध्या मालिकेत अनेक नवी वळणे येत असून, मालिका अतिशय मनोरंजक झाली आहे. मालिकेत सध्या अनिरुद्ध देशमुख आणि संजना याच्या लग्नाचा ट्रॅक सुरु आहे. मात्र आता या महत्वाच्या मुहूर्तावर देखील एक नवा हंगामा दिसणार आहे. मात्र, या सगळ्यात आता अनिरुद्ध साकारणाऱ्या अभिनेते मिलिंद गवळी यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

मिलिंद गवळी यांनी शेअर केलेल्या या पोस्टमध्ये त्यांचे आणि अरुंधती साकारणाऱ्या मधुराणी प्रभुलकर यांचे खास हसरे फोटो आहेत. तर, या फोटोंना कॅप्शन देताना त्यांनी लिहिली की, ‘अनिरुद्ध आणि अरुंधती पुन्हा असे कधी हसतील का?’ सोबतच त्यांनी या मालिकेचं कथानक देखील समजावून सांगितलं आहे.

पाहा पोस्ट :

काय म्हणाले मिलिंद गवळी?

ही खास पोस्ट शेअर करताना कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, ‘वास्तविक नातेसंबंध खूप सोपे आणि सुंदर आहेत, जसजसा वेळ जातो तसतसे ते अधिक मजबूत होतात. एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे समजून घेण्यास आणि जाणून घेण्यास सुरुवात करते आणि नातेसंबंध आणखी मजबूत करण्यासाठी 25 वर्षे ही एक मोठी वेळ असते. अनिरुद्ध त्यांच्या लग्नात एकनिष्ठ राहिला असता, तर अरुंधती आणि अनिरुद्ध एक सुंदर जोडपे असते आणि त्यांच्या विवाहित जीवनाचा सुखी प्रवास असता. ते त्यांच्या तीन सुंदर मुलांसह सर्वोत्तम जोडप्यांपैकी एक बनले असते आणि आनंदी पालक असते.

बरेच लोक संजनाला हे नातं बिघडल्याबद्दल किंवा लग्न मोडल्याबद्दल दोष देतात, पण मला वाटते की या सर्व गोंधळासाठी अनिरुद्ध दोषी आहे. तो अत्यंत बेजबाबदार आणि अहंकारी होता, त्याला केक घ्यावा आणि तो खावा असे वाटते. त्याने संजनाचे आयुष्यही उध्वस्त केले आहे. त्याच्यामुळे दोन्ही महिलांना त्रास होत आहे. या दोन्ही स्त्रिया खूप मजबूत आहेत.. त्या दोन्ही लढवय्या आहेत… आणि म्हणून ही मालिका स्पष्टपणे दाखवते की, पुरुष स्त्रियांना यापुढे गृहीत धरू शकत नाहीत, जरी स्त्रिया कमी शिकलेल्या असतील किंवा अगदी साध्या असतील, वेळ आली तर त्या आई दुर्गा बनू शकतट आणि सर्व वाईट गोष्टींशी लढू शकतात. आम्ही या सीरियलमध्ये हा सकारात्मक संदेश स्पष्टपणे दाखवत आहोत.

आम्ही भाग्यवान आहोत की, दोन अत्यंत मजबूत महिला या मालिकेच्या संकल्पना आणि संवाद लिहित आहेत. आम्ही महिलांना सशक्त करत आहोत आणि सशक्त दाखवत आहोत. अरुंधती आणि आता संजनासाठी अनिरुद्ध, पंचिंग बॅग असल्याचा मला सन्मान आहे. एखाद्याला सकारात्मक बाजू दाखवण्यासाठी वाईट बनावे लागते लागते. म्हणून मी अनिरुद्ध द एविलची भूमिका करतो. अनिरुद्धला नकारात्मक भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार मिळाला, मला सांगा आणखी काय हवे?’. त्यांच्या या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

हेही वाचा :

प्रभास आणि पूजा हेगडेच्या ‘राधेश्याम’ची उत्सुकता; जन्माष्टमीच्या निमित्ताने नव्या पोस्टरचे अनावरण!

यावेळी ‘बिग बॉस मराठी’ असणार वेगळं! पाहा काय काय असतील घरातील नवे बदल

प्रियांका चोप्रा आणि निकचा रोमान्स, रोमांटिक फोटो व्हायरल; सोशल मीडियाचं तापमान वाढलं

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.