AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KBC 13 | गीता सिंहना 7 कोटींवर पाणी सोडायला लावणारा प्रश्न अकबराशी संबंधित, तुम्हाला माहितेय का उत्तर?

‘महानायक’ अमिताभ बच्चन होस्ट करत असलेल्या 'कौन बनेगा करोडपती 13' या शोमध्ये स्पर्धक हिमानी बुंदेला आणि साहिल अहिरवार यांच्यानंतर मध्य प्रदेशच्या गीता सिंह गौर यांनी तिसरी करोडपती होण्याचा मान मिळवला आहे. एकूण 1 कोटीची रक्कम जिंकण्यासाठी त्यांनी 15 प्रश्नांची अचूक उत्तरे दिली. पण, गीता सिंह यांचा मोठ्या रकमेचा प्रश्न चुकला.

KBC 13 | गीता सिंहना 7 कोटींवर पाणी सोडायला लावणारा प्रश्न अकबराशी संबंधित, तुम्हाला माहितेय का उत्तर?
Geeta Singh-Amitabh Bachchan
| Edited By: Harshada Bhirvandekar | Updated on: Nov 11, 2021 | 2:33 PM
Share

मुंबई : ‘महानायक’ अमिताभ बच्चन होस्ट करत असलेल्या ‘कौन बनेगा करोडपती 13’ या शोमध्ये स्पर्धक हिमानी बुंदेला आणि साहिल अहिरवार यांच्यानंतर मध्य प्रदेशच्या गीता सिंह गौर यांनी तिसरी करोडपती होण्याचा मान मिळवला आहे. एकूण 1 कोटीची रक्कम जिंकण्यासाठी त्यांनी 15 प्रश्नांची अचूक उत्तरे दिली. पण, गीता सिंह यांचा मोठ्या रकमेचा प्रश्न चुकला.

या शेवटच्या प्रश्नाचे उत्तर दिल्यावर गीता यांना 7 कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार होते. गीता या प्रश्नाचे उत्तर देऊ शकल्या नाहीत. याशिवाय त्यांनी आधीच सर्व लाईफ लाईन वापरल्या होत्या, त्यामुळे 7 कोटींच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी त्यांना कोणतीही मदत देखील नव्हती. त्यामुळेच हा खेळ तिथेच सोडून जिंकलेले पैसे घेऊन पुढे न खेळण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

7 कोटींचा प्रश्न काय होता?

गीता यांना 7 कोटीं साठी विचारला गेलेला हा प्रश्न अकबराशी संबंधित होता. प्रश्न होता मुघल सम्राट अकबराच्या नातवाचा. अमिताभ बच्चन यांनी प्रश्न विचारला होता की, ‘यातील कोणते नाव अकबरच्या तीन नातवंडांच्या नावांपैकी नाही, जे पाद्रींकडे सुपूर्द केल्यानंतर ख्रिश्चन बनले होते?’

ज्यामध्ये डॉन फेलिप, डॉन हेन्रिक, डॉन कार्लोस आणि डॉन फ्रान्सिस्को असे चार पर्याय देण्यात आले होते.

लाईफलाइन नसल्याने आणि प्रश्नाचे अचूक उत्तर न आल्याने गीता यांनी गेम सोडून घरी जाण्याचा निर्णय घेतला.  त्यांनी खेळ सोडल्यानंतर अमिताभ यांनी  या प्रश्नाचे अचूक उत्तर सांगितले.

काय होते अचूक उत्तर?

अमिताभ यांनी सांगितले की, असे मानले जाते की, जहांगीर नास्तिक होता. त्याने आपला भाऊ दानियाल मिर्झाच्या तीन मुलांना येशूच्या याजकांच्या स्वाधीन केले. क्रॉस आणि पोर्तुगीज कपडे परिधान करून तिघांनीही आग्राभोवती परेड केली. त्यामुळे त्यांची नावेही बदलली – तहमुरास डॉन फेलिप, बायसुंगार डॉन कार्लोस आणि हुशांग डॉन हेनरिक झाले. मात्र, काही महिन्यांनंतर त्यांनी पुन्हा इस्लाम धर्म स्वीकारला. म्हणूनच योग्य उत्तर डॉन फ्रान्सिस्को आहे.

16 वर्षाचे अथक प्रयत्न

गीता सांगतात, ‘जेव्हापासून केबीसी प्रसारित झाला तेव्हापासून मी त्यात सहभागी होण्याचे स्वप्न पाहिले आहे. त्यासाठी मी दरवर्षी प्रयत्न करायचे. मी सतत गेली 16 ते 17 वर्षे प्रयत्न केले. जेव्हा कधी हरायचे, त्यावेळी मी खूप निराश व्हायचे. माझी मुलं मला हताश झालेलं बघायची आणि म्हणायची की, आई तू प्रयत्न करूच नकोस,  कारण जेव्हा तुझी निवड होत नाही, तेव्हा तुला दुःखी पाहून आम्हाला खूप वाईट वाटतं. पण आयुष्य निघून गेले तरी मी प्रयत्न करत राहीन असा निर्धार केला होता. पण आता अखेर मला यश मिळाले आहे.’

हेही वाचा :

मराठी चित्रपटांची मांदियाळी, हास्याची मेजवानी घेऊन येणारा ‘इमेल फिमेल’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

Satyamev Jayate 2 | ‘दिलबर’नंतर नोरा फतेहीचे ‘दिलरुबा’वर ठुमके, डान्स मुव्ह्स पाहून चाहतेही झाले घायाळ!

Follow Us
राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
संजय राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे...
ताडदेव गृहप्रकल्प वाद; मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे नेते थेट...
अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा विलंबावर पलटवार
संसदीय वादंग: अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा १९ दिवसांच्या विलंबावर पलटवार
मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा
Manoj Jarange | मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा; मुंबईत मराठ्यांना येण्याचे आवाहन
असीम सरोदे यांचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर विश्लेषण
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद अंतिम टप्प्यात. असीम सरोदे यांचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर विश्लेषण
धनुष्यबाण गोठवून पक्ष ठाकरेंना देणार, सरोदे यांचा दावा
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणी: धनुष्यबाण गोठवून पक्ष ठाकरेंना देणार, सरोदे यांचा दावा
मांसाहार करणाऱ्यांना घर नाही म्हणण्यावर टीकेची झोड
भावेश कावरेच्या वादग्रस्त जाहिरातीवरून राज्यात संताप: मांसाहार करणाऱ्यांना घर नाही म्हणण्यावर टीकेची झोड
तामिळनाडूच्या निर्णयावरून अमित ठाकरेंनी केला सरकारवर प्रहार
नीट परीक्षा आणि तामिळनाडूच्या निर्णयावरून अमित ठाकरेंनी केला सरकारवर प्रहार
दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... गांधींवर मस्केंची टीका
Naresh Maske | दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... राहुल गांधींवर नरेश मस्केंची बोचरी टीका!
देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीनुसार मुंबईसाठी २३८ एसी लोकल मंजूर
मुंबईला मिळणार २३८ एसी लोकल; फडणवीसांनी मानले केंद्र सरकारचे आभार