AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raju Srivastav | राजू श्रीवास्तव अजूनही बेशुद्धच, 10 दिवसांमध्ये आला इतक्या वेळा ताप…

राजू श्रीवास्तव यांच्यावर एक महिन्यांपासून उपचार सुरू आहेत. मात्र, राजू यांना शुद्ध नेमकी कधी येणार, यावर डॉक्टरांकडून कोणतेही उत्तर देत नसल्याने चाहत्यांचे टेन्शन वाढल्याचे चित्र बघायला मिळते आहे.

Raju Srivastav | राजू श्रीवास्तव अजूनही बेशुद्धच, 10 दिवसांमध्ये आला इतक्या वेळा ताप...
| Edited By: | Updated on: Sep 14, 2022 | 9:00 AM
Share

मुंबई : राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) हे गेल्या एक महिन्यांपासून दिल्लीतील रूग्णालयात उपचार घेत आहेत. 10 आॅगस्ट रोजी राजू यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दिल्लीतील एम्स रूग्णालयात राजू यांच्यावर उपचार (Treatment) सुरू आहेत. राजू श्रीवास्तव यांचे चाहते आणि कुटुंबीय सध्या चिंतेत असून 35 दिवस होऊनही राजू यांना एकदाही शुद्ध आली नाहीयं. राजू यांच्यावर रुग्णालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. राजू  यांना रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आल्यापासून शुद्ध आलेली नाहीयं.

राजू यांच्यावर एक महिन्यांपासून उपचार सुरूच

राजू श्रीवास्तव यांच्यावर एक महिन्यांपासून उपचार सुरू आहेत. मात्र, राजू यांना शुद्ध नेमकी कधी येणार, यावर डॉक्टरांकडून कोणतेही उत्तर मिळत नसल्याने चाहत्यांचे टेन्शन वाढल्याचे चित्र बघायला मिळते आहे. राजू यांच्या चांगल्या तब्येतीसाठी कुटुंबीय आणि चाहत्यांकडे प्रार्थना केल्या जात आहेत. कानपूरच्या प्रसिद्ध पंकी मंदिरात राजू यांच्या चांगल्या आरोग्यासाठी पूजा देखील करण्यात आलीयं.

कुटुंबीय आणि चाहत्यांकडून प्रार्थना सुरू

सुरूवातीला राजू यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा बाहेर सुरू होत्या. मात्र, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले होते. इतकेच नाही तर कुटुंबातील सदस्यांपैकी राजू यांचे हेल्थ अपडेट सांगितले जाणार असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी बातम्या आल्या होत्या की, राजू यांना व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले, मात्र, ते फक्त अफवा असल्याचेनंतर स्पष्ट झाले.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.