AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aai Kuthe Kay karte | एकमेकांची साथ 25 वर्षांचा संसार, अनिरुद्ध आणि अरुंधती पुन्हा असे कधी हसतील का?, पाहा मिलिंद गवळींची खास पोस्ट

मिलिंद गवळी यांनी शेअर केलेल्या या पोस्टमध्ये त्यांचे आणि अरुंधती साकारणाऱ्या मधुराणी प्रभुलकर यांचे खास हसरे फोटो आहेत. तर, या फोटोंना कॅप्शन देताना त्यांनी लिहिली की, ‘अनिरुद्ध आणि अरुंधती पुन्हा असे कधी हसतील का?’ सोबतच त्यांनी या मालिकेचं कथानक देखील समजावून सांगितलं आहे.

Aai Kuthe Kay karte | एकमेकांची साथ 25 वर्षांचा संसार, अनिरुद्ध आणि अरुंधती पुन्हा असे कधी हसतील का?, पाहा मिलिंद गवळींची खास पोस्ट
अरुंधती-अनिरुद्ध
| Edited By: Harshada Bhirvandekar | Updated on: Aug 30, 2021 | 1:20 PM
Share

मुंबई : छोट्या पडद्यावरील बहुचर्चित आणि लोकप्रिय मालिका म्हणजे स्टार प्रवाह वरील ‘आई कुठे काय करते’(Aai Kuthe Kay Karte). या मालिकेने घराघरांत आणि प्रेक्षकांच्या मनामनात स्थान मिळवले आहे. या वेळी ही मालिका टीआरपी शर्यतीतही अव्वल क्रमांकावर आहे. सध्या मालिकेत अनेक नवी वळणे येत असून, मालिका अतिशय मनोरंजक झाली आहे. मालिकेत सध्या अनिरुद्ध देशमुख आणि संजना याच्या लग्नाचा ट्रॅक सुरु आहे. मात्र आता या महत्वाच्या मुहूर्तावर देखील एक नवा हंगामा दिसणार आहे. मात्र, या सगळ्यात आता अनिरुद्ध साकारणाऱ्या अभिनेते मिलिंद गवळी यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

मिलिंद गवळी यांनी शेअर केलेल्या या पोस्टमध्ये त्यांचे आणि अरुंधती साकारणाऱ्या मधुराणी प्रभुलकर यांचे खास हसरे फोटो आहेत. तर, या फोटोंना कॅप्शन देताना त्यांनी लिहिली की, ‘अनिरुद्ध आणि अरुंधती पुन्हा असे कधी हसतील का?’ सोबतच त्यांनी या मालिकेचं कथानक देखील समजावून सांगितलं आहे.

पाहा पोस्ट :

काय म्हणाले मिलिंद गवळी?

ही खास पोस्ट शेअर करताना कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, ‘वास्तविक नातेसंबंध खूप सोपे आणि सुंदर आहेत, जसजसा वेळ जातो तसतसे ते अधिक मजबूत होतात. एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे समजून घेण्यास आणि जाणून घेण्यास सुरुवात करते आणि नातेसंबंध आणखी मजबूत करण्यासाठी 25 वर्षे ही एक मोठी वेळ असते. अनिरुद्ध त्यांच्या लग्नात एकनिष्ठ राहिला असता, तर अरुंधती आणि अनिरुद्ध एक सुंदर जोडपे असते आणि त्यांच्या विवाहित जीवनाचा सुखी प्रवास असता. ते त्यांच्या तीन सुंदर मुलांसह सर्वोत्तम जोडप्यांपैकी एक बनले असते आणि आनंदी पालक असते.

बरेच लोक संजनाला हे नातं बिघडल्याबद्दल किंवा लग्न मोडल्याबद्दल दोष देतात, पण मला वाटते की या सर्व गोंधळासाठी अनिरुद्ध दोषी आहे. तो अत्यंत बेजबाबदार आणि अहंकारी होता, त्याला केक घ्यावा आणि तो खावा असे वाटते. त्याने संजनाचे आयुष्यही उध्वस्त केले आहे. त्याच्यामुळे दोन्ही महिलांना त्रास होत आहे. या दोन्ही स्त्रिया खूप मजबूत आहेत.. त्या दोन्ही लढवय्या आहेत… आणि म्हणून ही मालिका स्पष्टपणे दाखवते की, पुरुष स्त्रियांना यापुढे गृहीत धरू शकत नाहीत, जरी स्त्रिया कमी शिकलेल्या असतील किंवा अगदी साध्या असतील, वेळ आली तर त्या आई दुर्गा बनू शकतट आणि सर्व वाईट गोष्टींशी लढू शकतात. आम्ही या सीरियलमध्ये हा सकारात्मक संदेश स्पष्टपणे दाखवत आहोत.

आम्ही भाग्यवान आहोत की, दोन अत्यंत मजबूत महिला या मालिकेच्या संकल्पना आणि संवाद लिहित आहेत. आम्ही महिलांना सशक्त करत आहोत आणि सशक्त दाखवत आहोत. अरुंधती आणि आता संजनासाठी अनिरुद्ध, पंचिंग बॅग असल्याचा मला सन्मान आहे. एखाद्याला सकारात्मक बाजू दाखवण्यासाठी वाईट बनावे लागते लागते. म्हणून मी अनिरुद्ध द एविलची भूमिका करतो. अनिरुद्धला नकारात्मक भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार मिळाला, मला सांगा आणखी काय हवे?’. त्यांच्या या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

हेही वाचा :

प्रभास आणि पूजा हेगडेच्या ‘राधेश्याम’ची उत्सुकता; जन्माष्टमीच्या निमित्ताने नव्या पोस्टरचे अनावरण!

यावेळी ‘बिग बॉस मराठी’ असणार वेगळं! पाहा काय काय असतील घरातील नवे बदल

प्रियांका चोप्रा आणि निकचा रोमान्स, रोमांटिक फोटो व्हायरल; सोशल मीडियाचं तापमान वाढलं

Follow Us
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?
मोठी बातमी! शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? कोर्टाच्या निदर्शनात असं काय आलं
मोठी बातमी! शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? कोर्टाच्या निदर्शनात असं काय आलं?