AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KBC 13 | गीता सिंहना 7 कोटींवर पाणी सोडायला लावणारा प्रश्न अकबराशी संबंधित, तुम्हाला माहितेय का उत्तर?

‘महानायक’ अमिताभ बच्चन होस्ट करत असलेल्या 'कौन बनेगा करोडपती 13' या शोमध्ये स्पर्धक हिमानी बुंदेला आणि साहिल अहिरवार यांच्यानंतर मध्य प्रदेशच्या गीता सिंह गौर यांनी तिसरी करोडपती होण्याचा मान मिळवला आहे. एकूण 1 कोटीची रक्कम जिंकण्यासाठी त्यांनी 15 प्रश्नांची अचूक उत्तरे दिली. पण, गीता सिंह यांचा मोठ्या रकमेचा प्रश्न चुकला.

KBC 13 | गीता सिंहना 7 कोटींवर पाणी सोडायला लावणारा प्रश्न अकबराशी संबंधित, तुम्हाला माहितेय का उत्तर?
Geeta Singh-Amitabh Bachchan
| Edited By: | Updated on: Nov 11, 2021 | 2:33 PM
Share

मुंबई : ‘महानायक’ अमिताभ बच्चन होस्ट करत असलेल्या ‘कौन बनेगा करोडपती 13’ या शोमध्ये स्पर्धक हिमानी बुंदेला आणि साहिल अहिरवार यांच्यानंतर मध्य प्रदेशच्या गीता सिंह गौर यांनी तिसरी करोडपती होण्याचा मान मिळवला आहे. एकूण 1 कोटीची रक्कम जिंकण्यासाठी त्यांनी 15 प्रश्नांची अचूक उत्तरे दिली. पण, गीता सिंह यांचा मोठ्या रकमेचा प्रश्न चुकला.

या शेवटच्या प्रश्नाचे उत्तर दिल्यावर गीता यांना 7 कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार होते. गीता या प्रश्नाचे उत्तर देऊ शकल्या नाहीत. याशिवाय त्यांनी आधीच सर्व लाईफ लाईन वापरल्या होत्या, त्यामुळे 7 कोटींच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी त्यांना कोणतीही मदत देखील नव्हती. त्यामुळेच हा खेळ तिथेच सोडून जिंकलेले पैसे घेऊन पुढे न खेळण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

7 कोटींचा प्रश्न काय होता?

गीता यांना 7 कोटीं साठी विचारला गेलेला हा प्रश्न अकबराशी संबंधित होता. प्रश्न होता मुघल सम्राट अकबराच्या नातवाचा. अमिताभ बच्चन यांनी प्रश्न विचारला होता की, ‘यातील कोणते नाव अकबरच्या तीन नातवंडांच्या नावांपैकी नाही, जे पाद्रींकडे सुपूर्द केल्यानंतर ख्रिश्चन बनले होते?’

ज्यामध्ये डॉन फेलिप, डॉन हेन्रिक, डॉन कार्लोस आणि डॉन फ्रान्सिस्को असे चार पर्याय देण्यात आले होते.

लाईफलाइन नसल्याने आणि प्रश्नाचे अचूक उत्तर न आल्याने गीता यांनी गेम सोडून घरी जाण्याचा निर्णय घेतला.  त्यांनी खेळ सोडल्यानंतर अमिताभ यांनी  या प्रश्नाचे अचूक उत्तर सांगितले.

काय होते अचूक उत्तर?

अमिताभ यांनी सांगितले की, असे मानले जाते की, जहांगीर नास्तिक होता. त्याने आपला भाऊ दानियाल मिर्झाच्या तीन मुलांना येशूच्या याजकांच्या स्वाधीन केले. क्रॉस आणि पोर्तुगीज कपडे परिधान करून तिघांनीही आग्राभोवती परेड केली. त्यामुळे त्यांची नावेही बदलली – तहमुरास डॉन फेलिप, बायसुंगार डॉन कार्लोस आणि हुशांग डॉन हेनरिक झाले. मात्र, काही महिन्यांनंतर त्यांनी पुन्हा इस्लाम धर्म स्वीकारला. म्हणूनच योग्य उत्तर डॉन फ्रान्सिस्को आहे.

16 वर्षाचे अथक प्रयत्न

गीता सांगतात, ‘जेव्हापासून केबीसी प्रसारित झाला तेव्हापासून मी त्यात सहभागी होण्याचे स्वप्न पाहिले आहे. त्यासाठी मी दरवर्षी प्रयत्न करायचे. मी सतत गेली 16 ते 17 वर्षे प्रयत्न केले. जेव्हा कधी हरायचे, त्यावेळी मी खूप निराश व्हायचे. माझी मुलं मला हताश झालेलं बघायची आणि म्हणायची की, आई तू प्रयत्न करूच नकोस,  कारण जेव्हा तुझी निवड होत नाही, तेव्हा तुला दुःखी पाहून आम्हाला खूप वाईट वाटतं. पण आयुष्य निघून गेले तरी मी प्रयत्न करत राहीन असा निर्धार केला होता. पण आता अखेर मला यश मिळाले आहे.’

हेही वाचा :

मराठी चित्रपटांची मांदियाळी, हास्याची मेजवानी घेऊन येणारा ‘इमेल फिमेल’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

Satyamev Jayate 2 | ‘दिलबर’नंतर नोरा फतेहीचे ‘दिलरुबा’वर ठुमके, डान्स मुव्ह्स पाहून चाहतेही झाले घायाळ!

Follow Us
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.