AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘लाखात एक आमचा दादा’ निर्णायक वळणावर; तुळजाचा ‘तो’ निर्णय मालिकेला देणार नवं वळण

Lakhat Ek Amcha Dada Serial Update : 'लाखात एक आमचा दादा' ही मालिका सध्या चर्चेत आहे. ही मालिका निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. तुळजा एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे आता तिच्या या निर्णयाला सूर्या साथ देणार का? हे पाहावं लागणार आहे. वाचा सविस्तर...

'लाखात एक आमचा दादा' निर्णायक वळणावर; तुळजाचा 'तो' निर्णय मालिकेला देणार नवं वळण
'लाखात एक आमचा दादा' निर्णायक वळणावरImage Credit source: tv9
| Updated on: Jul 24, 2024 | 4:28 PM
Share

‘लाखात एक आमचा दादा’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. कलाकारांचे दमदार अभिनय आणि कथानक हे या मालिकेचं वेगळेपण ठरलं आहे. सध्या मालिकेत एक नाही तर दोन लग्नांची लगबग सुरु आहे. दादाच्या घरी मोठी बहीण तेजू हिचा साखरपुडा ठरला आहे. साखरपुड्यासाठी घरात जोरदार तयारी सुरु आहे सगळे उत्साहात आहेत. त्यामुळे सूर्या दादाचा आनंद गगनात मावत नाहीये. पण अशातच आता ही मालिका निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. तुळजाचा एक निर्णय मालिकेला नवं वळण देणारा ठरणार आहे.

नव्या प्रोमोत काय?

‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. यात तुळजा सूर्याला सांगते की तू माझं लग्न मोड आणि त्यानुसार सूर्या एक प्लॅन तयार करतो. सूर्या पायरीवर दूध टाकतो त्यामुळे सत्यजित पडतो आणि त्याची मान मोडते. यामुळे घरात एकच गोंधळ होतो. आता तुळजाच्या या निर्णयामुळे मालिका नव्या वळणावर येऊन ठेपली आहे.

सूर्याच्या बहिणीच्या लग्नाची तयारी पाहून जालिंदरला स्वतःच्या मनाशी गाठ बांधतो की तेजश्रीच्या लग्नाआधी आपल्या घरात तुळजाचं लग्न धूमधडाक्यात व्हायला हवं. तुळजाचा भाऊ शत्रुघ्न लोकांना गुंतवून ठेवतो आणि तेजूच्या लग्नात विघ्न आण्यासाठी गोंधळ घालतो. ज्यामुळे सूर्या दादाची आई पळून गेली आहे. यावर चर्चा रंगते आणि तेजूचं लग्न मोडतं.

तुळजा सूर्याला सांगणार मनातली गोष्ट

सूर्यादादाच्या घरात जेव्हा हे कळतं तेव्हा संपूर्ण घर उध्वस्त होतं. जालिंदरच्या कानावर ही बातमी पोहचते. दादाने सर्वांना या दु:खातून बाहेर काढायचा निर्णय घेतलाय. तर दुसरीकडे गावात जत्रा आयोजित केली गेली आहे. त्या जत्रेत तुळजा सूर्याला सांगते की तिला सत्यजितशी लग्न करायचं नाहीये आणि म्हणूनच ती ज्या जत्रेला जात आहे. तिथे तिला सूर्याची सोबत हवी आहे. हे ऐकून सूर्याने तुळजाला जत्रेला घेऊन जायचे ठरवलं आहे. तुळजा तिच्या मनातलं सूर्यासमोर सांगू शकेल? यामुळे सूर्याच्या स्वप्नाला नवीन पंख मिळतील? सत्यजितशी लग्न न करायचा निर्णयामुळे काय असेल जालिंदरचा पुढचा डाव? या सर्व प्रश्नांच्या उत्तरांसाठी ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा पुढचा भाग पाहावा लागणार आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.